शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

पवार कुटुंबातील धाकली पाती

By यदू जोशी | Updated: April 2, 2024 12:21 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी दिलेल्या निधीने अनेकांना उपकृत केले. अनेकांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते आणि नेते होते अजित पवार.

 - यदु जोशीआपल्या राजकीय आयुष्यात कधी घेरले गेले नसतील इतके सध्या अजित पवार घेरले गेले आहेत. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शरद पवारांचे मोठे आव्हान समोर उभे आहे. पत्नी सुनेत्रा बारामतीतून लढत आहेत अन् समोर आहेत सुप्रिया सुळे. काका दिल्ली पाहायचे आणि दादा राज्य सांभाळायचे तेव्हा कसे सुखनैव चालले होते. दादांच्या फटकळ स्वभावाचेही कौतुक व्हायचे. राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतही दादांचा शब्द चालायचा. त्यांनी दिलेल्या निधीने अनेकांना उपकृत केले. अनेकांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते आणि नेते होते अजित पवार.

पहिले बंड, सकाळीच फडणवीसांबरोबर घेतलेली ती शपथ अन् मग दोनच दिवसात घेतलेली माघार... प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही विशिष्ट दिवस असतात की ते आठवावेसे वाटत नाहीत, बंडाचे ते दोन-तीन दिवस अजित पवारांसाठी तसेच असतील. २०१९ मध्ये योग जुळून आला; पण टिकला नाही मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडाने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवले. तसे या पक्षाला आणि पक्षातील सरदारांना सत्तेशिवाय राहणे जरा कठीणच जाते. आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. शरद पवार यांनी या सरदारांची मोट बांधली, आता अजितदादांनी तो वारसा चालविला आहे. बहुतेक सरदारांना भाजपसोबत जाणे वावगे वाटले नाही आणि भाजपनेही त्यांना पवित्र करून घेतले. शिंदे-फडणवीसांच्या साथीने अजितदादा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली. एक पाडाव तर त्यांनी पार केला; पण खरी आव्हाने अजून बाकी आहेत. 

काकांनी जन्माला घातलेला पक्ष पळविला अन् त्याची मालकी स्वत:कडे घेतली; पण स्वत:चे काय? हे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे आणि त्यासाठीच्या दोन परीक्षा आता येऊ घातल्या आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेची निवडणूक त्यांची परीक्षा पाहील. महायुतीत आपल्या वाट्याला आलेल्यांपैकी लोकसभेच्या किती जागा ते जिंकून आणून दाखवतात हे तर महत्त्वाचे असेलच; पण सर्वात महत्त्वाचे असेल ते हे की बारामतीचा गड कोण राखणार? गड आला; पण सिंह गेला असे होता कामा नये याची दक्षता घ्यावी लागेल. बारामतीच्या निकालाने एकाचवेळी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. पवारांच्या कुटुंबातील संघर्षात बारामतीकर जनता कोणासोबत आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक असेल. विजय शिवतारेंची समजूत काढणे, हर्षवर्धन पाटलांची मनधरणी, महादेव जानकर यांना परभणीत आपल्या कोट्यातून जागा देऊन बारामतीतील धनगर समाजाची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असे सगळे उपाय ते करत आहेतच. राजकीय डावपेच  आणि भावनिक राजकारण या दोन्हींमध्ये ते शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यावर कशी मात करतात यातच त्यांचाकस लागेल. 

इथे कोणाशी तुलना करायची नाही; पण अजितदादांना छक्केपंजे कळत नाहीत, ओठात एक पोटात दुसरेच हेही त्यांना नाही जमत.  स्पष्टवक्ते आहेत, वक्तशीरपणा हा त्यांचा आणखी एक गुण. शब्दाचे पक्के, प्रचंड स्टॅमिना, प्रशासनाचा गाढा अभ्यास, गुणग्राहकता हे गुणही आहेतच. या सगळ्या गुणांच्या सोबतीने ते बारामतीची अन् अन्य जागांची लढाई जिंकतात का यावर खूप काही अवलंबून असेल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४