शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

मनाचिये गुंथी - स्वमग्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2017 12:15 AM

आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते

- किशोर पाठक आपण माणूस आहोत. माणसाचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. म्हणजे आपण खूप चांगले आणि वाईटही असतो. सध्या मोबाईलमधील ते व्हॉट््सप ग्रुप बोकाळलेत. काही त्याला नावं ठेवतात. काही न बोलता ग्रुपमध्ये सामील होतात. काही नावं ठेवत ठेवत कॉमेंट करतात. पण प्रत्येकाला हजेरी लावावी वाटते. म्हणजे मी आहे बुवा, जिवंत आहे हे सांगायला सगळे असतात. काहींना स्वत:चे मेसेज, जोक्स सांगावे वाटतात. काहींना दुसऱ्यांचे उतारेच्या उतारे द्यावे वाटतात. कवितांचा तर सुकाळच म्हणावा. एवढे कवी जन्मतात, मिरवतात, विझतात, पण उत्साह कमी होत नाही. काहींना स्क्रीन बघून बघून डोळ्यांचे विकार होतात. त्याला दूर जावे वाटते. हे वाटते खरे पण आपण अ‍ॅनिमिक झालेय. मोबअ‍ॅनिमिया नावाचा नवा आजार फैलावतोय. मग एकदा लाखो माणसं वापरताहेत म्हटल्यावर त्याचा व्यापार आला. हायजॅक करणं आलं. हँग होणं आलं. एकवेळ फासावर टांगा, पण मोबाईल चालू हवा. आपण त्या वाचून जगू शकत नाही. केवढा प्रचंड व्यवहार चालतो यात. हजारो कंपन्या, त्यांचे ब्रँड, जाहिराती सकाळचा मोबाईल दुपारी शिळा. २जी, ३जी, ४जी अजून किती जी होतील कठीण आहे. यात हजारो तरुणांना रोजगार मिळतो. स्क्रीनवर दु:ख, सुख, हास्य, गंभीर, बातम्या, गाणी, शेरोशायरीचा तर धुडगूस साऱ्या भावना नीट पोहोचतात. एक नक्की जग जवळ आलं, प्रगत झालं. पूर्वी परदेशात गेलेल्या मुलाला ठराविक वेळी, फोनजवळ बसून कमी वेळ बोलावं लागायचं. त्यात बाबा दरडावायचे, आई दृष्ट काढायची, ताई हट्ट करायची, पण हे सारं तेवढ्याच वेळात. मग फोन ठेवताच घरातच तू-तू-मैं-मैं. मला हे बोलायचं होतं राहून गेलं. माणसाला राहून गेल्याची चुटपुट जे केलं त्यापेक्षा जास्त लागते. म्हणजे अलीकडे तर ९८ टक्के मार्क मिळाले तर आईबाबा दोन टक्के कुठे गेले विचार करीत बसतात. म्हणून मोबाईल हे अस्त्र आहे ते द्या कुणाच्या हातात. ते शस्त्र होतं. मग स्क्रीनवर मेसेज सुरू. हे करू नका, ती साईट ओपन करू नका. आपण ज्ञानवृद्धीसाठी त्याचा किती वापर करतो ते महत्त्वाचे. पण माणूस आपल्या मूडप्रमाणे मोबाईल खेळवतो, मला खेळ हवा खेळ. मला गाणं हवं गाणं पण, आताशा मोबाईल खेळवतो आपल्याला. तो बंद स्क्रीन आपल्याला वाकुल्या दाखवतो. सलग दहा मिनिटं मी मोबाईल पाहिला नाही म्हणजे भयंकर गुन्हा झालाय, असा चेहरा होतो. एक विलक्षण स्वमग्नता आलीय या हत्याराने. माणूस एकटा कुणाशीही न बोलता स्क्रीनवर असतो. तो हळूहळू एकांतवासी होतोय, पण त्याला हे माहीत नाही तो स्क्रीनवरल्या कल्लोळात एकटा एकाकी होत चाललाय. तो इतरांना हाक मारताना स्वत:ला बोलवत नाही, ऐकत नाही हे वाईटच म्हणावे की चांगले, चला धावा नवा अ‍ॅप आलाय!