शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

आपल्या मुलांच्या वाटेतील नवे अडथळे : शिक्षा, स्पर्धा आणि धर्म !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 6:05 AM

आपल्या मुलांनी त्यांच्या जीवनातील ताण शक्य तेवढा सैल करून निर्मितीचा नवानंद घेत सुखानं जगावं, एवढंच तर आपल्याला हवं असतं ना?

प्रत्येक मुलाच्या मेंदूच्या वाढ-विकासाचा एक प्रवास असतो. कुठलीही अडचण नसली तर तो  वेगात सुरू असतो. वाटेत अचानक स्पीडब्रेकर आला तर बाळाचं वाढ-वाहन अडतं, उडतं किंवा पडतं. आजच्या सुधारित, तंत्रशास्त्र निपुण जगातही पालकत्वाच्या रस्त्यावरचे काही स्पीडब्रेकर बाळाच्या वाढीचा वेग तर कमी करतातच, पण  कायमची कमतरताही निर्माण करू शकतात असे अनेक स्पीडब्रेकर आहेत. त्यातील एकाचं नाव आहे शिक्षा ! 

‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’ असं पूर्वी म्हणत. आजकाल शहरी शाळांमध्ये अगदी असं म्हणत नसतील पण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या शिक्षा करतातच. छडी लागल्यावर कोणती विद्या घमघमून येते आणि ‘काय केलं की ही छडी मला पुन्हा शक्यतो लागणार नाही’ हे मुलाला कळू लागतं. काही वेळा आपल्याला छडी लागू नये म्हणून आपण ते विषय अभ्यासावेत असं मुलांना वाटू शकतं, आणि ती मुलं मोठी झाल्यावर मला सरांनी फटके मारले म्हणून मला गणित आलं, असं म्हणतात. पण काहीजण ‘मला शिक्षा केल्यामुळे गणिताची भीती बसली, मला गणित आलंच नाही’ असंही म्हणतात. त्यातून गणित, भाषा समाजशास्त्र येतं की नाही हा मुद्दा फारसा महत्त्वाचा उरतच नाही, तर ‘शिक्षेला घाबरायचं’ हा भयंकर धडा मुलं शिकतात. यामुळे मुलाचा मेंदू पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. मूल त्याच्या वृत्तीनुसार एकतर घाबरून ऐकायला किंवा ऐकल्यासारखं खोटं दाखवायला लागतं. आपलं काम व्हावं म्हणून आमिष दाखवणं, ते न केल्यास मार पडण्याची भीती दाखवणं ही गोष्ट मानवी मेंदूची असीम ताकद न ओळखता तिला पशुपातळीवर मर्यादित ठेवणं आहे. हा गंभीर गुन्हा पालक, शिक्षकांकडून वारंवार घडतो. त्याचे परिणाम पुढे भीतीला घाबरण्यात किंवा स्वत: भीती निर्माण करण्यात होतात, तेव्हा हे आपलं पाप आहे याची त्या पालक-शिक्षकांना जाणीवही नसते.

मानवी मेंदूची ताकद लक्षात न घेता तिला आमिष आणि शिक्षा यांच्या वर्तुळात फिरवत राहाणं यातूनच स्पर्धा कल्पनेला  पुष्टी मिळते. हा असतो दुसरा स्पीडब्रेकर. स्पर्धा मनाची अपरिमित हानी करते. माणसांना एकमेकांपासून दूर नेते, तोडते. स्पर्धेपेक्षा सहकार्याने खूप चांगलं काम होतं. पण आजच्या जगातून स्पर्धा दूर करणं आता आपल्या हाती राहिलेलं नाही. मग काय करता येईल? मुलांना स्पर्धा म्हणजे नक्की काय आहे याची जाणीव करून देणं, त्याचा उपयोग व्हावा पण अपाय मात्र होऊ नये, यासाठी स्पर्धेच्या आहारी न जाता, स्पर्धा आपल्या नियंत्रणाने वापरणं हे मुलांना शिकवणं शक्य आहे. अधिकाधिक वेगवान, दर्जेदार, कुशल जग होत जाणं ही चांगलीच गोष्ट, त्यातला मीपणा कमी ठेवायला आपण शिकलो तर जग निश्चित अधिक भद्र होईल.हा मीपणा आपल्याला संकुचित करतो आहे. मानवी बुद्धीची असिम ताकद खुरटून टाकतो आहे. त्यातून एक प्रचंड मोठा स्पीडब्रेकर समोर येतो, तो म्हणजे धर्म ! माणसानेच निर्माण केलेले धर्म आज माणसाहून मोठे, जगड्व्याळ होऊन बसले आहेत. भारताच्या संविधानात धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब मानलेली आहे. त्यामुळे घरात जरी बालकांना त्या कुटुंबाचा धर्म मानावा लागला तरी कोणत्याही जाहीर ठिकाणी कोणत्याही विशेष धर्माची डिंडिम चालवली जाऊ नये. 

मूल वाढवण्यामागची आपली धारणा आणि धोरण काय असतं? - आपल्या मुलांनी मोकळेपणानं जीवनातले ताण शक्य तेवढे सैल करून निर्मितीचा नवानंद घेत सुखानं जगावं !  आज वेगवेगळ्या प्रदूषणांनी, वातावरणातल्या बदलांनी अवघड केलेल्या जीवनाला भिडणं मुलांना भागच आहे, अशावेळी निदान त्यांचा वेग अडवणारे हे स्पीडब्रेकर त्यांच्या वाढीविकासाच्या आड येऊ नयेत, त्यांची वाढ निर्धोक आणि प्रसन्नपणे होत राहावी. याहून वेगळं आपल्याला काय हवं असणार, होय ना?-संजीवनी कुलकर्णी, विश्वस्त, प्रयास व पालकनीती

sanjeevani@prayaspune.org 

 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा