शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नितीश ईज बिहार?

By admin | Published: August 06, 2015 10:19 PM

कोणे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यासाठी ‘इंदिरा ईज इंडिया अ‍ॅन्ड इंडिया ईज इंदिरा’ असे उद्गार काढले

कोणे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यासाठी ‘इंदिरा ईज इंडिया अ‍ॅन्ड इंडिया ईज इंदिरा’ असे उद्गार काढले आणि टीकेचे प्रचंड मोठे मोहोळ अंगावर ओढून घेतले. आता त्याच धर्तीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ते स्वत: म्हणजेच बिहार आणि बिहार म्हणजे नितीशकुमार असे सूचित करणारे एक जाहीर पत्र पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना लिहिले आहे. मध्यंतरी मोदी यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यात नितीश यांच्या ‘डीएनए’मध्ये खराबी असल्याचे जाहीर उद्गार काढले होते. त्यावर टीका झाल्यावर मोदींनी नितीश यांच्या नव्हे तर त्यांच्या लोकशाहीविषयक भूमिकेच्या डीएनएमध्ये खराबी असल्याची दुरुस्ती केली होती. पण मोदींचे मूळचे विधान गृहीत धरून नितीशकुमार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात, सदर विधानाने संपूर्ण बिहारचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे. मुळात बिहार या बिमारु राज्याचे जाऊ द्या, तथाकथित प्रगत राज्यातील जनसामान्यांपैकी किती लोकाना डीएनए म्हणजे काय हेच ठाऊक असण्याची शक्यता नसताना, त्यात खराबी असणे वा नसणे, हे समजण्याचाही प्रश्न उपस्थित होत नसताना, बिहारी बाबूंना हा आपला अपमान वाटण्याचे काही कारणच नाही. पण मुद्दा तो नाहीच. नितीशकुमार याआधी बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, तेच मुळी भाजपाच्या सहकार्याने. पण भाजपाने जेव्हां नरेन्द्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड केली त्याच क्षणी नितीश यांच्या निधर्मवादाला बट्टा लागला व त्यांनी भाजपाशी असलेले संबंध एका झटक्यात तोडून टाकले. तो राग मोदींच्या मनात असणारच. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या झंझावाताने खुद्द बिहारात नितीश यांच्या संयुक्त जनता दलाची पूर्ण वाताहत केली व त्याचा राग नितीश यांच्या मनात साचून राहिलेला असणेही स्वाभाविकच आहे. त्यात भर म्हणून की काय, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश यांनी नैतिकतेचा आव आणून मुख्यमंत्रिपद सोडताना, ज्यांना आपल्या पदावर बसविले त्या जितनराम माँझी यांनी आता थेट मोदींचा कळप गाठला आहे. तेव्हां या साऱ्या गलबल्यात बिहारचा अपमान वगैरे काहीही नसून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही एक रंगीत तालीमच आहे. त्यामुळेच बहुधा सध्या रालोआत असलेल्या रामविलास पासवान यांनीदेखील या वादात उडी घेतली असून नितीश यांनीच बिहारचा अपमान केल्याचा प्रत्त्यारोप केला आहे. नरेन्द्र मोदी पंतप्रधान असताना व त्यांना भोजनाचे निमंत्रण दिलेले असताना, मोदींनी त्यांना जेऊ घातले नाही व आतिथ्यशील बिहारी जनतेचा तो खरा अपमान होय, असे पासवान यांनी म्हटले आहे.