शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकमत संपादकीय - कर्जमाफीचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 07:50 IST

केवळ पाच एकरच जमीन हवी, दीड लाखच कर्ज हवे, त्याहून अधिक असेल तर आधी ते भरायचे,

महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. आघाडी सरकारचा तसा हा पहिलाच मोठा निर्णय आहे. यावर टीका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचे काय झाले? असे विचारत विधानसभेतच निषेध करून सभात्याग केला होता. परवा कोल्हापुरातही त्यांनी या निर्णयावर टीका केली. या कर्जमाफीचा लाभ महापूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नाही, असे ते म्हणाले. विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने कर्जमाफीतही शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधाºयांवर टीका करणे ही विरोधकांची भूमिका असते. त्या भूमिकेला अनुसरूनच फडणवीस यांची ही टीका आहे. हे मान्य केले तरी त्यांच्या सरकारने जी कर्जमाफी केली ती पुरेशी नव्हती, हे साऱ्या महाराष्ट्रला माहीत आहे.

केवळ पाच एकरच जमीन हवी, दीड लाखच कर्ज हवे, त्याहून अधिक असेल तर आधी ते भरायचे, नियमित कर्ज भरणाºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहन, अशी ही कर्जमाफीची योजना होती. तिचे नियम आणि अटी सतत कशा बदलत गेल्या. त्यात सर्वसामान्य शेतकरी कसा भरडला गेला. पात्र शेतकरी, अपात्र शेतकरी यांच्या याद्यांची पडताळणी किती वेळा झाली. प्रत्यक्षात खरे लाभार्थी कर्जमाफीपासून वंचित राहू नयेत यासाठी हे सर्व असल्याचे स्पष्टीकरण त्या काळात सरकार आणि प्रशासनाकडून दिले जात होते. मात्र, या सगळ्यात कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर जी काही रक्कम शेतकºयांच्या पदरात पडली त्यात जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी गेला. विधानसभा निवडणुका लागल्या तरी ही प्रक्रिया संपलेली नव्हती. कर्जमाफीच्या याद्या पडताळणीचे आणि पात्र शेतकरी ठरविण्याचे काम सुरूच होते. गेली अडीच वर्षे निसर्गाने छळले त्याहून अधिक या कर्जमाफी योजनेने शेतकºयांना छळले. राज्यातील एकूण ३६ लाख शेतकºयांना २० हजार कोटींची कर्जमाफी दिली गेली. अद्यापही असंख्य शेतकरी या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. ते फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीला, नियम आणि अटींच्या जंजाळाला वैतागले होते. याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसल्याचे ग्रामीण भागात स्पष्टपणे दिसून आले आहे.

 तरीही उद्धव ठाकरे यांच्या विनाअट दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याच्या निर्णयाला फडणवीस कसा काय विरोध करू शकतात? तसा नैतिक अधिकार त्यांना पोहोचतो का? हा प्रश्न आहेच. शिवाय फडणवीस सरकारने कर्जमाफीसाठी पाच एकरांची अट घातली होती. विदर्भ, मराठवाडा या दुष्काळग्रस्त भागात यापेक्षा धारणक्षमता जास्त असलेले शेतकरी आहेत. त्यांना याचा लाभ झाला नाही, हे फडणवीस स्वत: विदर्भाचे असूनही त्यांना कसे कळले नाही, याचे आश्चर्य वाटते. मात्र, ज्यांना शेतीतले काही कळत नाही, असा आरोप केला जातो त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिलाच मोठा निर्णय घेताना विनाअट दोन लाखांची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. सात-बारा कोरा करणे, हाच आपल्या सरकारचा प्राधान्यक्रम आहे, हेही त्यांनी ठासून सांगितले. मात्र ही कर्जमाफी लवकरात लवकर व्हायला हवी. तसेच राज्यातील सरकार नवे आहे. त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. शिवाय केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्या सरकारनेही अपेक्षित मदत महाराष्ट्रातील शेतकºयांना अजून दिलेली नाही. हे लक्षात घेऊन फडणवीस यांनी आपल्याच पक्षाच्या केंद्रातील सरकारकडे महाराष्टÑातील शेतकºयांसाठी आवाज उठविण्याची गरज असताना कर्जमाफीवरून राजकारण करणे अयोग्य आहे. शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमुक्त करणे हे सर्वच पक्षांचे जाहीर धोरण असताना त्यावरून राजकारण थांबायला हवे! नागपूर अधिवेशनात अननुभवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सहा दिवसांचे अधिवेशन हाताळले ते पाहता, विरोधी पक्ष नेत्यांना पुढील राजकारण सोपे नाही, हे लक्षात यायला हवे.

थोडासा तपशील वगळला तर कर्जमाफीच्या दोन्ही योजना सारख्याच आहेत. नियम-अटी शिथिल केल्याने लाभ घेणाºया शेतकºयांचा छळ होणार नाही, हीच अपेक्षा आहे; पण या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यास थोडा वेळ द्यावा लागेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे