शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

माझं माहेर खान्देशचं, सासर विदर्भातलं; बाबूजींनी ही दोन्ही नाती सांभाळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 11:12 IST

राजकारणामध्ये प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक नेते, कार्यकर्ते असतात. पण, राजकारणातली तत्त्वनिष्ठा आणि विचार ठाम असलेले मोजके नेतेच प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठतात, अशा नेत्यांमध्ये मी जवाहरलालजी दर्डा यांचा उल्लेख आवर्जून करीन.

प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती -

जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे आणि आमचे अगदी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक  संबंध होते. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंदिरा काँग्रेस संकटात असताना आम्ही एकनिष्ठेने पक्षासाठी काम केले. आम्ही विरोधी पक्षात एकत्र काम करत असताना आमचे तेव्हाचे असलेले विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्ष सोडून गेले होते. तेव्हा ‘मी विधानसभेतील विरोधी पक्षनेता व्हावे’ यासाठी बाबूजींनी मला आग्रह केला. त्यांच्या आग्रहाने मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली आणि मी निष्ठेने पार पाडली. बाबूजींची पक्षाबद्दल असणारी निष्ठा अतुलनीय होती. त्यावेळी इंदिरा काँग्रेसची महाराष्ट्रातील परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. आम्ही काही लोकच पक्षाचे निष्ठेने काम करत होतो. त्यातही काही इतर पक्षांतून प्रलोभने दाखवून पक्ष दुबळा करण्याचा प्रयत्न केला जात होता. बाबूजींनाही याबाबत खूप प्रलोभने दाखवण्यात आली होती; पण ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिल्लीतही त्यांना आदराची वागणूक मिळत असे. 

राजकारणामध्ये प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक नेते, कार्यकर्ते असतात. पण, राजकारणातली तत्त्वनिष्ठा आणि विचार ठाम असलेले मोजके नेतेच प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठतात, अशा नेत्यांमध्ये मी जवाहरलालजी दर्डा यांचा उल्लेख आवर्जून करीन. इंदिरा गांधी यांच्या संकटकाळामध्ये बाबूजी विदर्भात इंदिराजींच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले.  इंदिराजींसाठी संपूर्ण विदर्भ त्यांनी अक्षरश: घुसळून काढला. ‘लोकमत’मधून  इंदिराजींचा आणि काँग्रेसचा विचार घराघरांत  पोहोचवला, त्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास निर्माण करण्याचे श्रेय जवाहरलाल दर्डा यांना आहे. राजकारणात किती निर्लेप राहता येते, हेही त्यांनी दाखवून दिले. राजकीय विरोधाचे त्यांनी द्वेषात रूपांतर केले नाही, त्यामुळे त्यांच्याभोवती सदैव मित्र जमा झाले. शत्रूचे मित्रत्वात रूपांतर करण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. 

बाबूजी आणि माझा स्नेह ‘सासर आणि माहेर’ अशा दोन्ही ठिकाणी आला. माझं माहेर खान्देशचं. जळगावातून त्यांनी १९७७ साली ‘लोकमत’चे प्रकाशन सुरू केलं. माझं सासर विदर्भातील अमरावतीचं. बाबूजींची  राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेतील सगळी कारकिर्द विदर्भातूनच सुरू झाली. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं बहीण-भावाचंच होतं. 

ते अकाली गेले याचं दु:ख मला कायम वाटतं. बाबूजी गेले तेव्हा एक आधारवड हरपल्याचीच आम्हा सर्वांची भावना होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना  अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलcongressकाँग्रेस