शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

शेतीप्रश्नाविषयी महानोरांचा कळवळा

By admin | Published: December 31, 2016 4:44 AM

रानकवी ना.धों. महानोर यांनी शेती-पाण्याशी संबंधित ज्वलंत प्रश्न विधिमंडळात आग्रहीपणे मांडले. आता ते पुस्तकरूपाने आले.

- मिलिंद कुलकर्णीरानकवी ना.धों. महानोर यांनी शेती-पाण्याशी संबंधित ज्वलंत प्रश्न विधिमंडळात आग्रहीपणे मांडले. आता ते पुस्तकरूपाने आले. रानकवी ना.धों. महानोर यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेत १२ वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या भाषणांच्या ‘विधिमंडळातून’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते महानोरांच्या वाढदिवशी त्यांच्याच गावी-पळसखेडला झाले. शेती, कला, संस्कृती, साहित्य, सामाजिक, अभिभाषण, अर्थसंकल्प चर्चा असे विभाग ढोबळपणे या पुस्तकात करण्यात आले आहेत. १९७८मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून नियुक्त झाले. त्या काळातील महाराष्ट्रापुढील प्रश्न, विविध क्षेत्रांतील घडामोडी यावर या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश पडतो. दस्तावेज या अर्थाने या पुस्तकाचे मोल मोठे आहे. कृषिक्षेत्राचा विचार केला तर दुष्काळ, शेतमाल व बाजारभाव आणि जलसंधारण या विषयांवर खोलवर अभ्यास करीत सभागृहाचे लक्ष वेधले. दुर्दैवाने अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेत. १९७२च्या दुष्काळाचा संदर्भ अनेक भाषणांमध्ये येतो. दोन-तीन वर्षाआड अतिवृष्टी किंवा दुष्काळसदृश स्थिती निर्माण होत असते आणि या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी ठोस धोरण नसल्याने शेती आणि शेतकऱ्याची परवड होत असल्याचे महानोर नमूद करतात. लहरी निसर्ग, कमी पाऊसमान हे प्रश्न लक्षात घेऊन सिंचनाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. परंतु इंग्रज काळातील धरणातील पाणी सोडण्याचे वेळापत्रक अजूनही कायम आहे. कृषी विभाग, वीज मंडळ यांच्यात ताळमेळ नसल्याने पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचत नाही. पर्यायाने उत्पादनात घट येते. महानोरांनी नेमकेपणाने मांडलेल्या या समस्येला शेतकरी अजूनही तोंड देत आहे.कोरडवाहू शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी महानोर आग्रही आहेत. तात्पुरत्या मदतीपेक्षा निश्चित धोरण आखायला हवे. जिल्हा बॅँक, महसूल अधिकारी थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्याच्या दारी उभे असतात. या स्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ४० वर्षांपूर्वी त्यांनी कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती मांडली होती. त्याचे परिणाम आता शेतकरी आत्महत्त्येच्या रूपाने आपण पाहत आहोत. त्याची खंतदेखील त्यांनी उद्विग्नतेने मांडली आहे. ते म्हणतात, सरकारमधील पुरोगामी विचारांच्या माणसांनी शेतकऱ्यांना साथ न दिल्यास विधिमंडळात झालेली सुंदर भाषणे तशीच राहतील. शेतकऱ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्याकडे महानोरांनी लक्ष वेधले आहे. ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत; पण उत्पादन घटल्याने त्यापैकी २० टक्के लोक मजुरीसाठी स्थलांतर करू लागले आहेत. खान्देश तर स्थलांतराची समस्या कायम अनुभवत आहे. शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या संख्येने स्थलांतर होत असते. जग संशोधनात वेगाने पुढे जात असताना आपल्याकडे कृृषिक्षेत्रात संशोधन होत नसल्याकडे महानोरांनी लक्ष वेधले आहे. विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र व कोकण या विभागांसाठी कृषी विद्यापीठे स्थापन झाली. परंतु या विद्यापीठांमध्ये अपेक्षेनुसार संशोधन होत नाही. याउलट कृषिभूषण, शेतीनिष्ठ, प्रयोगशील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून शेती व्यवसायाला गती दिली आहे. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना सरकारने अलीकडे ‘जलयुक्त शिवार योजने’चा मोठा गवगवा केला. परंतु वसंतदादा पाटील यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या नावाने ही योजना सुरू केली, त्यात मृद व जलसंधारणाचा समावेश करण्याची मागणी महानोर यांनी त्यावेळी केली होती. मृदसंधारणाचा निकष बदलण्याचे त्यांनी सुचविले होते.राज्याचे शेतीधोरण हे केंद्र सरकारशी निगडित असून, या धोरणात बदल व्हायला हवा. कोरडवाहू शेतकरी, तेलबिया व फलोत्पादनाविषयी ठोस धोरण अवलंबायला हवे, अशी महानोर यांनी केलेली मागणी आजही कायम अशीच आहे. स्वत:ला भूमिपुत्र म्हणणारे राज्यकर्ते, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानणारी शासनव्यवस्था असतानाही शेती आणि शेतकऱ्याच्या नशिबी परवड कायम असल्याचे महानोर यांचे दु:ख आहे.