शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

कर्नाटक आणि ‘वज्रमूठ’; ...अशावेळी संधीचे सोने करणार नाहीत ते शरद पवार कसले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 9:34 AM

वज्रमूठ सभांमधील हजारोंच्या गर्दीने जे शहाणपण मविआच्या नेत्यांना दिले नाही ते कर्नाटकने दिले.  मविआ विखुरते की काय, अशी कालपर्यंत वाटत असलेली भीती या निकालाने अचानक दूर केली. कर्नाटकच्या निकालाने सीमा ओलांडून महाराष्ट्रातील नेत्यांना एक होण्याचा संदेश दिला...

काँग्रेसने कर्नाटकातील­ विजयाचा कशिदा एकहाती विणला अन् त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणे सुरू झाले आहे. गेल्या महिना-दोन महिन्यात महाविकास आघाडीत विसंवादाचे सूर उमटले होते. नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, छगन भुजबळ असे नेते एकमेकांना भिडताना दिसत होते. वज्रमूठ सभांचा मुहूर्त चांगला लागला. सुरुवातीच्या तीन सभा जोरदार झाल्या; पण नंतर महाविसंवाद आघाडीचे प्रयोग सुरू झाले आणि वज्रमूठ सभा लांबणीवर टाकाव्या लागल्या. तीन सभांना लोकांनी खूप गर्दी केली; पण नेत्यांनी बेकीची भाषा बोलायला सुरुवात केली. तीन तिघाडा काम बिघाडा सुरू झाले. वज्रमूठ सभा राज्यातील भाजप-शिवसेना युतीची पुरती कोंडी करणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच नेते परस्परांची उणीदुणी काढू लागले अन् मविआचा ताल बिघडला. त्यातच शरद पवारांचे राजीनामा नाट्य,  राष्ट्रवादीतील अंतर्गत विसंवादाचे वातावरण  याचा  महाविकास आघाडीवरही विपरीत परिणाम झाला.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने एकनाथ शिंदे सरकार पायउतार होईल, ही महाविकास आघाडीची आशा फोल ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मविआच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्येही एकवाक्यता नव्हती. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी या निकालानंतर दिले; पण इतर दोन पक्षांनी या आव्हानाचा आवाज बुलंद केलाच नाही. असे मतभेदाचे पडघम वाजायला सुरुवात झाल्याने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिक होते. तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याची टीका भाजपकडून सुरू झाली असतानाच कर्नाटकच्या निकालाने रात्रीतून परिमाणे बदलायला सुरुवात केली आहे.

वज्रमूठ सभांमधील हजारोंच्या गर्दीने जे शहाणपण मविआच्या नेत्यांना दिले नाही ते कर्नाटकने दिले.  मविआ विखुरते की काय, अशी कालपर्यंत वाटत असलेली भीती या निकालाने अचानक दूर केली. कर्नाटकच्या निकालाने सीमा ओलांडून महाराष्ट्रातील नेत्यांना एक होण्याचा संदेश दिला.  अशावेळी संधीचे सोने करणार नाहीत ते शरद पवार कसले? त्यांनी लगेच तीन पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली. नेते एकत्र बसले. पुढची वज्रमूठ सभा पुण्यात घेण्याचे आणि त्या सभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचेही ठरविण्यात आले. ऐक्याची साक्ष देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूकही एकत्रितपणे लढण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला. मविआ सरकारचा अद्भूत प्रयोग प्रत्यक्षात आणण्याचे अत्यंत कठीण काम पवार यांनी शक्य करून दाखविले होते.

आजही या तीन पक्षांची मोट तेच बांधू शकतात, हे पुन्हा एकदा त्यांनी दाखविले असले तरी भाजपचा एकत्रितपणे मुकाबला करण्यासाठीचे बळ तीन पक्षांमधील दिग्गज नेत्यांनाच एकवटावे लागणार आहे. तिन्ही पक्षांना मानणाऱ्यांना या तिघांनी एकत्र राहावे असे आजही वाटते; पण नेते या भावनेचा आदर करताना दिसत नाहीत. कर्नाटकात एकट्या काँग्रेसने भाजपच्या उधळलेल्या घोड्याला वेसण घातली. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असे तीन तगडे पक्ष भाजपच्या विरोधात आहेत. ऐक्याची तोफ लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या विरोधात डागली गेली तर कमळ कोमेजू शकते; पण २०१९ मध्ये मविआचे सरकार स्थापन करताना दाखविलेला स्वप्नवत ऐक्यभाव पुन्हा दिसला तरच ते शक्य आहे.शरद पवार यांनी घेतलेली एक बैठक आणि त्यात थेट विधानसभा निवडणुकीपर्यंत साथ-साथ राहण्याच्या घेतलेल्या आणाभाका त्यासाठी पुरेशा नाहीत. विधानसभा निवडणुकीला १७ महिने बाकी आहेत. बरेच पाणी अद्याप वाहून जायचे आहे. समोर सत्ता दिसत असल्याने २०१९ चा प्रयोग यशस्वी झाला होता; पण आज सत्ता समोर दिसत नाही अन् संघर्षही करावा लागणार आहे. शिवाय मविआला जागावाटपापासून अनेक किचकट विषय हाताळायचे आहेत.  कर्नाटकच्या विजयाने  भाजपवरही आत्मचिंतनाची वेळ आणली आहे. १८ तारखेला पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कर्नाटकच्या निकालाने पक्ष धास्तावला असताना महाराष्ट्राच्या राजकारणावरील  संभाव्य परिणामांची चर्चाही होईलच. कर्नाटकी कशिद्याने महाविकास आघाडीचे ऐक्यवस्त्र नव्याने विणले जाण्याची शक्यता बळावली असताना शिंदेंच्या साथीने आधी लोकसभेची व नंतर विधानसभेची कठीण होत चाललेली वाट सुकर करण्याचे आव्हान भाजपसमोर उभे आहे.

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPoliticsराजकारण