शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

विशेष लेख: माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, कंगनाच्या गळ्यात कमळांची माळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:30 IST

Lok sabha Election 2024: अक्षय कुमार यांना दिल्ली, तर माधुरी दीक्षित यांना उत्तर मुंबई किंवा मथुरेतून उमेदवारी मिळू शकते. कंगना राणावत यांना मंडी मतदारसंघाचे तिकीट मिळेल, असे म्हणतात!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे; परंतु भाजपचे नेतृत्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अद्याप संपली नसतानाच लोकसभेत कोणकोण निवडून येऊ शकते, हे शोधण्यात व्यग्र आहे. पक्ष चित्रपट उद्योगातल्या नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे म्हणतात. हेमा मालिनी यांनी  वयाची पंचाहत्तरी ओलांडल्याने त्यांना यावेळी मथुरा मतदारसंघातून कदाचित तिकीट मिळणार नाही. सनी देओल यांनीही उमेदवारी घ्यायला नकार दिल्यामुळे भाजपला गुरुदासपूरमधून नवा चेहरा शोधावा लागत आहे.  किरण खेर यांचीही प्रकृती अलीकडे ठीक नसते. त्यामुळे चंडीगडमधून भाजपला त्यांच्या जागी पर्याय शोधावा लागणार आहे. अक्षय कुमार, कंगना राणावत आणि माधुरी दीक्षित यांच्यासारख्या तारे-तारकांची नावे सध्या घेतली जात आहेत. अक्षय कुमार हे पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे आहेत.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पंतप्रधानांची मुलाखत घेतली होती. अक्षय कुमार यांना दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून उभे केले जाईल, अशी शक्यता आहे.

कंगना राणावत यांनी राजकारणात येण्याची इच्छा आधीच प्रकट केली आहे आणि काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांच्याविरुद्ध मंडी लोकसभा मतदारसंघात त्यांना उभे केले जाईल असे दिसते. माधुरी दीक्षित यांनाही उत्तर मुंबई किंवा मथुरेतून उमेदवारी मिळू शकते. मनोज तिवारी, रवी किशन आणि दिनेश लाल यादव हे तीन भोजपुरी अभिनेते भाजपचे खासदार आहेत. पश्चिम बंगालचे लॉकेट चटर्जी आणि कन्नड फिल्म स्टार सुमनलता याही लोकसभेत आहेत. दक्षिणेकडून आणखी काही चित्रपट ताऱ्यांची भाजपला गरज असेल. क्रिकेट स्टार वीरेंद्र सेहवाग यालाही हरयाणातून लोकसभेसाठी उभे केले जाईल, अशी दिल्लीत चर्चा आहे.

जेष्ठ नेते शड्डू ठोकत आहेतपक्षातील जुनी खोंडे मागे हटायला तयार नसल्यामुळे भाजप नेतृत्वाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या मंडळींसाठी कर्नाटकातील ताकदवर लिंगायत नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा आदर्श आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदी त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना शेवटी बसवलेच. त्यातून शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे शिंदे आणि इतरांनी प्रेरणा घेतली. येडियुरप्पा यांनी पदग्रहण केले तेव्हा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. येडियुरप्पा यांनी त्यांचे निष्ठावंत आर. अशोक यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला लावले. त्याचप्रमाणे जनता दल एसचे नेते एच. डी. देवेगौडा यांच्याशी पक्षाने केलेल्या आघाडीवरही बरेच जण नाखुश आहेत. तरी ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरती आहे. आपण फार काळजी करू नये, असे येडियुरप्पा यांना सांगण्यात आले आहे. 

नितीश गेले कोशात!लोकसंख्यावाढीच्या संदर्भात महिलांचा ‘अनुचित उल्लेख’ केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नितीश कुमार यांना माफी मागावी लागली, तेव्हापासून ते शब्दश: विजनवासात गेले आहेत. अगदी त्यांचे पक्षातले आणि बाहेरचे कट्टर निष्ठावंत नितीश यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याचे कुठे आणि कसे चुकले याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आहे. विसरभोळे नितीश कुमार एका कॅबिनेट मंत्र्याच्या घरी चहापानासाठी दोनदा कसे गेले, याच्या सुरस कथा बिहारमध्ये सध्या चघळल्या जात आहेत. त्यांनी चहाचे दोन घोट घेतले आणि ते काही काळासाठी तेथून निघून गेले; पुन्हा आले आणि त्यांनी म्हणे पुन्हा चहा मागितला. त्यांचे वागणे कमालीचे बदलले आहे, असे बऱ्याच जणांचे म्हणणे असून, अलीकडे नितीश अचानक भडकतात. एकेकाळी ते माध्यमांना फार प्रिय होते; परंतु आता जनता दरबारात ते पत्रकारांना बोलवेनासे झाले आहेत. महत्त्वाच्या कार्यक्रमांनाही पत्रकारांना निमंत्रण नसते. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही रोजच्या कार्यक्रमांची माहिती दिली जात नाही. अलीकडेच नितीश यांनी हात जोडून पत्रकारांना निघून जायला सांगितले. हे करताना ते तीन वेळा त्यांच्यापुढे वाकले म्हणतात. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आता पाच विधानसभांच्या निकालानंतरच नितीश कुमार काय ते बोलतील... पाहूया!

टॅग्स :BJPभाजपाMadhuri Dixitमाधुरी दिक्षितAkshay Kumarअक्षय कुमारKangana Ranautकंगना राणौत