शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

न्यायाधीशांना न्याय

By admin | Published: August 06, 2015 10:18 PM

उभय वर्गांची मागणी तशी एकसारखीच असताना, प्रदीर्घकाळ या मागणीसाठी निवेदनांपासून आंदोलनांपर्यंत सारे मार्ग चोखाळून बसलेल्या सेवानिवृत्त जवानांना

उभय वर्गांची मागणी तशी एकसारखीच असताना, प्रदीर्घकाळ या मागणीसाठी निवेदनांपासून आंदोलनांपर्यंत सारे मार्ग चोखाळून बसलेल्या सेवानिवृत्त जवानांना न्यायपालिकेतून निवृत्त झालेल्या उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी मागे टाकले आहे. ‘समान पद, समान निवृत्तीवेतन’ या मागणीसाठी देशातील निवृत्त जवान गेल्या अनेक वर्षांपासून झगडा देत आहेत. आजवर केन्द्रात सत्तेत आलेल्या प्रत्येक पक्षाने या मागणीमागील तत्त्वाची तोंड भरून प्रशंसा करीत ती तत्काळ पूर्ण करण्याची आश्वासनेही दिली आहेत, पण त्यापैकी कोणीही आपले आश्वासन पुरे केलेले नाही. केन्द्रातील विद्यमान रालोआ सरकारचे नेते पंतप्रधान नरेन्द्र मोदी हेदेखील याला अपवाद नाहीत. त्यांनी तर आपल्या बहुतेक प्रचार सभांमधून जवानांच्या या मागणीचा उल्लेख केला होता व ती सत्तेत येताक्षणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्ता येऊन पंधरा महिने होत आले, पण सरकार या मागणीला फाटे फोडण्यात धन्यता मानीत आहे. त्या तुलनेत निवृत्त न्यायाधीशांची मागणी तशी अलीकडची. देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची निवड दोन पद्धतीने केली जाते. न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांना बढती दिली जाऊन आणि वकील संघटनेतील अनुभवी वकिलांची थेट निवड केली जाऊन. दोन्ही मार्गांनी न्यायिक सेवेत दाखल झालेल्या न्यायाधीशांच्या निवृत्तीवेतनात मात्र तफावत असते. पदोन्नती प्राप्त करुन न्यायाधीश झालेल्यांच्या वेतनात सेवाकाळ सुरू असताना नियमित वृद्धी होत असल्याने त्यांचे निवृत्तीवेतन सरळ सेवा प्रवेशी न्यायाधीशांच्या तुलनेत अधिक भरते. ही तफावत दूर केली जावी अशी मागणी अर्थातच सरळ सेवेत दाखल होऊन निवृत्त झालेल्या न्यायाधीशांची होती, हे उघड आहे. तिच्यासाठी त्यांनी मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकादेखील दाखल केली होती आणि तत्कालीन सरन्यायाधीशांनी सदर मागणी मान्य करण्याचे आदेशही सरकारला दिले होते. आता याच आदेशाची पूर्तता केन्द्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. जे न्यायाधीश वकील संघटनेमधून म्हणजे ‘बार’मधून थेट न्यायिक सेवेत दाखल होतील त्यांचा त्याअगोदरचा दहा वर्षांचा वकिली व्यवसाय न्यायिक सेवेत गृहीत धरुन त्याआधारे त्यांचे निवृत्तीवेतन निर्धारित केले जावे, असा हा निर्णय आहे व त्यावर संसदेचे शिक्कामोर्तब हा केवळ एक उपचार आहे.