शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

पण, अंतिम उपाय विकासच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

२४ मे १९६७ रोजी पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावातून सुरू झालेली नक्षल चळवळ आज तब्बल चार दशकांचा प्रवास करून पार दमून गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दलित, अतिगरीबमजूर, भूमिहीन शेतकरी आणि आदिवासींच्या जीवनात पारतंत्र्याचा काळोख कायम होता. त्यामुळेच या शोषितांचा प्रशासनाबद्दलचा असंतोष वाढत होता. याचाच फायदा घेत नक्षल चळवळीने आपले पाय रोवायला सुरुवात केली अन् अवघ्या देशात सातत्याने हिंसाचार घडवून आणला. हा हिंसाचार इतका तीव्र की पोलीस आणि निमलष्करी दलालाही अनेकदा मागे पाहावे लागले. परंतु आता चार दशकांच्या अखंड रक्तपातानंतर या चळवळीचे कंबरडे मोडले आहे. याचे श्रेय अर्थातच अनोळखी निबिड अरण्यात प्राण हातावर घेऊन नक्षल्यांशी थेट भिडणाऱ्या पोलिसांचे आहे. नक्षल्यांचे ‘रेस्ट झोन’ ठरत असलेल्या सिरोंचासारख्या परिसरात याच बहादूर पोलिसांनी जेव्हा बंदुकीच्या टोकावर त्या भागापुरते नक्षल्यांचे अस्तित्वच संपूवन टाकले तेव्हाच या चळवळीला लागलेल्या वाळवीने तिला पुरते पोखरून टाकले आहे, याचे संकेत मिळत होते. सिरोंचाची सुवार्ता लवकरच अवघ्या गडचिरोली जिल्ह्याची सुवार्ता ठरेल, अशी आशा त्यातूनच व्यक्त व्हायला लागली होती. एका झटक्यात १६ नक्षल्यांचे मुडदे पाडून पोलिसांनी हा आशावाद बºयाचअंशी सार्थ ठरवला आहे. आकड्यातच बोलायचे झाल्यास यंदा नऊ महिन्याच्या आतच तब्बल ४१ नक्षल्यांना पोलिसांनी यमसदनी पाठवले आहे. कायदा व हिंसाचाराच्या या समरांगणात पहिल्यांदा पोलिसांनी इतके भव्य यश संपादन केले आहे. यासाठी निश्चितच पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. परंतु हा लढा पोलीस विरुद्ध नक्षल असा अजिबात नाही. नक्षल्यांचा चोला पांघरूण ज्यांनी ज्यांनी पहिल्याक्षणी बंदुका हाती घेतल्या त्या सर्वांचा राग सामाजिक तसेच आर्थिक विषमतेला खतपाणी घालणाºया व्यवस्थेविरुद्ध होता. पुढे ही चळवळ भरकटली, नक्षल नेते भ्रष्ट झाले. पण, ज्यांच्या बळावर ती ही लढाई लढत होते ते सर्वसाधारण नक्षली मात्र व्यवस्थेविरुद्धच लढत राहिले, अजूनही लढताहेत. व्यवस्थेबद्दलचा हा सनातन राग प्रत्येक वेळी बंदुकीच्या धाकावरच मिटवणे शक्य नाही. ही व्यवस्था ४० वर्षांआधी होती इतकी क्रूर नाही, आता तिने आपलेही ‘माणूस’ असणे मान्य केले आहे आणि अन्न, वस्त्र, निवाºयासोबतच आरोग्य, शिक्षणाची गंगा आपल्याही दुर्गम झोेपडीपर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास या आदिवासी तरुणांच्या मनात निर्माण करणे गरजेचे आहे. कारण, दोन्ही बाजूंनी कितीही गोळ्या झाडल्या तरी नक्षल चळवळ कायमची हद्दपार करण्यासाठी या वंचितांच्या क्षेत्राचा विकास हाच अंतिम व प्रभावी उपाय आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी