शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

‘एलबीटी’चे त्रांगडे

By admin | Published: August 07, 2015 9:41 PM

राज्याच्या सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करून, एक प्रमुख आश्वासन अंशत: पूर्ण केले खरे; पण तिकडे केंद्रात वस्तू व सेवा कर

राज्याच्या सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करून, एक प्रमुख आश्वासन अंशत: पूर्ण केले खरे; पण तिकडे केंद्रात वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलात आणण्याचे आश्वासन देत सत्तारुढ झालेल्या त्याच पक्षाला, जीएसटीचे अडून बसलेले घोडे पुढे दामटणे शक्य होत नसल्याने, एलबीटीचे त्रांगडे राज्य सरकारच्या गळ्यातील फास होऊन बसण्याची शक्यता दिसू लागली आहे. एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण करताना, वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांना त्यामधून वगळण्यात आल्याने, व्यापारी-उद्योजक वर्ग पूर्णत: खूश झालेला नाही. दुसरीकडे एलबीटीमधून होणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत, सरकारकडून जाहीर झालेली अनुदानाची रक्कम कमी असल्यामुळे महापालिकाही नाराज आहेत. एलबीटीची जागा घेण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने उभी न केल्यामुळे, महापालिकांना अनुदान देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागणार आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने, ही जबाबदारी सरकारला चांगलीच जड जाणार आहे. महापालिकांसाठी जाहीर करण्यात आलेली अनुदानाची रक्कम, काही अपवाद वगळता, त्या-त्या महापालिकेच्या एलबीटी उत्पन्नाच्या तुलनेत बरीच कमी आहे. एलबीटी रद्द केल्याने होणारे महापालिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी मुद्रांक शुल्कापोटी मिळणारी रक्कम पालिकांकडे वळविण्याचे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे. त्याशिवाय मूल्यवर्धित करावर अधिभार आकारणे, उलाढाल कर नावाने नवाच कर सुरू करणे, इत्यादी पर्यायही सरकारसमोर होते. पण तिजोरी रिती असलेल्या सरकारसाठी हा पर्याय कायमस्वरुपी असू शकत नाही. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना एलबीटी रद्द करणे, म्हणजे गलथान प्रशासन आणि भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध झालेल्या महापालिकांचा धोंडा स्वत:हून गळ्यात अडकवून घेणे ठरणार आहे. एलबीटी रद्द करताना, राज्य सरकारची आशा जीएसटीवर केंद्रित झाली होती. वस्तू व सेवांवरील नाना प्रकारचे अप्रत्यक्ष कर संपवून, त्याऐवजी एकाच कराची एकाच ठिकाणी वसुली करणे आणि केंद्र व प्रत्येक राज्य सरकारला पूर्वनिर्धारित प्रमाणात हिस्सा देणे, ही जीएसटीमागील संकल्पना! त्यामुळे जीएसटी लागू होताना एलबीटी आपोआपच रद्द झाला असता आणि जीएसटीच्या हिश्शामध्ये राज्य सरकारला एलबीटीची रक्कम परत मिळाली असती, जी पुढे महापालिकांना वाटता आली असती. दुर्दैवाने संसदेतील रोधामुळे सध्या तरी जीएसटीचेच देऊळ पाण्यात दिसत आहे. त्यामुळे किती दिवस राज्याला एलबीटीचे ओझे खांद्यावर वागवावे लागेल हे सांगता येत नाही.