शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींचा ‘तिहार’ इशारा कोणाकडे? गोंदियातील सभेतलं खळबळजनक वक्तव्य

By राजा माने | Updated: April 4, 2019 05:52 IST

जमलेल्या गर्दीची नस पकडत सभा गाजविण्याच्या शैलीबरोबरच राजकारणात नव्या विषयांना चर्चेसाठी वाट करून देण्याची नवी स्ट्रॅटेजी २०१९ च्या लोकसभा निवडणूक भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांनी अवलंबिल्याचे दिसते.

राजा माने 

गोंदिया : जमलेल्या गर्दीची नस पकडत सभा गाजविण्याच्या शैलीबरोबरच राजकारणात नव्या विषयांना चर्चेसाठी वाट करून देण्याची नवी स्ट्रॅटेजी २०१९ च्या लोकसभा निवडणूक भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांनी अवलंबिल्याचे दिसते. मोठ्या जोशात एखादा संवेदनशील विषय छेडणे आणि त्या विषयाचा नेमका अर्थ लावण्यात तर्क-वितर्कांच्या फेऱ्या झडविणे, ही त्यांच्या भाषणाची खासीयत ठरू लागली आहे. विदर्भात प्रचाराचे पहिले पाऊल टाकताना वर्धाच्या सभेत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर थेट हल्ला चढवून वादाला आणि चर्चेला एक विषय दिला. खरे तर पंतप्रधानांनी २०१४ साली दिलेल्या वचनांचा आणि देशाला दाखविलेल्या स्वप्नांचा हिशेब प्रचारसभांमधून द्यायला हवा.

प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. प्रत्येक भारतीयाच्या खिशात १५ लाख रूपये जमा करण्याचा विषय पद्धतशीरपणे विसराळी पाडला जातो. नरेंद्र मोदी हे तर भारतीय जनता पक्षाचे सुपरस्टार प्रचारक ! त्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभा गाजवायला सुरूवात केली आहे. त्यांची २०१४ ची जादू पुन्हा चालणार का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र जनताच देवू शकते. पण आपली जादू चालावी म्हणून मोदी ज्या-त्या राज्यात संभ्रम आणि चर्चेला विषय मात्र प्रत्येक सभेतून देवू लागले आहेत. वर्धा आणि गोंदियाच्या सभेने महाराष्ट्राला तो अनुभव दिला. भाजपचे बिनीचे शिलेदार असलेले नेते राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि विशेषत: अजित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाईंचे अंदाजित वेळापत्रकच देवू लागले आहेत. तर आता त्यांचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान मोदीही तशाच विषयांवर आपल्या भाषणातून फुं कर घालू लागले आहेत. गोंदियाच्या सभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडालेली आहे हे सांगताना त्याचे कारणही सांगून टाकले. तिहार जेलमध्ये जे आहेत ते काही बोलले तर कसे ? या प्रश्नाच्या धास्तीनेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आता प्रश्न उरतो तो हा की तिहार जेलमध्ये कोण आहेत ? ते राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल नक्की काय सांगतील याची भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते ?

देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याला गांभिर्याने घेतलेच जाते. आता नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उडालेल्या झोपेबद्दल आणि तिहार जेलच्या इशाऱ्याबद्दल केलेले वक्तव्य करमणूक म्हणून घ्यावे की तो कुणाला तरी दिलेला गर्भित इशारा म्हणून घ्यावे ?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार