शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

लात हाणोनिया। गुंड वाट शुद्ध करी

By admin | Published: March 08, 2016 9:00 PM

पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.

पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. उच्च शिक्षणातील हा बाजारबसवेपणा समूळ उखडून टाकण्याची ही वेळ आहे.एक द्रव्याने विकिले। एक शिष्याने आखिलेअति दुराशेने केले।दीन रूप जसा वैद्य दुराचारी। केली सर्वेस्वी बोहरीआणि सेखी भांड करी। घातघेणा । तेसा गुरु नसावा‘दासबोध’ या ग्रंथात गुरूची लक्षणे सांगताना गुरू कसा नसावा हे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी जे सांगितले ते आजही तंतोतंत लागू पडते. खरं म्हणजे आता गुरुपौर्णिमाही नाही, गुरूंची आठवण होण्यासाठी. पण गुरू आठवले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी.चा भरलेला बाजार पाहून समर्थांची आठवण झाली. हे विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाचे. ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ज्यांनी आयुष्यभर विद्येची कास धरली तेथेच हा बाजार चालतो आणि तोही बिनदिक्कत.पदव्यांचा बाजार मांडला तसा त्याची किंमतही ठरू लागली. ‘लोकमत’ने जेव्हा हे बिंग फोडले तेव्हां त्याची भयानकता उघड झाली. पीएच.डी.करायची तर पात्रता महत्त्वाची नाही. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याऐवजी त्यांच्याकडून खंडणीरूपात दक्षिणा उकळणारी टोळीच तयार झाली आहे. या टोळीत कोण साव आणि चोर हे सांगता येत नाही. कारण विद्वत्तेचा बुरखा जसा जसा फाडला जाईल तसे चोर कोण हे उघड होणार. गाईड नावाचा प्राणी खरोखरच मार्गदर्शन करतो की विद्यार्थ्यांची आर्थिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक करतो, हाच चर्चेचा विषय आहे. पीएच.डी. साठी ५० हजारांवरून तीन लाखांपर्यंत दक्षिणेचा दर आहे. हा झाला रोखीचा व्यवहार.या देण्या-घेण्याच्या व्यवहारातही विविधता दिसते. एका गुरुची पत्नी विमा व्यवसाय करते. या व्यवसायाला हातभार लावून तिला दरवर्षी करोडपती बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेवा द्यावी लागते. शिवाय गाडीत पेट्रोल भरणे, गॅरेजवर घेऊन जाणे, घरची-कार्यालयाची कामे करणे अशा सेवावृत्तीचा अंगीकार करावा लागतो. महिला विद्यार्थ्यांकडून तर लैंगिक छळाच्या तक्रारी पूर्वी आलेल्याच आहेत. त्यातून विद्यार्थिनींची बदनामी होते ती वेगळी; पण या साऱ्या प्रकारांनी शैक्षणिक वातावरणाचे तीनतेरा वाजतात, त्याची फिकीर चोथा चघळणारे आणि विद्यापीठ प्रशासनही करीत नाही. गाईडच्या जाचात भरडला जातो तो विद्यार्थी. त्याला व्यथा सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. विद्यार्थ्यांना जी पाठ्यवृत्ती (फेलोशिप) मिळते त्यातही काही गाईड आपला हिस्सा ठेवतात. २५ ते ७५ टक्के रक्कम गाईडला द्यावी लागते. पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. कारण त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. दरवर्षी पीएच.डी.चे प्रबंध मंजूर होतात, त्यापैकी किती लोकोपयोगी असतात? या संशोधनातून सामान्य माणसाचे जीवनमान बदलणारे किती, देश उभारणीसाठी हातभार लावणारे किती हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. उच्च शिक्षणातील हा बाजारबसवेपणा समूळ उखडून टाकण्याची ही वेळ आहे. अशा प्रकारांनी विद्यापीठाचा दर्जा खालावला हे नाकारून चालणार नाही. त्याहीपेक्षा कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन या प्रवृत्तींचा नि:पात कसा करतात हेच महत्त्वाचे आहे. भलेही एखादी विद्याशाखा, प्रयोगशाळा उभारणे लांबणीवर पडेल. एखादा आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेता आला नाही तरी चालेल; पण शिक्षण व्यवस्थेला पोखरणाऱ्या या किडीचा बंदोबस्त जरूरीचा आहे. नसता विद्यापीठ नावापुरते उरेल; पण त्याहीपेक्षा बाबासाहेबांच्या नावाशी केलेली गद्दारी ठरेल. संत तुकारामांनी म्हटले आहे-दुर्जनांचा मान। सुखे करावा खंडण।।लात हाणोनिया वारी। गुंड वाट शुद्ध करी।तुका म्हणे नखे। काढूनी टाकिजे ती सुखे।।- सुधीर महाजन