शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला!

By admin | Published: September 06, 2015 4:35 AM

विचार स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत अंधाराच्या एका मोठ्या कालखंडातून आपण समाज म्हणून जात आहोत, अशावेळी जिवाच्या भीतीमुळे आपले स्वतंत्र विचार व्यक्त करायचे थांबविण्याऐवजी शासनाला

- डॉ. हमीद दाभोलकरविचार स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत अंधाराच्या एका मोठ्या कालखंडातून आपण समाज म्हणून जात आहोत, अशावेळी जिवाच्या भीतीमुळे आपले स्वतंत्र विचार व्यक्त करायचे थांबविण्याऐवजी शासनाला हे हत्यासत्र थांबविण्यासाठी कटिबद्ध व्हायला भाग पाडणे आणि दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे विचार समाजात रुजतील, हे प्रयत्न अहिंसेच्या मार्गाने करत राहणे, हे आपल्यातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.दोन वर्षांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसाठी ‘ते’ विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. १६ फेब्रुवारीला ‘ते’ कॉ. गोविंद पानसरेंसाठी कोल्हापुरात आले आणि गेल्या रविवारी तर प्रा. कलबुर्गींच्या घरीदेखील ‘ते’ आले. प्रत्येकवेळी बंदूक घेऊन गाडीवरून आलेले दोन तरुण सत्तरी पार केलेल्या विचार प्रसारकांना मारायला आले. उद्या ते प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या आपल्यापैकी कुणासाठीही कुठेही येऊ शकतात. आपल्या स्वत:च्या विचारांवर (खरे सांगायचे तर अविचारांवर) या मारेकरी शक्तींचा इतकाही विश्वास नाही की आपण कोण आहोत, हे समाजासमोर येऊन सांगण्याचे त्यांना जड जात आहे.या देशात राज्यघटनेचेच राज्य चालावे आणि या देशातील विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची ज्योत तेवत राहावी म्हणून काम करणाऱ्या आणि संघटना बांधणाऱ्या नेत्यांवरच नेमके एकापाठोपाठ एकाच पद्धतीने कसे हल्ले होतात? आणि तेदेखील धर्माच्या नावावर अधर्म वाढत असलेल्या कालखंडात? स्वतंत्र विचार आणि धर्माची चिकित्सा नको असलेल्या, हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि धर्माच्या नावावर राजकारण आणि धार्मिक कट्टरीकरण करणाऱ्या संघटितशक्ती कोणत्या, हे ओळखणे इतके अवघड आहे का? या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बळ देणाऱ्या सगळ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, इसिस आणि तालिबानसारख्याच असणाऱ्या या प्रवृत्ती कधी ना कधी आपल्या जन्मदात्यांच्याच मुळावर उठतात, हा इतिहास आहे. राहता राहिला प्रश्न या समाजातील स्वतंत्र विचारांचे आणि धर्मचिकित्सेच्या संस्कृतीचे काय होणार?

(लेखक अनिसचे राज्य सरचिटणीस (पश्चिम महाराष्ट्र) आहेत.)