शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पदकाचा अवमान

By admin | Published: May 10, 2016 2:33 AM

प्रतिष्ठा, पद आणि सन्मान लाभल्यानंतर तो स्वीकारताना जो तो आता आमची जबाबदारी वाढली असे भाषण झोडून मोकळा होतो.

प्रतिष्ठा, पद आणि सन्मान लाभल्यानंतर तो स्वीकारताना जो तो आता आमची जबाबदारी वाढली असे भाषण झोडून मोकळा होतो. त्यातील काही जण या शब्दांशी प्रामाणिक राहून वागण्या-जगण्यात जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रयत्न करतातही; पण काहींच्या लेखी केवळ पैसा हाच सर्वश्रेष्ठ असल्याने अन्य गोष्टींना ते दुय्यम मानतात. या गोष्टी त्यांच्या दृष्टीने दुय्यम असल्या तरी त्यांचा हव्यास त्यांना असतोच. त्यासाठी कोठे, कधी आणि कोणाकडे ‘फिल्डिंग’ लावावी यात ते माहीर असतात. गल्ली-बोळातील सन्मान, पुरस्कार ठीक आहेत; पण राष्ट्रपतींसारख्या देशाच्या प्रथम नागरिकाच्या हस्ते गौरविला गेलेला अधिकारीच लाच घेण्याच्या भानगडीत अडकत असेल तर यास काय म्हणावे? वाईचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांना ड्रग्ज तस्करी खटल्याप्रकरणी हस्तकाकरवी पाच लाखांची लाच स्वीकारल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. याच अधिकाऱ्याला पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी चार वर्षांपूर्वी राष्ट्रपतिपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. या लाचखोरीमुळे राष्ट्रपतींनी दिलेल्या पदकाचाच जणू अवमान झाला आहे. वास्तविक ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य ज्या पोलीस दलाचे आहे, त्यांनी जनतेचे मित्र बनून समाजातील वाईट प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. परंतु अपवाद वगळता गुन्हेगारांचा तपास करता-करता पोलिसांमध्येच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागली आहे. फिर्याद द्यायला येणाऱ्यांवरच प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याने सर्वसामान्य लोक अनेक घटना ठाऊक असतानाही ‘नको ही डोकेदुखी’ म्हणत पोलीस ठाण्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. पूर्वी खाकी वर्दीविषयी समाजात धाक, दरारा आणि आदरयुक्त भीती होती. आता ती उरलेली नाही, यास पोलीस दलातील कुप्रवृत्तीच कारणीभूत असल्याच्या घटनांनीच हे अधोरेखित केले आहे. कोणत्याही प्रकरणात उघडपणे पैशांची मागणी होऊ लागली आहे. कुंपणानेच शेत कुरतडायला सुरुवात केली तर न्याय मागावा कोणाकडे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.