शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संवेदनांचे दीप उजळूया...

By किरण अग्रवाल | Updated: October 28, 2021 07:00 IST

Let's light the lamps of Emotions ... निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे.

किरण अग्रवाल

 आनंद वाटल्याने वाढतो असे म्हणतात, पण आज आनंद कुणी वाटून घेऊ इच्छित नाही; तो ‘मी’ व ‘माझ्या’तच ठेवून दुःख मात्र वाटून घेण्याची अपेक्षा बाळगली जाते. अर्थात सुख असो की दुःख, त्यात एकतर्फी वाटेकरी कधीच लाभत नसतात म्हणून यासंदर्भातील समतोल साधायचा तर अगोदर सुख वाटण्यापासून सुरुवात करायची असते. ते करायचे म्हणजे काय, तर आपल्या आनंदातील वाटेकरी वाढवायचे. यंदाच्या दिवाळीत तेच करता आले तर निराशेचे मळभ दूर सारून उत्साह, ऊर्जेच्या पणतीने प्रत्येक अंगण प्रकाशमान झालेले दिसून येऊ शकेल.

 

गत वर्षापासून दिवाळीला कोरोनाच्या संकटाची पार्श्वभूमी लाभून गेलेली असल्याने सण साजरा होताना दिसतो; परंतु मनातील अस्वस्थता लपता लपत नाही. यंदाच्या दिवाळीपूर्वीही कोरोनाची दुसरी लाट अनेकांना झळ पोहोचवून गेली आहे. अनेक घरातील कर्ते व कमावते पुरुष कोरोनाने हिरावून घेतले आहेत, तर अनेकांच्या नोकरी, व्यापार-उद्योगांवर गंडांतर आलेले आहे. अशाही स्थितीत मन घट्ट करून सारेजण दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाजारातील गर्दी ओसंडून वाहत असून, संकटावर मात करून आयुष्याच्या मशाली पेटवण्याचा दुर्दम्य आशावाद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे. कोरोनाच्या संकटातून कसे तरी बचावत बाहेर पडून स्थिरस्थावर होत नाही तोच अतिवृष्टीचा फटका बसला. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, तरी नाउमेद न होता ऋण काढून का होईना सण साधण्यासाठी धडपड सुरू आहे. काहीशी निराशा, अस्वस्थता मनात आहे खरी; पण आशेचे दीप लावून आसमंत उजळून काढण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत ही समाधानाची बाब म्हणता यावी.

 

आशेचे दीप लावण्याच्या या प्रयत्नांना सार्वत्रिक पातळीवर बळ लाभणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ज्यांच्या वाट्याला जे जे काही दुःख आले ते त्यांना विसरायला लावायचे असेल तर आपला आनंद त्यांच्याशी वाटून घ्यावा लागेल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे व आपुलकीचे दोन शब्द तसेच दुःखाप्रतिच्या सहवेदनेतून हे होऊ शकणारे आहे. माणुसकीच्या ओलाव्याने ओथंबलेल्या भावना व शब्द असले, की त्रयस्थाच्या मनाशीही आपुलकीच्या तारा जुळतात. आपल्या आनंदात सहभागी करून घेतले की समोरच्याचे दुःख विसरायला मदत होते. दिवाळीला आपण आपल्या दारी आकाशकंदील लावू, आनंदाचे तोरण बांधू, घरात गोडधोड करू, नवीन कपडे लागते घेऊ; यातून जो आनंद आपणास लाभणार आहे तो आपल्या ऐपतीप्रमाणे समाजातील वंचितांसोबत वाटून घेतला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची होऊ शकेल. यातून जे आत्मिक समाधान लाभेल व आनंद होईल त्याला मोल नसेल. अर्थातच यासाठी हवी संवेदनशीलता. दुर्दैवाने आज लोकांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. कोरोनाने गरीब-श्रीमंत, लहान-मोठा या भेदांच्या पलीकडे सर्वांना एका पातळीवर आणून उभे केल्याचे पाहता, निराशेच्या वातावरणात संवेदनांचे दीप उजळून आनंद पसरविण्याची गरज आहे. यंदाच्या दिवाळीत सारे मिळून तेच करूया...

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Socialसामाजिक