शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

अधिक मुलांचे गणित! आंध्रचे चंद्राबाबू अन् तामिळनाडूचे स्टॅलिन यांच्या म्हणण्याचा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:04 AM

दोघाही पालकांना काम केल्याशिवाय संसार चालविता येत नाही. अशा अवस्थेत मुलांना जन्माला घालणे शक्य होत नाही.

भारत लोकसंख्येत गतवर्षी एप्रिलमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचला तेव्हा ही संख्या १४२ कोटी होती. अनेक वर्षे चीनचा प्रथम क्रमांक होता. त्या देशाने मोठी मोहीम राबवून लोकसंख्या वाढीचा वेग रोखण्यात यश मिळविले. भारतातदेखील प्रयत्न झाले. साक्षरता वाढली, शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले आणि आपल्या देशाची सर्वांत मोठी समस्या लोकसंख्या वाढ आहे, यावर सार्वजनिक एकमत झाले. तरीदेखील एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे सतरा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या भारताची आहे. तिच्या वाढीचा वेग एक टक्क्यापर्यंत खाली आला असला तरी वाढीतील चढउतार वेगवेगळी परिमाणे मांडताना दिसतात. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मुलांना जन्माला घाला, असे आवाहन दोन दिवसांपूर्वी केले. तेव्हा चर्चेची राळ उडाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी एका सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेताना वक्तव्य केले की, आपल्या तरुण-तरुणींनी मुले जन्माला घातली पाहिजेत.

भारताचा सरासरी जन्मदर कमी असला तरी दक्षिणेकडील प्रदेशात तो अधिकच कमी आहे. हे प्रमाण असेच राहिले तर दाक्षिणात्य प्रदेशांचा राजकीय भूगोल बदलून जाईल असा त्यांनी तर्क मांडला. हा तर्क बराच वास्तववादी आहे. आंध्र प्रदेशातील एका गावाचे उदाहरण देण्यात आले. त्या गावात केवळ वृद्ध जनताच आहे. तरुण वर्ग बाहेर पडला असणार आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील लोकसंख्या वाढ तुलनेेने कमी आहे. असंख्य घरांत राहायला कोणी नाही, गावात तरुण कमी, वृद्धांची संख्या अधिक आहे. कारण, या भागात उत्पादनाची साधने मर्यादित आहेत. रोजगार मिळत नाही.  कोकणवासीय नशीब अजमावण्यासाठी महानगरी मुंबई गाठतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार कमी झाली आहे. याचा अर्थ तेथील जन्मदर कमी असा होत नाही. लोक मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. आंध्र  प्रदेशाच्या त्या खेड्याची हीच अवस्था असणार आहे. जपानसह काही विकसित राष्ट्रे मुलांना जन्म घालणाऱ्या पालकांना प्रोत्साहन देतात. ती राष्ट्रे जरी विकसित असली तरी जगणं खर्चिक झाले आहे. नव्याने जन्माला येणाऱ्या मुलांचे पालन पोषण करणे सोपे राहिलेले नाही. भारतात तुलनेने अवस्था बरी आहे. त्याचवेळी तरुण-तरुणींना शिक्षण घेऊन स्थिरस्थावर व्हायला सरासरी तीस वर्षे जावी लागतात. उशिरा लग्ने होण्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो आहे. शिवाय दोघाही पालकांना काम केल्याशिवाय संसार चालविता येत नाही. अशा अवस्थेत मुलांना जन्माला घालणे शक्य होत नाही. आर्थिक, सामाजिक रचना बदलणारी धोरणे स्वीकारली जात  आहेत. त्यामुळे माणसाचे जगणे असह्य होत चालले आहे. ताणतणाव वाढतो आहे. अनेकांना शक्य असो-नसो, स्थलांतरित व्हावे लागत आहे.

दक्षिणेकडील जन्मदर राष्ट्रीय जन्मदराच्या सरासरीपेक्षा कमी आहे, असे मुख्यमंत्री स्टॅलिन सांगताहेत. मात्र, त्याची विविध  कारणे आहेत. ज्याप्रकारे समाजाला आकार दिला जात आहे, विकासाच्या नावाखाली मानवाच्या मूलभूत गरजा आणि हक्कांना डावलले जात आहे, त्याचा परिणाम नव्या पिढीवर होतो आहे. एखादी पदवी मिळविण्यासाठी चार-पाच वर्षे जातात. पदव्युत्तर पदवी प्रवेशाला वर्ष-दोन वर्षे जातात. उमेदीच्या किंवा प्रशिक्षणार्थी काळासाठी काही वर्षे घालून स्थिरस्थावर होईपर्यंत तिशी उलटते. त्यानंतर विवाह आणि मुलांना जन्म देईपर्यंत दमछाक होऊन गेलेली असते. विकसित राष्ट्रांच्या एक-दोन पिढ्यांनी हा अनुभव घेतला आहे.

आता भारत विकसित होत आहे. भारतानेही त्याच मार्गाने जाण्याचा चंग बांधला आहे. परिणामी, प्रजनन दरावर परिणाम होणार आहे. दक्षिणेकडील प्रदेशांनी सामाजिक सुधारणा केल्या, शिक्षण व्यवस्था अधिक चांगल्या राबविल्या. परिणामी समाज अधिक वेगाने प्रगती करू शकला. त्याचा परिणाम लोकसंख्येचा वेग कमी होण्यात झाला. तुलनेने उत्तर भारत मागास राहिल्याने लोकसंख्या वाढीचा दर अधिक राहिला. लोकसंख्या वाढ, प्रजनन दर, आदीचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी आहे. शिवाय कोणत्या प्रकारचा विकास करता यावरही अवलंबून आहे. त्याकाळी मागास असलेल्या तामिळनाडूच्या शिक्षित तसेच अशिक्षित लोकांचे लोंढे मुंबईकडे येत होते. गेल्या तीस वर्षांत हे स्थलांतर पूर्णत: थांबले. तोच तमिळनाडूचा माणूस आज विदेशात जातो आहे. हा सर्व दृश्य परिणाम समोर असताना त्यात सुधारणा न करता दक्षिण भारताची लोकसंख्या पुरेशी वेगाने वाढली नाही तर संसदेत तुलनेने कमी प्रतिनिधी मिळतील याची चिंता वाटणे अयोग्य आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTamilnaduतामिळनाडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश