शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वरून कीर्तन अन् आतून....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:08 IST

मंडळी आज निरुपणाला नाथबाबांचे (संत एकनाथ) भारुड घेतले म्हणून चकित होऊ नका. आम्हांस ठाऊक आहे की, कीर्तन परंपरेनुसार नामस्मरणानंतर अभंग घेण्याची प्रथा आहे. पण नाथषष्ठी येऊ घातली आहेच. शिवाय, आजचा प्रसंगही तसा बाका आहे. काल आम्ही जळगावी होतो. नाथाभाऊंचा सध्या तिथं हरिनाम सप्ताह सुरू आहे.

- नंदकिशोर पाटीलभूत जबर मोठं ग बाईझाली झडपड करू गत काई ।।सूप चाटून केले देवऋषी,या भूताने धरिली केशी।।लिंबू नारळ कोंबडा उतारात्या भूताने धरिला थारा।।मंडळी आज निरुपणाला नाथबाबांचे (संत एकनाथ) भारुड घेतले म्हणून चकित होऊ नका. आम्हांस ठाऊक आहे की, कीर्तन परंपरेनुसार नामस्मरणानंतर अभंग घेण्याची प्रथा आहे. पण नाथषष्ठी येऊ घातली आहेच. शिवाय, आजचा प्रसंगही तसा बाका आहे. काल आम्ही जळगावी होतो. नाथाभाऊंचा सध्या तिथं हरिनाम सप्ताह सुरू आहे. अनेक संत-महंत येऊन हजेरी लावत आहेत. म्हटलं आपणही पायधूळ झाडून यावी. ज्या नाथाभाऊंनी खान्देशात भाजपधर्माचा पाया रचिला त्यांना पक्षाने किंकरासारखे बाजूला सारिले म्हणून काय झाले? आपल्या खान्देशी संप्रदायाची पताका त्यांनी अजून खाली ठेवलेली नाही बरं का! नाथाभाऊंच्या हरिनाम सप्ताहासाठी राष्टÑवादी सेवा संस्थानचे ह.भ. अजित (बुवा) बारामतीकर देखील आले होते. सर्वांसमक्ष त्यांनी नाथाभाऊंना आलिंगन दिलं. आहाहा! काय तो दुर्मीळ क्षण! हल्ली अशा संतभेटी होतात कुठे महाराज? म्हणून तो क्षण याचि डोळा, याचि मोबाईल साठविण्याची संधी आम्ही दवडली नाही. आम्ही धन्य जाहलो! वस्तुत: दादा-भाऊंच्या मनीच्या गुजगोष्टी ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते. पण थोरामोठ्यांची बातच निराळी. आपल्या कानगोष्टींची त्यांनी कुणाला कानोकानी खबर लागू दिली नाही महाराज! तेही सहाजिकच म्हणा. ‘सत्तेविना स्वारी, मन रमेना संसारी’ असं जगजाहीर कसं सांगणार?अनुभवातून माणंस शहाणी होतात महाराज!(बोला विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)-तर मंडळी, सांगायचं तात्पर्य काय? नाथबाबा म्हणतात, लोकसेवेपेक्षा परमार्थ हीच खरी ईश्वरसेवा. प्रपंचाशिवाय, परमार्थ आणि परमार्थाशिवाय परमेश्वर प्राप्ती होणे नाही. राजे हो, सत्तासुंदरी ही तर मोहमाया. तिच्या नादी लागून रावांचे रंक, नाथांचे अनाथ अन् योगींचे भोगी झाले. या भुताटकीला उतारा गंडेदोरे टाळा...(बोला, विठ्ठलंऽ विठ्ठलंऽऽ विठ्ठलं ऽऽऽ)-तर मंडळी, नाथबाबांनी आपल्या भारुडातून समाजाच्या अंगातील अंधश्रद्धेची भुताटकी उतरवली. पण सत्तेची भुताटकी गेलीच नाही. सत्ता आणि सीतेच्या मोहापायी लंका जळाली. बिभीषण हुशार होता महाराज. काळाची गरज ओळखून त्यानं पक्ष बदलला. सुग्रीवानं हनुमंतांना बाहेरुन पाठिंबा दिला आणि शकुनीनं पांडवांचा पक्ष फोडला!(बोला, पुंडलिका हरी विठ्ठलऽऽ)-तर मंडळी कीर्तनाच्या उतरार्र्धाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ती नीट ध्यानात ठेवा. तुम्हाला राजकारणात पाऊल ठेवायचं असेल, तर नारद मंडळीपासून सावध राहा. नारद देवलोकांत गेलेच नाहीत. वेशांतर करून ते भूलोकीच आहेत. कधी ‘आरटीआय’ टाकून तर कधी ब्रेकिंग न्यूज देऊन कुणाला अडचणीत आणतील याचा नेम नाही! सत्तेची ‘लक्ष्मणरेषा’ आणि संघाचा कावा वेळीच ओळखा. देवेंद्राचा धावा कामाचा नाही. नाही तर, लक्ष्मी चतुर्भूज झाली नि सत्तेबाहेर घेऊनी आली, अशी नाथाभाऊंसारखी गत व्हायची महाराज!

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे