शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

महावितरणचे दिवाळे; एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 7:18 AM

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी ...

महाराष्ट्रातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे पुरते दिवाळे काढण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधलेला आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्तम वीजमंडळ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता. त्याचे वेळेवर विभाजन केले नाही. केल्यानंतर त्या महावितरण कंपनीला ताकद दिली नाही. आलटून पालटून सत्तेवर येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या सरकारने कधी शेतकरी हिताचा, तर कधी घरगुती ग्राहक हिताचा पुळका घेऊन महावितरण कंपनीलाच अडचणीत आणण्याचे राजकारण केले.

विधानसभेत परवा पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सारे जण महावितरणवर तोंडसुख घेत होते. सर्व नाटके करता येतील, पण पैशाचे नाटक कसे करणार? काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवरून गेले तेव्हा महावितरणची थकबाकी १४ हजार कोटी रुपये होती. भाजपचे सरकार आले आणि नव्या ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे विजेची थकबाकी असली तरी कनेक्शन तोडणार नाही, अशी घोषणा केली. महावितरणची वसुली थांबली. भाजप सरकार सत्तेवरून पायउतार होत असताना १४ हजार कोटी रुपयांची थकबाकी ५४ हजार कोटींवर गेली. चाळीस हजार कोटींची भर घालून पुन्हा थकबाकी असू द्या, पण शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असे ओरडून भाजपचे नेते सांगत होते.

शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा, पण विजेचे पैसे कोणी भरायचे? थकबाकी असताना महावितरण चालवायचे कसे, याचे उत्तर महाराष्ट्रात तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेला द्यावे. अशा प्रकारच्या व्यवहाराने महावितरण कंपनी चालणार आहे का? महावितरणची थकबाकी ६४ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून दाेन वर्षांत दहा हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. शेतकऱ्यांनी विजेचे पैसे दिले नाही तरी वीजपुरवठा खंडित करायचा नसेल, तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून ही थकबाकी भागवावी. स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती ते महापालिकांपर्यंत) पथदिवे आणि पाणीपुरवठ्यासाठी विजेचा वापर करते, ती थकबाकी नऊ हजार अकरा कोटी रुपयांवर गेली आहे. या सर्व संस्थांवर सरकारचे नियंत्रण असते.

सरकारी अधिकारी तेथे प्रशासक असतात. या संस्था जो महसूल गोळा करतात, त्यातून विजेचे बिल आधी बाजूला काढून महावितरणला द्यावे, असा आदेश देण्याचा आग्रह आमदार का धरीत नाहीत? सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांच्या मागणीच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलानंतरही पुढील तीन महिने वीजतोडणी करायची नाही, ज्यांची वीजतोडणी केली आहे, ती पण पूर्ववत जोडून द्यायची, असा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देऊन टाकला आहे. शेतीला लागणाऱ्या विजेचे पैसे देऊ शकत नसतील तर त्याची कारणे शोधून काढावीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या वायद्याचे २०२२ हे वर्ष आहे. कारण तसे आश्वासन दिले होते. महावितरणचे अधिकारी सांगत होते की, विजेचे पैसे न भरणाऱ्यांची वीज कायमस्वरूपी खंडित केली आहे. त्यांच्याकडे ६ हजार ४२३ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांकडे ४४ हजार ९२० कोटी रुपये थकीत आहेत. काही शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत एक पैसाही महावितरणला दिलेला नाही. अशाने एका मोठ्या महावितरण कंपनीचे दिवाळे निघणार आहे. ज्या आमदारांनी ऊर्जामंत्र्यांवर हल्लाबोल केला आणि थकबाकी असतानाही वीजतोडणीस विरोध केला, त्यांनी आपल्या मतदारसंघातील थकबाकीच्या वसुलीची जबाबदारी स्वीकारावी.

आज खासगीकरणाचा आग्रह सर्वच क्षेत्रांत धरतात. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर आणि शेतकरीवर्गाला थकबाकी असतानाही वीजपुरवठा कोणती खासगी वितरण कंपनी करणार आहे? मुंबई-ठाण्यासारख्या शहरातील विजेच्या वितरणाचे खासगीकरण झाले आहे. नंदुरबार, गडचिरोली किंवा नांदेडच्या किनवट या ग्रामीण टोकापर्यंत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यायला कोणी खासगी कंपनीवाले पुढे येतील का? हा धोका वेळीच ओळखून महावितरण कंपनी अधिक कार्यक्षम कशी होईल याचा विचार गांभीर्याने करायला हवा. शेतकऱ्यांना माफक, मुबलक आणि नियमित वीजपुरवठा करायला हवा. मात्र, त्याचे पैसे त्यांनी भरावेच, त्यांना शक्य नसेल तर सरकारने ती जबाबदारी स्वीकारावी. थकीत कर्जे माफ करताना संबंधित वित्तीय संस्थांना सरकार पैसा देते, कर्जमाफी म्हणजे कोणीच कोणाचे देणे लागत नाही, असे जाहीर करणे नव्हे. तेव्हा महावितरणला दिवाळखोरीत काढू नका!

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज