शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

नोबेल, एआय आणि धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 8:23 AM

जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा!

जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी २ ऑगस्ट १९३९ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले होते. हिटलरचा नाझी जर्मनी तेव्हा अणुबॉम्ब मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तत्पूर्वी अमेरिकेने हे तंत्रज्ञान हस्तगत करण्याची गरज त्या पत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार अमेरिकेने ‘प्रोजेक्ट मॅनहटन’ सुरू केला आणि त्यातून जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती झाली. 

अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ साली जपानच्या हिरोशिमा आणि ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरांवर हे बॉम्ब टाकले आणि ११ ऑगस्ट रोजी दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली. पण जगात अण्वस्त्र स्पर्धा सुरू होऊन संपूर्ण पृथ्वीच्या विनाशाची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर आइनस्टाइन यांना त्यांच्याच त्या पत्राबद्दल पश्चाताप होऊ लागला. पुढे १९५४ साली नोबेलविजेते रसायनशास्त्रज्ञ लिनस पॉलिंग यांच्याशी गप्पा मारताना आइनस्टाइन यांनी म्हटले होते की, रूझवेल्ट यांना लिहिलेले ते पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक होती! इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. आता पुन्हा एकदा तसेच काहीसे घडले आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन या शास्त्रज्ञांना नुकतेच भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले. त्यांनी एआय क्षेत्रात मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क यावर संशोधन केले. मात्र, याच वेळी हिंटन यांनी एआयमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांकडे जगाचे लक्ष वेधले. औद्योगिक क्रांतीने जसे जग बदलले, तसेच ते एआयमुळेही बदलेल. मात्र, या गोष्टी मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. त्याने मानवजातीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे हिंटन यांनी म्हटले आहे. हिंटन यांनी गुगलबरोबर ‘गुगल ब्रेन एआय’ विकसित करण्यासाठी काम केले होते. मात्र, नंतर त्यांनी ते काम थांबवले. एआयचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता मी यासंदर्भात केलेल्या कामाचा मला काही वेळा खेद वाटतो, असे हिंटन म्हणाले होते. जन्माला आल्यापासूनच माणूस त्याच्या ज्ञानेंद्रियांद्वारे सभोवतालच्या वातावरणाची माहिती संकलित करून ती मेंदूत साठवून ठेवत असतो. त्यातून तो विविध परिस्थितीत कसे वर्तन करायचे, हे ठरवत असतो. हे निर्णय घेताना त्याने वर्षानुवर्षे साठवलेल्या माहितीचा, घेतलेल्या अनुभवांचा फायदा होत असतो. 

आता संगणकाला अशीच माहिती पुरवली जाते. विविध प्रश्नांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकवले जाते. त्यातून यंत्रे मानवाप्रमाणे निर्णय घेऊन प्रतिसाद देऊ शकतात. यंत्रांना मानवाप्रमाणे विचार करून प्रतिसाद देण्यास शिकवणे म्हणजेच त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदान करणे. वास्तविक एआयमुळे सध्या अनेक क्षेत्रांत मदत होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कामे अधिक वेगाने आणि अचूकतेने होत आहेत. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, ही भीती गेल्या काही वर्षांपसून व्यक्त केली जात होतीच. ‘चॅटजीपीटी’सारखी साधने आल्यानंतर तो धोका आणखीच गडद बनला आहे. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ एवढ्यावरच थांबलेले नाही. यंत्रे स्वत: विचार करून नवीन माहिती आत्मसात करू शकतात. त्यावर आधारित कृती करू शकतात. त्यातून ही यंत्रे भविष्यात मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे काम करू लागतील. भविष्यात कदाचित यंत्रे मानवाला जुमानेनाशी होतील. त्यातून अखंड मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होऊ शकेल, असा इशारा आता 

एआय क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञच देत आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही त्याबाबत नुकताच धोका व्यक्त केला आहे. हा धोका विविध क्षेत्रांमध्ये खरा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. एआय तंत्रज्ञान वापरून डीपफेक म्हणजे एखाद्याच्या खोट्या प्रतिमा बनवून त्या प्रसारित केल्याचे प्रकार वाढत आहेत. एआय अल्गोरिदम्सच्या मदतीने असे डीपफेक तयार करून समाजमनावर व्यापक परिणाम घडवणे, लोकांचे मतपरिवर्तन करणे, निवडणुकांमध्ये गैरप्रकार करणे हेदेखील शक्य होऊ शकते. चीनसारखे देश ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान वापरून पोलिसी राज्य व्यवस्था निर्माण करू पाहताहेत. वाईट हेतूने प्ररित ‘एआय अल्गोरिदम्स’मुळे शेअर बाजारात आणि आर्थिक क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते. इतकेच नव्हे तर भविष्यात एआयचा वापर करून स्वयंचलित शस्त्रास्त्रे बनवली जाण्याचा धोका आहे. यंत्रमानवांसारखी ही शस्त्रे मानवी नियंत्रणाबाहेर जाऊन मोठा हिंसाचार घडवू शकतात. त्यामुळे आज एआय क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ या तंत्रज्ञांनाचा पुढील विकास थांबवण्याचा सल्ला देत आहेत. जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा! 

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स