शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

मराठा-दलित एकीचे प्रयत्न

By admin | Published: September 14, 2016 10:57 PM

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती; परंतु आरोपीची ‘डीएनए’ तपासणी व इतर अनेक पुरावे जमा केले जात असल्याने विलंब लागला. अर्थात, मुख्य आरोपीला फाशीच होईल, एवढे सबळ पुरावे आम्हाला मिळत असल्याचा दावा पोलीस करीत आहेत. कायद्याच्या पातळीवर हे प्रकरण पुढे सुरु राहील. पण, या निमित्ताने मराठा-दलित या दोन समाजात निर्माण होणारा विसंवाद संपणार कसा, हा प्रश्न आहे. मराठा समाजात प्रचंड असंतोष दिसतो आहे. येत्या २३ तारखेस नगरलाही मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. कोपर्डी घटनेमुळे मोर्चांची सुरुवात झाल्याने राज्यातील सर्वाधिक गर्दी येथील मोर्चाला जमेल, अशा पद्धतीने नियोजन सुरु आहे. मोर्चांचे वैशिष्ट्य हे की त्यांना कुणीही एक नेता नाही. सामूहिक नेतृत्व आहे. शिवाय हे ‘मूक’ मोर्चे आहेत. गत आठवड्यात नगरला झालेल्या बैठकीत सर्व आमदार देखील व्यासपीठाच्या खाली बसले होते. कुठल्याही प्रसिद्धी पत्रकात नेत्यांची नावे टाकली जात नाहीत. नेत्यांनी स्वत:चा बॅनर लावायचा नाही, स्वत:चे नाव वापरायचे नाही, अशी अचारसंहिता ठरली आहे. शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. महिला, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या घटकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या निमित्ताने मराठा समाज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे तंत्र म्हणूनही हा मोर्चा एक अभ्यासाचा विषय आहे. मोर्चाचे नियोजन आज तरी शांततेत सुरु आहे. मात्र, याच दिवशी दलित संघटनांनी सद्भावना रॅली काढण्याची घोषणा केल्याने प्रशासनासमोर पेच आहे. दोन समाजघटक एकाच दिवशी रस्त्यावर आले तर तणाव वाढू शकतो. अर्थात काही दलित नेत्यांनी याबाबत समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्या विरोधात दलितांनी प्रतिमोर्चा काढणे गैर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही स्थानिक दलित नेतेही याच मताचे आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, हा एक विषय वगळता आम्हीही मराठा समाजासोबत आहोत, असेही दलित नेत्यांनी जाहीर केले आहे. मराठा संघटनांनीही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची नव्हे तर या कायद्याचा गैरवापर रोखण्याची आमची मागणी असल्याचा खुलासा केला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकाचा आदर करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. रामदास आठवले यांनी शिर्डीत सात आॅक्टोबरला ‘मराठा-ऐक्य’ दलित परिषद घेण्याचे ठरविले आहे. या परिषदेत मराठा नेत्यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे नगरपासून दुभंगलेली मने पुन्हा सांधायला येथूनच सुरुवात होईल, अशी आशा अनेकांना आहे. सर्व जाती संघटीत होत असताना मराठा समाजात आजपर्यंत एकी दिसत नव्हती. ती या निमित्ताने दिसली. मराठा समाजातही प्रचंड विषमता आहे. ठराविक लोकांकडेच राजकीय सत्ता आहे. ते नात्यागोत्याचे पाहातात. सर्वसामान्य मराठा वर्गासमोर शेतीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. शेतमालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत. ती खदखद तरुणांत आहे. कोपर्डीच्या निमित्ताने हा सगळा असंतोष उफाळून आला आहे. ही अस्वस्थता आता मराठा नेत्यांसह सर्वांनाच समजून घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या एकीकरणाने खुद्द मराठा नेतेही हादरलेले दिसतात. त्यामुळेच ते संघटनांच्या बैठकांत सामील होत आहेत. मोर्चांसाठी देणग्या देण्याची त्यांची तयारी आहे. आजपर्यंत या नेत्यांनीही समाजाला गृहीत धरले. या मोर्चांतून कदाचित नवीन नेतेही उभे राहतील. हा दलित-मराठा असा वाद नाही, त्याला अनेक पदर आहेत. - सुधीर लंके