शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

वेध - वेड लागलेला वन, वित्तमंत्री !

By admin | Published: July 03, 2017 12:05 AM

मंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत

- अतुल कुलकर्णीमंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मंत्र्याला झापले तेही बाहेर आलेच की... या सगळ्या पार्श्वभूमीवर वेड लागलेला वनमंत्री म्हणूनच वेगळा ठरतो...जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा...गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा...कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनीकांचे... भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे...कुणाला देव बहकावी,कुणाला देश चळ लावी... दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी...वीर वामनराव जोशी, यांनी लिहिलेले व वझेबुवांनी संगीत दिलेले, मा. दीनानाथ यांच्या आवाजामुळे अजरामर झालेले हे गाणे ७० वर्षानंतरही जसेच्या तसे खरे ठरताना दिसते आहे. आपल्या आजूबाजूला वेड्यांचाच पसारा मांडलाय, कुणाला पैशांचे वेड लागले, तर कुणाला हातात पैसे खेळू लागले की कामिनीचे वेड लागते. बेभानपणे पैसा, जवानी आणि नको नको त्या गोष्टींची बेफाम उधळण करणारे मग मिळालेल्या पदाचीही तमा बाळगत नाहीत. आज हे सगळे आठवण्याचे कारण ठरले आहेत, स्वत:च्याच निर्णयांचा पाठपुरावा घेण्याचे आणि दिसेल तेथे वृक्ष लावण्याचे वेड लागलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार. मंत्रिपदाची झुल अंगावर आली की भल्या भल्यांना काही सुचेनासे होत असताना मुनगंटीवारांना गेले दोन ते तीन महिने झाडं लावण्याच्या वेडाने झपाटले आहे. गेल्यावर्षी सव्वा कोटी झाडं लावून झाल्यानंतर यावर्षी त्यांनी चार कोटी झाडं लावण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी हा माणूस दिवसरात्र वेड्यासारखा भटकतो आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला सारून पक्ष आणि पक्षाबाहेरच्या नेत्यांचे उंबरे झिजवत त्यांनी राज्यातल्या एकाही नेत्याचे घर सोडले नाही. सगळ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा, वातावरण निर्मिती करावी याचा आग्रह त्यांनी धरला. १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा प्रत्यक्षात कृती करुन दाखवण्याचा असताना मुनगंटीवार यांनी त्याआधी शेकडो बैठका घेतल्या. दिसेल त्याला झाडं किती लावली असे आग्रहाने विचारणाऱ्या या वेडाचे वर्णन कुणाला झाड बहकावी,कुणाला झाडे चळ लावी... यापेक्षा वेगळे काय असू शकते? त्यांचा हा वेडेपणा केवळ झाडे लावण्यापुरता राहिलेला नाही. स्वत:च्या मंत्री कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र ही त्यांनी मिळवले. आपण जो निर्णय घेतो त्याचे पुढे काय झाले यासाठी टोकाचा चिवटपणे पाठपुरावा करणारा दुसरा मंत्री अभावानेच दिसतो. एखाद्या सचिवाला काम सांगितलेले असेल तर कुठे, कधी, कोणत्या वेळी आणि कोणासमोर ते काम सांगितले याची लेखी नोंद ते ठेवतात. एखाद्याने कधी सांगितले असे विचारले की ते लगेच ‘पाठपुरावा डायरी’ काढतात आणि सगळी कुंडली सांगून टाकतात. त्यामुळे ‘काम करतो पण पाठपुरावा आवरा’ असे म्हणण्याची वेळ सचिवांवर येते तेथे बाकीच्यांचे काय? आयएसओ प्रमाणपत्र घेतल्यानंतर आता त्यांच्या कार्यालयात कोणत्या अधिकाऱ्याने कोणते काम किती दिवसात पूर्ण करायचे याच्या याद्याच भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जर दिलेल्या वेळेत काम झाले नाही तर थेट आपल्याला सांगा, असे ते सांगतात. याच्या उलट अन्य मंत्री कार्यालये आहेत. कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही पण त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसचेही ते प्रिंटआऊट काढतात आणि त्याचे पुढे काय झाले हे खासगी सचिवांना विचारतात. हे असले वेड राज्यातल्या अन्य मंत्र्यांना १० टक्के जरी लागले तरी मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असणारा निकाल मिळायला वेळ लागणार नाही, पण अन्य मंत्र्यांना कशाकशाचे वेड लागले आहे याच्या सुरस कथा मंत्रालयात फिरले की हमखास ऐकायला मिळतात.जे चित्र आज वित्त मंत्र्यांच्या कार्यालयात पहायला मिळते तेच चित्र अन्य मंत्र्यांच्या कार्यालयात का पहायला मिळत नाही याचे उत्तर त्या त्या मंत्र्यांनी शोधायचा जरी प्रयत्न केला तरी खूप काही साध्य होईल...