शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

राष्ट्रवादीच्या किल्ल्यास तडे

By admin | Published: December 30, 2016 2:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे.

- वसंत भोसले राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे.‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’, अशी म्हण प्रचलित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे असेच काहीसे झाले आहे. या पक्षाचा इतिहास व प्रयोजन महाराष्ट्राला ज्ञात असल्याने त्यावर पुन्हा भाष्य करावे असे काही नाही. शरद पवार यांचा पक्ष एवढीच जमेची बाजू शिल्लक राहिली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. पण आज ती स्थिती नाही. १९९९ मध्ये या पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातून तडाखेबाज सुरुवात केली. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, कोकण, आदी विभागांतून किमान डझनभर नवे नेतृत्व उभे केले. त्यात सर्वांत उजवे ठरले होते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आर. आर. (आबा) पाटील.शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या नव्या नेतृत्वाची फळी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, त्यात सुनील तटकरे, अनिल देशमुख, राजेश टोपे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजितदादा पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आदींचा समावेश होता. विशेषत: आर. आर. आबा आणि छगन भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्ती, तंटामुक्ती, आदी अभियान राबवून आबा पाटील यांनी ग्रामीण भागासह निमशहरी भागातही राष्ट्रवादी काँग्रेसला पोहोचविण्याचे काम नेटाने केले होते. जयंत पाटील यांनी सलग नऊ वर्षे महाराष्ट्राचे अर्थकारण सांभाळत नवी आशा निर्माण केली होती. या सर्वांना घेऊन जुन्या-नव्याचा संगम साधणारे जाणते नेतृत्व शरद पवार यांचे होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वांत मोठी उपलब्धी कोणती, तर नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली, असे वारंवार शरद पवार सांगत होते.गेल्या दोन वर्षांत मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. पक्षाची प्रतिमा खालवली, नेतृत्वाची फळी बाजूला फेकली गेली. त्यामुळेच एका मागून एक धक्के बसत गेले आणि नगरपालिका निवडणुकीत तर पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आणखीन हाल होण्याची लक्षणे दिसत आहेत. नवी मुंबईचा अपवाद वगळता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राखता येणे कठीण जाण्याची लक्षणे आहेत. शरद पवार यांच्या निरोपावर दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील) राजकारण एका रात्रीत बदलत होते. तेथे चार नगरपालिका बहुमताने जिंकताना दमछाक झाली. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हा परिषदेची सत्ता टिकवतानाही हीच अवस्था होणार आहे. मागील महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात प्रचंड बहुमताने सभासद असतानाही काँग्रेसने पराभव केला. तेव्हा तर राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला मोठा तडा गेला. सातारा जिल्हा तर राष्ट्रवादीचा हुकमी एक्का. सांगलीत देखील आबा आणि जयंत पाटील यांच्यामुळे बहुमताने सत्ता घेतली होती. आज आबा नाहीत. जयंत पाटील यांच्या काँग्रेसला संपविण्याच्या राजकारणाने भाजपाला सतत बळ मिळत गेले. तीच भाजपा आता जयंत पाटील यांच्याच नेतृत्वापुढे प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. चार दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनाच आता भाजपामध्ये येता का बघा, असा अनाहूत सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच अवस्था साताऱ्यात आहे, कोल्हापुरात त्याहून कठीण आहे. पक्षाचे चार खासदार आहेत. त्यापैकी साताऱ्याचे उदयनराजे पक्षाला भीक घालीत नाहीत आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक पक्षाला जेऊ घालीत नाहीत. उरलेले माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील आणि बारामतीच्या सुप्रिया सुळे. या सर्वांची मिळून नेतृत्वाची फळी तयार केली असे वारंवार सांगणारे शरद पवार यांच्यासमोरच ही फळी तुटत चालली आहे. दक्षिण महाराष्ट्रात भाजपाने शिरकाव केल्याने व या तड्यापायी काँग्रेसला तात्पुरते चांगले दिवस येतील, पण काँग्रेस पक्षात एकी नाही. सत्ता गेली तरी गटातटाची मस्ती (जुनी सवय) अजून जात नाही, हेच खरे!