शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचं असं का होतं?... राष्ट्रवादी का वाढते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 05:20 IST

तळातला शिवसैनिक कडवा आहे; पण आपल्या गावात राष्ट्रवादीवाल्यांना निधी मिळतो, असं तो पाहतो तेव्हा त्याचं मन खट्टू होतच असणार!

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमतनगरपंचायतींच्या निवडणूक निकालात ज्या ठळक गोष्टी समोर येतात, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली दिसते. सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. चार पक्षांच्या तुलनेत भाजप अव्वल क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये सत्ता असतानाच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होणे साहजिक आहे. तरीही तीन पक्षांचे सरकार असताना विरोधी पक्षात राहूनही इतर तिघांपेक्षा अधिक यश मिळविणे ही भाजपची उपलब्धी आहे. तीन तगडे पक्ष सत्तेत असल्यानं भाजप अगदीच माघारला असं आतापर्यंत बहुतांश निवडणुकांत झालेलं नाही. भाजपकडे स्वत:ची मोठी यंत्रणा आहे. गावोगावचं संघाचं नेटवर्क त्यांच्या दिमतीला असतंच. एखाद‌्दोन  पराजयांनी नाउमेद न होता कार्यकर्ते काम करत राहतात. एखाद्या झाडाला एका वर्षात फळ लागतं, एखाद्या झाडाला पाच वर्षांनी लागतं, असं समजत ते फळाची वाट पाहत राहतात. एखाद्या जागेवर हरले तरी मतदान गेल्या वेळेपेक्षा दुपटीनं वाढलं असं सांगत पराभवातही अनेक वर्षे समाधान शोधणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. त्यांची पराभवाची परंपरा ४०-५० वर्षांची आहे, विजय अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांत दिसायला लागला. त्यांच्याकडे संयम भरपूर आहे. 

चंद्रकांतदादा यादी बदलतील? भाजपला यावेळी जे यश मिळालं ते इतरांपेक्षा जास्त दिसत असलं तरी तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीपुढे फारच कमी आहे. समाधान कशात शोधायचं हा प्रश्न आहे. कालच्या निकालात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार तीन पक्षांना मिळून ९४४ तर भाजपला ३८४ जागा मिळाल्या. भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याचं जे स्वप्न पाहत आहे त्याला बळकटी देणारं हे यश नक्कीच नाही. खूप मोठी मजल मारावी लागेल. कुणाचं नाव घेण्याचं कारण नाही, कारण असे नेते जळगावपासून भंडाऱ्यापर्यंत आहेत. पक्षात खूप मिरविणाऱ्या नेत्यांना आपापले प्रभावपट्टे टिकवता आले नाहीत.  चंद्रपूरसारखा हक्काचा जिल्हा काँग्रेसनं पळवला. साईडलाईन केलेल्यांनी किंवा योग्यता असूनही ज्यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही त्यांनी चांगलं यश मिळवलं. बडबोले, चमकेश कोण आणि कामाचे कोण याची यादी चंद्रकांतदादा नव्यानं तयार करतील तर पक्षाचं भलं होईल, अशी एक भावना आहे.
सत्तेच्या लाभाचं राष्ट्रवादीतंत्र प्रश्न आहे तो राष्ट्रवादी का वाढली अन् शिवसेना का माघारली याचा. शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर राहावं लागलं. काही ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादीची युती होती. काँग्रेस बहुतेक ठिकाणी स्वबळावरच लढली. आज यश कमी मिळालं; पण या निमित्तानं पंजा सगळीकडे पोहोचला, त्याचा भविष्यात फायदा होईल. निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेची फरफट झाली अशी जी टीका आज निकालानंतर होत आहे ती काँग्रेसच्या बाबतीत तर नाही झाली! प्रश्न हा ‘व्होट ट्रान्सफर’चादेखील आहे. जितक्या सहजतेनं शिवसेनेची मतं भाजपकडे अन् भाजपची शिवसेनेकडे ट्रान्सफर होत असत, तितक्या सहजतेनं राष्ट्रवादी-शिवसेनेत ‘व्होट ट्रान्सफर’ होऊच शकत नाही. शेवटी हिंदुत्व हेच शिवसेनेचं बलस्थान आहे, ते सत्तेसाठी बोथट होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावीच लागेल. 
काँग्रेसचं आपलं वेगळंच चाललेलं असतं. त्यांचे नेते आपापल्या प्रभावक्षेत्रातील गड टिकविण्यासाठी धडपड करतात.  गड टिकविले की गुलाल उधळून खुश होतात. आपण जिंकलो याच्या आनंदापेक्षा आपल्या पक्षांतर्गत विरोधकाला त्यांच्या जिल्ह्यात फटका बसला यात अधिक आनंद मानणाऱ्या नेत्यांची मोठी संख्या आजही काँग्रेसमध्ये आहे. ‘मी नांदेड राखलं, मी अमरावती राखलं, मी चंद्रपूर जिंकलं असं सांगणारे आहेत; पण आम्ही महाराष्ट्र राखला’ असं सांगणाऱ्या आणि त्यासाठीचा अधिकार असलेल्या नेत्यांची कमतरता ही काँग्रेसची डोकेदुखी आहे. ‘मोदींना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’, असं आधी म्हणायचं नंतर सारवासारव करत मी गावगुंड असलेल्या मोदींबाबत बोललो म्हणायचं, असं केल्यानं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत:चं उगाच हसं करून घेतलं. काँग्रेसच्या इतर नेत्यांना ते बरंच वाटलं असणार. पटोलेंचं अध्यक्षपद जावं यासाठी टपून बसलेल्यांना पटोलेच कधी कधी बळ देतात. (त्यांच्या वक्तव्याच्या गदारोळात भंडाऱ्यातील यश झाकोळलं.)राष्ट्रवादीचं तसं नाही, पक्षाबाबत राज्याचा एकत्रित विचार करून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे रिमोट कंट्रोल पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांना उत्तरदायी करत त्यांच्याकडून कामं करवून घेतात. पक्षविस्तारासाठी साम, दाम, दंड, भेद वापरतात. पक्षानं तुम्हाला पदं दिली, तुम्ही पक्षाला किती आणि काय देता याचा हिशेब विचारणारी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. सत्तेचा उपयोग पक्षासाठी करवून घेणारी सिस्टीम आहे. त्यामानाने शिवसेनेत एक-दोन मंत्र्यांवरच सगळा भार येऊन पडतो. सगळे जबाबदारी घेताना दिसत नाहीत. एकटे एकनाथ शिंदे कुठेकुठे पुरणार?  बहुतेक मंत्री लवकर भेटत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीमुळे फारसे उपलब्ध होत नाहीत. आमदार, जिल्हाप्रमुखांची कामं मार्गी लावण्यासाठीची यंत्रणा दिसत नाही. खालचा शिवसैनिक कडवा आहे; पण आपल्या गावात राष्ट्रवादीवाल्यांना बरोबर निधी मिळतो, असं तो पाहतो, तेव्हा त्याचं मन खट्टू होतच असणार. भाजपसोबत राहून इतकी वर्षे सडली, असं वाटणाऱ्या शिवसेनेला उद्या राष्ट्रवादीबाबतही तसंच वाटू नये एवढंच.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा