शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
3
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
4
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
5
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलां! (VIDEO)
6
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
7
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
8
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
9
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
11
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
12
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
13
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
14
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
15
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
16
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
17
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
18
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
19
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
20
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा

पायपोसच नाही!

By admin | Published: December 03, 2015 3:29 AM

असं म्हटलं जातं की दानासारखं दुसरं पुण्यकर्म नाही आणि ते पुण्य कायम राखायचं तर उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळता कामा नये! केन्द्रातील विद्यमान

असं म्हटलं जातं की दानासारखं दुसरं पुण्यकर्म नाही आणि ते पुण्य कायम राखायचं तर उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळता कामा नये! केन्द्रातील विद्यमान सरकारचा कारभार बहुधा याच पुण्यशील वृत्तीने चालू असावा. अन्यथा महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी केन्द्राने अगोदरच ठोस मदत पाठवून दिल्याचे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे अगदी ठामपणे सांगत असताना तिकडे केन्द्रातील कृषी मंत्री राधा मोहनसिंह यांनी मात्र राज्य सरकारने मदत मागण्याचा प्रस्तावच पाठविला नसल्याचे थेट लोकसभेतच कसे सांगितले असते? याचा अर्थ कृषी मंत्र्यांना अंधारात ठेवून केन्द्रातील त्यांच्याच एखाद्या सहकाऱ्याने महाराष्ट्राला आर्थिक मदतीचे दान दिले असावे आणि त्याची साधी कुणकुणदेखील राधा मोहनसिंह यांना लागू दिली नसावी. मुळात राज्याने तब्बल चार हजार कोटींच्या शेतमालाच्या नुकसानीचा अंदाज केन्द्राकडे पाठविला असल्याचे कृषी मंत्र्यांनीच सांगून टाकले. जेव्हां एखाद्या राज्याकडून केन्द्राला नुकसानीचा अंदाज सांगितला जातो तेव्हां त्यातच अर्थसाह्याची मागणी अनुस्यूत असते. कदाचित तसेच होऊन खडसे यांच्या हाती पैसे पडले असावेत. कृषी मंत्र्यांच्या याच विधानाचा हवाला द्यायचा तर अलीकडच्या काळात केन्द्र सरकारची पाहाणी पथके महाराष्ट्राच्या दुष्काळी स्थितीची पाहाणी करण्यासाठी व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येऊन गेली, ती प्राय: राज्य सरकारने नुकसानीचा अहवाल सादर केला म्हणूनच. या पथकांनी काय पाहाणी केली, कशी केली आणि त्यातून त्यांना कोणता अंदाज आला याविषयीची साद्यंत वृत्ते याआधीच माध्यमांंमध्ये येऊन गेली आहेत. या पथकांना त्यांच्या दौऱ्यात काय आढळून आले व त्यांनी आपल्या म्हणजे केन्द्र सरकारला काय अहवाल सादर केला हे अद्याप अज्ञात असले तरी कृषी मंत्र्यांचा हवाला देऊन असेही म्हणता येईल की त्यांनी काहीच केले नसावे वा केले असेल तर ते कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचले नसावे. स्वाभाविकच खडसे यांच्याकडे (गफलतीने?) आलेला पैसा बोनस समजून आणखी पैसा येऊ शकतो असे गृहीत धरायला हरकत नसावी. दुष्काळ किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीत राज्यांना मदत करणे केन्द्राचे कर्तव्य मानले जाते व त्यात आपपरभाव दाखविता येत नसताना कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून त्या राज्याला मदत मिळाली व भाजपाचेच सरकार असून महाराष्ट्र कोरडा राहिला अशी टीका केली जाणे हे बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण.