शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

आता नुसता बंगाल!

By admin | Published: August 30, 2016 5:08 AM

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्य विधानसभेत अखेर आपल्या राज्याचा नामबदल घडवून आणला असल्याने यापुढील काळात

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्य विधानसभेत अखेर आपल्या राज्याचा नामबदल घडवून आणला असल्याने यापुढील काळात त्यांचे राज्य बंगाली भाषेत बांगला, इंग्रजीत बेंगॉल आणि हिन्दी भाषेत बंगाल म्हणून ओळखले जाईल. अर्थात नामबदलाचा हा ठराव राज्याने संमत केला असला तरी केन्द्राची त्याला मान्यता मिळावी लागेल, पण त्याबाबतीत काही अडचण येण्याचे कारण नाही. फाळणीपूर्व भारतात एकच बंगाल राज्य होते. फाळणीमुळे या राज्याचा पूर्वेकडील भाग पाकिस्तानात गेला आणि पश्चिमेकडील भाग भारतात राहिला. त्यामुळे तिकडचा तो पूर्व बंगाल आणि इकडचा तो पश्चिम बंगाल असे नामकरण केले गेले. पण इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पूर्व बंगालमधील स्वातंत्र्य चळवळीला भारताचे सक्रीय सहकार्य लाभून पूर्व बंगाल पाकिस्तानातून स्वतंत्र झाला व लगेचच त्याचे बांगला देश असे नामकरणही केले गेले. मुळात भारतातील बंगालचे पाकिस्तानातील बंगालशी नाते सांगणारा पश्मिच बंगाल हा उल्लेख असयुक्तिकच होता आणि तिकडचा पूर्व बंगाल आपले नाव बदलून बसल्यानंतर तर पश्चिम बंगाल असा उल्लेख चक्क अतार्किक ठरु लागला. पण ही विसंगती दूर व्हावी म्हणून ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्याच्या नामातील पश्चिम या दिशादर्शक उल्लेखावर काट मारण्याचा तार्किक निर्णय घेतला असे कोणाला वाटत असेल वा वाटणार असेल तर फसगत होण्याची शक्यता आहे. कारण वेगळेच आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची एक बैठक पाचारण केली होती. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्याची आणि त्यांच्या राज्यांच्या समस्या मांडण्याची मुभा होती. त्यासाठी निश्चित केलेला क्रम इंग्रजी मूळाक्षरांवर आधारित होता. पश्चिम म्हणजे इंग्रजीतील ‘डब्ल्यु’चा नंबर येता येता बराच विलंब झाला. परिणामी आधीचे मुख्यमंत्री जरी मन:पूत बोलले असले तरी नंतरच्या मुख्यमंत्र्यांवर वेळेचे बंधन घातले गेले. त्यात ममताबाईदेखील आल्या. तिथेच त्यांनी नामबदलाचा निर्णय घेतला आणि आता तोे पुरादेखील करुन टाकला.