शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आज महाविकास आघाडी महायुतीपेक्षा तगडी का आहे?

By यदू जोशी | Updated: June 28, 2024 06:56 IST

लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. त्यामुळे ३१x६=१८६ जागा पक्क्या असे होत नाही; तरीही आघाडीचे पारडे सध्या जड दिसते आहे.

यदू जोशी, सहयोगी संपादक

भाजपचे नेते, कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात लोकसभेतील पराभवानंतर भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट स्पष्ट दिसते. कालपर्यंत आपण ताकदवान होतो आणि आज अचानक शक्तिपात झाला, अशी त्यांची अवस्था भासते. पराभवानंतर रावसाहेब दानवे मराठवाडाभर फिरले, लहानमोठ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटले, काय काय चुकले ते विचारले. आपले ऐकले जात नाही, अशी पक्षात जी खंत आहे त्यावर फुंकर घातली. इतर नेतेही अशाच पद्धतीने लोकांना कान देतील तर चार महिन्यांत काहीतरी सावरले जाईल; नाहीतर काही खरे नाही, अशी भावना अनेकांची आहे. 

मराठवाड्यातील एक माजी मंत्री भेटले, त्यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपचे ते एकटेच आमदार आहेत; पण, लोकसभेचा उमेदवार देताना त्यांना एकदाही विचारले गेले नाही. असे बऱ्याच ठिकाणी घडले. दिल्लीला सगळे कळते हा आविर्भाव असल्याने स्थानिक आवाजाला किंमत राहिली नाही, त्याचा मोठा फटका बसला. एखादे कोडे हळूहळू उलगडते, तशी लोकसभेच्या पराभवाची एकेक कारणे समोर येत आहेत. भाजपमध्ये ब्लेमगेम सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्याजिल्ह्यांतून एकमेकांविरुद्ध अनेक तक्रारी पोहोचत आहेत. त्यांचे ऑडिट आणि मग त्या आधारावर कोणावर मोठी कारवाई होईल असे मात्र वाटत नाही. लोकसभेतील पराभवात कोणाकोणाचा वाटा आहे हे शोधून कारवाई केली गेली तर विधानसभेला अडचण येईल. विधानसभेपर्यंत सगळ्यांनाच दादा, भाऊ म्हणणे ही भाजपची मजबुरी बनली आहे. आतापर्यंत लोक भाजपमध्ये येत होते, आता भाजपमधून दुसरीकडे जातील, असे गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी लिहिले होते. त्याच्या चवथ्या दिवशी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील भाजप सोडून शरद पवारांसोबत गेल्या. 

भाजपमधील काही जणांबद्दल बरेच वाईटसाईट बोलले जात आहे. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते उद्या त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतीलही; पण एक लक्षात ठेवा, पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते, समाज यांचे समाधान तुमच्या युक्तिवादाने होत नसते. तुमचे वर्तन कसे आहे यावर लोक काय ते ठरवतात. “अरे! याच्याकडे एवढा माल आला कुठून?” असे कोणाबद्दल उगाच बोलले जात नाही. आग लागल्याशिवाय धूर निघत नसतो. काँग्रेसमध्ये अनेकांनी माया जमविली अन् श्रीमंत झाले, पक्षापेक्षा नेते मोठे झाले त्यांनी काँग्रेसचे जहाज बुडवले. महाराष्ट्रात काही जणांमुळे भाजपचे काँग्रेसीकरण होत आहे. दुसरीकडे पूर्वीच्या मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडत आहे, नेत्यांनी एकमेकांच्या काड्या करणे जवळपास बंद केले आहे. तिकडचे अवगुण भिंत ओलांडून इकडे येत आहेत; भाजपसाठी हा डबल धोका आहे. 

आपल्या जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात सोडाच आपल्या गावात, वॉर्डातही भाजप, महायुतीला लीड देऊ शकले नाहीत, त्यांना विधान परिषद हवी आहे. मराठवाड्यातील एका जिल्ह्यात भाजपच्या एका आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद घेण्यासाठी ‘व्यवहार’ झाला. ज्याला या व्यवहाराच्या आधारे पद मिळाले त्याने ४० वर्षे पक्षात घालविलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत केले; अर्थात हा ऐकीव किस्सा आहे.  भाजपच्या संघटनेची जबाबदारी असलेल्यांबाबत सर्वाधिक गंभीर तक्रारी मराठवाड्यातून आहेत. 

जागावाटपाची डोकेदुखीलोकांना शंका आहे की अजित पवार गट महायुतीसोबत राहील की नाही? ते भाजपसोबतच राहतील. आता त्यांना जाण्यासाठीचे ठिकाण तरी कोणते आहे? काकांना पूर्ण शरण जातील असे वाटत नाही. त्यांची अडचण अशी आहे की लोकसभेसारख्या कमी जागांवर त्यांनी समाधान मानले तर त्यांचेच काही लोक त्यांना सोडून मोठ्या साहेबांसोबत जातील. लोकसभेतील पराभवाने त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे, शिंदेंनी सात जागा आणल्याने त्यांची वाढली आहे. दोघांनाही जागा देताना भाजपची दमछाक होईल. शिंदेंनी लोकसभेवेळी ताणून धरले होतेच, आता विधानसभेला त्यांना अधिक जोर येईल. मध्यंतरी फडणवीस म्हणाले होते की, “मी एकनाथ शिंदे, अजित पवारांमध्ये ट्राफिक पोलिस आहे; एकाला रस्ता देतो मग दुसऱ्याला देतो, ट्राफिक जाम होऊ देत नाही.” जागावाटपाचे ट्राफिक कंट्रोल करताना भाजपला रेड सिग्नल न मिळो म्हणजे झाले. 

आघाडीचे मुख्यमंत्री कोण? महायुतीचे हे शेवटचे विधीमंडळ अधिवेशन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकले आहे. लोकसभेला १५५ जागांवर पुढे असलेली महाविकास आघाडी आता विधानसभेला आपणच असे गृहीत धरत आहे. त्यामुळेच प्रत्येकाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसेल असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. उद्धवसेनेला ते मान्य नाही. संजय राऊत स्पष्टच बोलले आहेत की ठाकरेच मुख्यमंत्री असतील. तिकडे नाना पटोलेंनाही मुख्यमंत्रिपद खुणावत आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असे सतेज पाटलांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्रिपद, जागावाटप यावरून आघाडीतही कुरबुरी होतील; पण, तुटेपर्यंत ताणले जाणार नाही. महाविकास आघाडीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले हे फेविकॉल का जोड आहेत, वरून राहुल गांधी आहेतच. महायुतीत शिंदे-फडणवीस-अजित पवार एकत्र दिसत असले तरी या तिघांपैकी कोणाला किती मोठे करायचे याची चावी दिल्लीच्या हातात आहे. हेही खरे की लोकसभेचे बरेच संदर्भ विधानसभेला बदललेले असतील. त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या म्हणजे ३१ गुणिले ६ म्हणजे  १८६ जागा पक्क्या आहेत असे होत नाही; पण, तरीही तीन पक्षांची एकजूट, लोकांचा मूड हे बघता ‘ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी’ असेच चित्र आहे. पराभवानंतर महायुतीला सत्ता राखायची आहे आणि विजयानंतर आघाडीला ती मिळवायची आहे हा फरक महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभा