शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
2
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
3
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
4
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
5
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
6
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
7
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
8
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
9
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
10
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
11
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
12
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
13
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
14
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
15
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
16
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
17
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
18
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
19
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
20
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

करम की गती न्यारी...

By admin | Published: January 06, 2017 11:36 PM

सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली.

सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली. पाखरांची चिवचिव सुरू झाली. नव्या वर्षाचे नवे पान केव्हाच उघडले आहे. पण अजूनही ते जाणवते आहे. नवे वर्ष चांगले जाईल अशी उमेद, असा विश्वास प्रत्येक व्यक्ती मनात बाळगत असते आणि भेटणाऱ्या घरच्या आणि बाहेरच्या साऱ्यांना ‘हे वर्ष आनंदाचे जावो’ अशा शुभेच्छा प्रसन्नपणे, दिलखुलासपणे देत असते.‘गेल्या गोष्टी स्मरू नका! गतकाळाचा शोक फुका’ यातील मर्म लक्षात घेऊन सरत्या वर्षातील जिवापाड कष्ट, मतभेद, राग, द्वेष सारे विसरण्याचा प्रयत्न करायचा असा नववर्षाचा प्रत्यक्षात आणायला कठीण असा एक संकल्प समोर ठेवता येतो. गेलेल्या प्रत्येक वर्षासारखेच एका छापाचे हेही वर्ष असा उदास सूरही नको. जसे अर्धवट उमललेले, न चुरडलेले, न चुरगळलेले पण सुगंधाने घमघमणारे फूल असते, तसेच अज्ञात भविष्य घेऊन येणारे अम्लान नवे वर्ष असते. भविष्यकाळ वा अज्ञाताविषयीची अनावर ओढ प्रत्येकाला अस्वस्थ करते. हा क्षणभराचे वर्तमान घेऊन येणारा प्रत्येक काळ, कर्तृत्व गाजवायला पुकारत असतो. ‘करम की गत न्यारी’ म्हणत काही अनुत्तरित प्रश्नही विचारवंतांनी विचारले आहेत. बगळ्याला पांढराशुभ्र वर्ण तर पंचमात गाणारा कोकिळ काळा का? नदीचे पाणी गोड तर समुद्राचे पाणी खारे का? विद्वानांना दारिद्र्याचा शाप तर मूर्खांच्या वाट्याला राज्यपद कसे?महाभारतातील कर्णाने सडेतोडपणे म्हटले आहे की कोणत्या कुळात जन्माला येणार हे दैवाधीन असले तरी नाव कमावणे हे तर प्रत्येकाच्या हातात असते. तरीही आपल्या अपयशाचे खापर कुटुंबावर, समाजावर, परिस्थितीवर नाहीतर ‘पाषाणाचे पोटी बैसला दुर्दूर (बेडूक)। तयामुखी चार कोण घाली’ असे दैवाला श्रेय दिले जाते.भावनिक तोल साधायला सख्खे भावंडही आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. नाती लयास जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्यांना अपयश आले तर मला काय त्याचे? माझ्या वाट्याला फक्त यशच यावे ही जिद्द पराकोटीला पोहोचते आहे. आई-वडिलांचे किमती मार्गदर्शक वागणे मुलांच्या वाट्याला अनेकदा येत नाही किंवा ज्यांना मिळते त्यांना त्याची किंमत वाटत नाही.तरीही गाण्याची मधुर धून मनाला मोहवते. व्याधींनी ग्रासले जीव पाहिले की, वाट्याला आलेली वर्षे आपण कुरकुरत का घालवतो हा प्रश्न जागतो. कोवळ्या पालवीवर प्रकाशाची तिरीप नाचावी तसे प्रतिभावंतांच्या कार्याची आठवण होऊन चेहऱ्यावर समाधान जागते. गरिबी, अपयश, मानापमान ही काटेरी दु:खे, धन-चैन सारे विसरून तन्मयतेने ध्येयवेडे लोग जग घडवतात. कृतीतून सांगतात की ‘स्वत:चे उन्नयन स्वत:च्याच हातात असते. ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हे गीतेचे (अ ६.५) सांगणे आहे. नव्या वर्षात त्याची आठवण मनात सतत ठेवणे हेच यशाकडे नेऊ शकेल.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे