शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

मिली ‘भगत’

By admin | Published: August 31, 2016 4:40 AM

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते.

गोष्ट पाच-सहा महिन्यांपूर्वीची आहे. मराठवाडा दुष्काळाने पिचला होता. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गावोगाव फिरत होते. एका ठिकाणी बोलताना नानाने मुद्दा उपस्थित केला की, महाराष्ट्रातील श्रीमंत देवस्थानांनी दुष्काळग्रस्तांना मदत करावी. या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला हे माहीतच आहे. नानाच्या या आवाहनाची आठवण तुळजापूर येथील भवानी मातेच्या दानपेटी घोटाळ्याच्या सीआयडी अहवालानंतर आली. हा गाजलेला देवस्थान घोटाळा आहे. असुरांचे निर्दालन करणारी भवानी घोटाळेबाजांच्या कोंडाळ्यात अडकली. प्रवीण गेडाम या जिल्हाधिकाऱ्याने हा घोटाळा बाहेर काढला. या घोटाळ्याचा तपास अहवाल सांगतो की, ३९ किलो सोने आणि ६ क्विंटल ८ किलो चांदी एवढा ऐवज गडप केला गेला आहे. बाजारभावाने याचे मूल्यांकन ७ कोटी १९ लाख रुपये होते.आपल्याकडे माणसाचे जीवनमान उंचावते की नाही हा प्रश्न असला तरी कोणत्याही देवस्थानांची श्रीमंती झपाट्याने वाढताना दिसते. म्हणूनच अशी देवस्थाने ताब्यात राहावीत असा धनदांडग्यांचा प्रयत्न असतो. सरकारचे नियंत्रण असणाऱ्या सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या व्यवस्थापन समित्यांवर वर्णी लागण्यासाठी तर साठमारी सुरू असते, म्हणजे श्रीमंत देवस्थानांच्या कमिटीवर जाण्यासाठी सारेच राजकीय भगत उतावीळ असतात. तुळजाभवानी मंदिरातील घोटाळ्यात सीआयडीने ११ आयएएस अधिकारी, ९ उपविभागीय अधिकारी, ९ तहसीलदार, ८ माजी नगराध्यक्ष, १० ठेकेदार, १४ कारभारी आणि १ आमदार अशा ६२ जणांवर ठपका ठेवला आहे. १९९१ ते २००९ या काळातील दानपेटी घोटाळ्याची सुरुवात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या निर्णयानंतर झाली. दानपेटीचा लिलाव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मंदिराचे उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा उद्देश होता, पण रिंग पद्धतीने लिलाव सुरू झाले आणि सर्व संमतीने ते चालले. मंदिराचे उत्पन्न वाढण्याऐवजी या कोंडाळ्याचे वाढले. कारण येथे तर भगतांचीच मिलीभगत झाली होती.तुळजाभवानीच्या केवळ दानपेटीवरच डल्ला मारला गेला नाही, तर इनामी जमिनीसुद्धा अशाच घशात घातल्या आहेत. या देवस्थानाची उस्मानाबाद, बीड, सोलापूर आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये ३८५५ एकर जमीन आहे. यातील ११७१ एकर वाकोजी बुवा मठाला, १९४१ एकर भारतीबुवा मठ, ६९१ एकर प्रकाशनाथ मठ, ५२ एकर हमरोजी बुवा मठ अशी दिली आहे. या मठांच्या महंत, पुजाऱ्यांनी भक्तांना मोफत सेवा, भोजन द्यावे, मंदिराची झाडझुड, नंदादीप आदी व्यवस्थेसाठी निजामाने दिली होती. इनामी जमीन विकता येत नाही, तिला कुळ लागत नाही आणि ती हस्तांतरितही करता येत नाही, असा कायदा असताना २६३ एकर जमिनीचे फेरफार करण्यात आले. ६३ एकर जमिनीला कुळ लागले. काही जमिनी खालसा झाल्या, कारण येथेही मिलीभगत. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी सेवेकऱ्यांवर ठपका ठेवला. हे प्रकरण आता औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेले. परवा याच्या चौकशीची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात झाली. हे तुळजाभवानीचे प्रकरण महाराष्ट्रात वानगीसारखे आहे. या राज्यात असे देवस्थान नसेल ज्याचा तंटा न्यायालयात गेला नाही. श्रद्धेच्या मांडलेल्या बाजाराचा हा नमुना राज्यभर पाहायला मिळतो. याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यमांची कोंडी करण्यासाठी धर्ममार्तंड पुढे येतात, हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्र निमूटपणे पाहत असतो. श्रीमंत देवस्थाने, मठ ही केवळ भक्तीची ठिकाणे राहिली नाहीत. पैशापाठोपाठ येथे हितसंबंध आले, रुजले आणि त्याच्या गाठी तयार झाल्या. त्याला राजकीय खतपाणी मिळाले. अशा शक्तिपीठांचा आणि धर्ममार्तंडाचा निवडणुकीत राजकीय पक्षाकडून होणारा वापर आपण पाहतोच. कारण येथेही राजकीय नेते आणि मठाधीशांची मिलीभगत असते. ईश्वराला काय पाहिजे दोन हात आणि तिसरे मस्तक, असे समजणाऱ्यांचा काळ संपला. आता भगत-भोप्यांचा कल्लोळ तेवढा उरला.- सुधीर महाजन