शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

Lok Sabha Election Result 2024 : मंडल-कमंडल २.० ची सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:01 IST

Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीतल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे निकट भविष्यात 'जात की धर्म' या प्रश्नातून उभा राहणारा अंतर्विरोध समोर येईल!

- श्रीमंत माने (संपादक, लोकमत, नागपूर)

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख घटकपक्ष म्हणून सत्तेत वाटा मागताना युनायटेड जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाकडे देशभर जातीगणनेची मागणी केल्याचे वृत्त आहे. बिहारमधील जातगणनेचे सगळे श्रेय निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव यांनी घेतले तरी तो निर्णय, त्याची अंमलबजावणी नितीश कुमार मुख्यमंत्री असताना झाली. जात फॅक्टर राजकारणात कसा काम करतो हे नितीश कुमारना कुणी वेगळे सांगण्याची गरज नाही. बिहारमध्ये त्यांनी तो बऱ्यापैकी वापरला.  ‘अतिपिछडा’ म्हणजे मागास ओबीसींची मोट त्याच आधारे बांधली. तिच्या बळावर त्यांनी अनेकदा यादवांचे वर्चस्व मोडून काढले.  नितीश कुमार किंवा आघाड्यांच्या राजकारणाचा मोठा अनुभव असलेले चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने भाजप सत्तेत येत असल्याने त्यांचा या विषयीचा दृष्टिकोन अगदीच मोडीत काढण्यासारखा नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे राजकारण जवळपास साडेतीन दशकांनंतर पुन्हा मंडल-कमंडलच्या वळणावर उभे आहे. या वळणावर जातगणना हा कळीचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला राममंदिर उभारणीचा आनंद व काशी-मथुरेसाठी प्रयत्न आहेत. आघाडीच्या राजकारणामुळे हे प्रयत्न लगेच गती घेतील असे नाही. परंतु, ते फार काळ मागेही राहणार नाहीत. कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारचा मुस्लिमांमधील जाती ओबीसी यादीत टाकण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे मंडल आयोग ऐन निवडणूक काळात चर्चेत आला.  राममंदिराच्या निमित्ताने देशभर धार्मिक वातावरण असतानाही निवडणुकीत ओबीसी फॅक्टर महत्त्वाचा राहिला. इंडिया आघाडीच्या मुसंडीचे बरेचसे श्रेय जातगणनेचे आश्वासन व जातीय समीकरणांना जाते. पिछडा, दलित व अल्पसंख्याक यांच्या पीडीए फाॅर्म्युलाने उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला मोठे यश मिळवून दिले.

‘देशभरात जातीगणना करू, प्रत्येक जाती-उपजातीच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती समजून घेऊ, त्यानुसार देशाच्या संसाधनांचा वापर व वाटप ठरवू आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकू’, या काँग्रेसच्या न्यायपत्रातील महत्त्वाच्या घोषणा होत्या. काँग्रेसचे मित्रपक्षही त्या घोषणांचा प्रचार करीत होते. अर्थात, जातगणनेची तुलना थेट मंडल आयोग अथवा त्याच्या शिफारशींशी करता येणार नाही. विरोधकांचे हे नवे ‘पोलिटिकल पॅकेज’ केवळ आरक्षणापुरते मर्यादित नाही. त्यापलीकडे आर्थिक धोरणाला ते स्पर्श करते. तथापि,  गरिबांच्या खात्यावर ठरावीक रक्कम या पलीकडे जातगणनेच्या निष्कर्षांवर धोरण निश्चित नाही. 

हिंदुत्वासाठी लाठ्याकाठ्या खाण्यास तयार  कार्यकर्त्यांची फळी भाजपला ओबीसींमधूनच  मिळते. जातींचा विचार करतानाच हिंदुत्वाचा धागा कायम राहतो. ...आणि जातगणना ही ओबीसींच्या देशव्यापी महासंघाची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या या मागणीचा भाजपने गंभीरपणे विचार केला तरी आश्चर्य वाटायला नको. जातींचा आवाज वाढला की धर्मावर आधारित राजकारणाचा आवाज क्षीण होतो, धार कमी होते. म्हणूनच जात वजा करून हिंदुत्व ही त्या राजकारणाची मूळ धारणा आहे. शक्य तितका वेळ जातींच्या चक्रव्यूहातून बाहेर राहण्याचा प्रयत्न हे राजकारण करील आणि अगदीच अशक्य झाले तर त्यात उतरून पुन्हा त्याला हिंदुत्वाचा रंग देण्याचा प्रयत्न होईल. तथापि, तूर्त तरी जात की धर्म या प्रश्नातून उभा राहणारा अंतर्विरोध स्पष्ट आहे. रा.स्व.संघ व भारतीय जनता पक्ष त्या अंतर्विरोधातून कसा मार्ग काढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.      

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल