शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 12:10 IST

बॅडमिंटनच्या थॉमस चषक विजेतेपदानं भारतीय खेळाडूंनी १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाची आठवण करून दिली आहे. आता नवा इतिहास लिहिला जाईल.

- मयूर पठाडे, नाशिक

रांगड्या कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेटने कात टाकली. तोपर्यंत क्रिकेटच्या जगात लिंबूटिंबू समजला जाणारा हा देश नंतर क्रिकेटच्या अतिरथी -महारथींना त्यांच्या तोंडासमोर ‘अरे ला कारे’ करू लागला. या एकाच घटनेनं भारतीय क्रिकेटचं रूपडं बदललं ते बदललंच.. यानंतर जगातल्या कोणत्याच देशानं भारताला कमी समजण्याची हिंमत केली नाही आणि आता तर भारत क्रिकेटच्या क्षेत्रातला सर्वार्थानं अनभिषिक्त सम्राट आहे. १९८३ची ती एक घटना. त्यानं सगळंच काही बदलून टाकलं. विशेषत: भारतीय खेळाडूंची मानसिकता. नेमकी तशीच घटना आता बॅडमिंटनच्या सांघिक क्षेत्रात घडली आहे. गेल्या रविवारी भारतानं थायलंडमध्ये झालेल्या थॉमस चषकावर आपलं नाव कोरलं आणि ७३ वर्षांनंतर इतिहास घडविला. १९८३ च्या घटनेशी या घटनेची तुलना करणं अनेकांना अतिशयोक्ती वाटेल; पण अनेक तज्ज्ञांच्या मते या घटनेचं महत्त्व त्यापेक्षाही जास्त आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख खेळाडू सुनील गावस्करनं तर म्हटलं आहे, बॅडमिंटनच्या क्षेत्रातील ही क्रांतिकारी घटना आहे. भारतीय खेळाडूंचा धाक आता जागतिक बॅडमिंटनच्या क्षितिजावर पहायला मिळेल. 

१९८३ ची वर्ल्ड कप ही जशी ‘अचानक’ घडलेली घटना नव्हती, तसंच भारताचा थाॅमस चषकावरचा कब्जा ही ‘अचानक’ घडलेली घटना नाही. फायनलमध्ये भारतानं गतविजेत्या आणि तब्बल १४ वेळा हा चषक जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात केली. मलेशिया आणि डेन्मार्क या तगड्या देशांनाही अस्मान दाखवलं. अशा घटना अचानक घडत नाहीत. त्यात भारतीय खेळाडूंच्या मेहनतीचा वाटा फार मोठा होता, आहे. एचएस प्रणॉय तर जणू ‘मॅन ऑफ द सिरिज’ ठरला. सेमीफायनलमध्ये भर मॅचमध्ये प्रणाॉय जखमी झाला. त्याच्यावर कोर्टवरच उपचार करावे लागले. तरीही त्यानं विजय मिळवला. स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय कर्णधार लक्ष्य सेनला फूड पाॅइझनिंग झालं होतं. फायनलच्या पहिल्याच मॅचमध्ये लक्ष्य आपला पहिला गेम हारला होता; पण प्रतिस्पर्धी अँथनी गिंटिंगनं मारलेल्या एका जबरदस्त शाॅटला लक्ष्यनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे लक्ष्यचा आत्मविश्वास तर परत आलाच; परंतु गिंटिंगसह अख्खं जग आश्चर्यचकित झालं. त्यानंतर लक्ष्यनं गिंटिंगला मान वर करू दिली नाही. किदम्बी श्रीकांत तर संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच हारला नाही.

भारतात बॅडमिंटनकडे गांभीर्यानं पाहायला लावण्याची सुरुवात केली ती प्रकाश पदुकोन यांनी. १९८०मध्ये ऑल इंग्लंड ओपनचं जेतेपद जिंकून अख्ख्या जगाचं लक्ष त्यांनी आपल्याकडे वळवलं. त्यानंतर पी. गोपीचंदनं २००१ मध्ये पदूकोन यांचाच कित्ता गिरवताना हे विजेतेपद परत भारताकडे आणलं. त्यानंतर सायना नेहवालचं युग सुरू झालं. चिनी खेळाडूंना आपणही पाणी पाजू शकतो, असा विश्वास तिनं जागतिक पटलावरही जागवला. तिचाच कित्ता गिरवताना पी. व्ही. सिंधू रिओ ऑलिम्पिकच्या रौप्यपदकापर्यंत पोहोचली. त्यानंतर २०१९ मध्ये तिनं जागतिक विजेतेपदही खिशात घातलं.. या घटनांच्या स्मृती खेळाडूंच्या मन:पटलावर कोरल्या गेल्या नसत्या तरच नवल! त्याचंच प्रतिबिंत आज थॉमस चषकाच्या रूपानं दिसत आहे.. ‘अरे ला कारे’ करण्याची हीच हिंमत आता भारतीय बॅडमिंटनचा चेहरा नव्यानं घडवायला घेईल हे नक्की.. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत