शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

मराठीचे चित्र धूसर

By admin | Published: December 20, 2014 6:53 AM

महाराष्ट्रात गर्जणा-या ठाकरी भाषेच्या तेजाखाली तयार झालेल्या शिवसेनेच्या मावळ्यांनी दिल्लीत मात्र मराठीपणाला रजा दिली आहे

रघुनाथ पांडे, विशेष प्रतिनिधी, लोकमत समूह, नवी दिल्ली - महाराष्ट्रात गर्जणा-या ठाकरी भाषेच्या तेजाखाली तयार झालेल्या शिवसेनेच्या मावळ्यांनी दिल्लीत मात्र मराठीपणाला रजा दिली आहे. लोकसभेत हे शिवसेनेचे खासदार मराठी तर सोडाच, मराठीची मावशी असलेल्या हिंदीलाही दूर ठेवतात. मराठी खासदार हिंदीतून उत्तम व भावपूर्ण बोलतात. शहिदांवरील चर्चेत अरविंद सावंत यांनी ते दाखवून दिले; पण हेच सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ झोपडपट्ट्यांचेही प्रश्न सभागृहात इंग्रजीतून मांडतात. ‘बॉम्बे हायकोर्टाचे’ नाव ‘मुंबई हायकोर्ट’ करा अशी मागणी करायची, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरायचा आणि प्रश्न मात्र इंग्रजीतूनच मांडायचे, असे मराठीचा जयजयकार करणाऱ्या शिवसेनेकडून आता घडत आहे. सभागृहात अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी एका उत्तरात चक्क ‘बंबई’म्हटले तरी त्याला कोणीच आक्षेप घेतला नाही.!! मंत्र्यांना कळावे म्हणून हे लोक इंग्रजीतून बोलतात, असे लंगडे समर्थन केले जाते. यामुळे मराठी भाषेच्या बेगडी प्रेमाचा उमाळा तर शिवसेनेला येत नसावा ना, असा प्रश्न पडतो. देशातील अन्य खासदार त्यांच्या-त्यांच्या राज्यांच्या भाषेतून आपले प्रश्न मांडतात. ज्या झोपडपट्टीधारक मराठी माणसांच्या जीवावर विधानसभा व लोकसभा शिवसेनेने पादाक्रांत केली, निदान त्यांचे तरी प्रश्न मराठीत मांडावयास हवे होते. नाशिकच्या गारपीटग्रस्तांचा विषय मराठीतूनच बोलू द्या, अशी विनंती खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना केली आणि त्यांनी मराठीतच हा विषय मांडला. एरवी सुळेसुद्धा इंग्रजाळलेल्याच असतात; पण संबंधित घटकाला कोणती भाषा कळते, ते अचूक हेरून त्यांनी पवारनीती पाळली. शेतकरी, बागायतदारांचा व त्यापेक्षाही राष्ट्रवादीच्या राजकारणाचा गड असलेल्या भागातील लोकांचा हा प्रश्न लोकसभेत मांडल्याचा आनंद साहजिकच नाशिकपट्ट्यात झाला. त्यांचे भाषण संपले आणि सोशल साइटवर भाषणाच्या क्लिप्स व त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कोणता विषय कशा पद्धतीने ‘कॅश’करावा ही मोदीनीती सुप्रियांनी चांगलीच अंगिकारली आहे. शरद पवारांंनी अलिबागच्या कार्यकर्ता कार्यशाळेत पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, तेव्हा ‘आपण आता सोशल माध्यमांचा वापर केला पाहिजे, तेव्हाच पक्ष व आपण तग धरू’ असे मोठे पवार म्हणाले होते, त्यांच्या या सूचनेचे पालन सुप्रियांनी तत्काळ केले. शिवसेनेच्या भावना गवळी यांनी कापसाचा भाव, चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे ‘आयआयएम’, काँग्रेसचे राजीव सातव यांनी हिंगोलीच्या दुर्दशा झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय, भाजपाचे नाना पटोले यांनी ओबीसीच्या जागांचा, सुनील गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या कृषिमाफीचा विषय हिंदीतून जोरात मांडला. राज्यसभेत खा. संजय राऊत अनेक वर्षे ‘हिंदीतून’च शिवसेनेची भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांचा जगभर आवाज घुमतो; पण लोकसभेत सारेच इंग्रजाळलेले ! शिवसेना सदस्य आता अभ्यास करून सभागृहात येतात, अनेक उत्तम विषय सभागृहात मांडतात, पण त्याची चर्चाही कुठे होत नाही. पंतप्रधान अमेरिकेपासून भुतानपर्यंत हिंदी भाषेतूनच भाषण करतात, मत व विचार मांडतात. त्यावर टीकाही होत ते पण त्यांच्या मोदीमय लोकप्रियतेचे वलय त्यांच्या भाषाप्रेमात दडलेले आहे, हे लपून नाहीच. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सभागृहात कैकदा हिंदीतूनच उत्तरे देतात. काँ्रग्रेसचे पुढारी इंग्रजीतून बोलतात, त्यामुळे पक्षाचे विचार, यूपीए सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत नीट पोहोचल्या नाहीत, असा एक निष्कर्ष निवडणुकीच्या पराभवाची मीमांसा करताना काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेसजन ‘हिंदी अपनी राष्ट्रभाषा है.’असे म्हणू लागले. गुजरातचे खासदार एकतर हिंदी किंवा गुजरातीतून, तमिळनाडूचे खासदार अखंड ‘अम्मा’चे नामस्मरण करून, तमिळमधूनच बोलतात. त्यांच्या अम्मा या शब्दावर अनेकजण छद्मी हसतात; पण ते काहीही झाले तरी भाषा व नेत्यांबद्दलचा आदर व्यक्त करतातच. बंगाली मोशाय तर ‘दीदी’असा घोषा लावून बंगालीचा बिनदिक्कत वापर करतात; पण महाराष्ट्राचे सदस्य पीठासीन असले, की असे चित्र दिसतेच असे नाही. दोनच आठवड्यांपूर्वी भाषा, बोली, लिपी व ग्रंथ संवर्धनाचा विषय सभागृहात गाजला. बाके वाजली, कौतुक झाले. असे असले तरी दिसणारे मराठीचित्र धूसर आहे.