शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

नितीश यांची हार

By admin | Published: October 01, 2016 2:10 AM

संपूर्ण बिहार राज्यात नशाबंदी लागू करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीने लक्ष घालून संमत करुन घेतलेला ‘बिहार दारुबंदी आणि अबकारी कर कायदा’ पाटणा

संपूर्ण बिहार राज्यात नशाबंदी लागू करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीने लक्ष घालून संमत करुन घेतलेला ‘बिहार दारुबंदी आणि अबकारी कर कायदा’ पाटणा उच्च न्यायालयाने अवैध ठरविला आहे. परंतु न्यायालयाच्या या निवाड्याने दारुबंदीलाच नकार दिला असा अर्थ कोणी काढला तर तो चुकीचा ठरेल. कारण संपूर्ण राज्यात दारुबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य नव्हे. गुजरातेत फार पूर्वीपासून ती अस्तित्वात आहे आणि अलीकडे केरळ राज्यानेही ती लागू केली आहे. केरळातील दारुबंदी कायम ठेवावी की नाही यावर आता तिथे सत्तापालट झाल्यानंतर नव्याने विचार सुरु झाला आहे कारण या बंदीचा सरकारच्या खजिन्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम घडून येऊ लागला आहे. पण तो विषयच पूर्णत: वेगळा आहे. बिहारने जो कायदा लागू केला त्यातील तरतुदींवर अन्य राजकीय पक्ष तर राहोच पण नितीश सरकारचा भाग असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राजदचाही मोठा विरोध होता. या विरोधामागील प्रेरणा होती आणि आहे ती कायद्यातील अत्यंत जाचक तरतुदींची. कायद्याचा प्रत्येक भंग हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला होता व जामीन मिळवायचा झाला तर तो न्यायालयातच मिळेल, पोलिसांकरवी नाही अशी कडक तरतूद त्यात होती. कायदा मोडणाऱ्यांविरुद्धचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयांचीही तरतूद करण्यात आली होती. तरीही इथपर्यंत ठीक होते. पण कोणत्या परिस्थितीतून कायद्याचा भंग होतो ती परिस्थिती निश्चित करणाऱ्या तरतुदीच अधिक वादग्रस्त ठरल्या होत्या. एखाद्या घरात दारुची बाटली आढळली तर त्या घरातील सर्व प्रौढांना अटक करणे, एखाद्या घरातील भांड्यात गुळ आणि द्राक्षे एकत्र आढळली तर ती दारु गाळण्यासाठीच े आहेत असे गृहीत धरुन पुन्हा साऱ्या प्रौढांना अटक करणे, हे सामान विकणाऱ्यांना ताब्यात घेणे आणि इतकेच नव्हे तर संबंधित घर किंवा दुकान जप्त करणे अशादेखील तरतुदी कायद्यात करण्यात आल्या होत्या. साहजिकच त्यांना होणार विरोध व न्यायालयीन निवाडा योग्यच ठरतो.