शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2017 1:50 AM

लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन

- रविप्रकाश कुलकर्णी

लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन वर्तमानपत्रातून वा त्यांच्या पुरवण्यातून प्रसिद्ध होत असतं. अशापैकीच रामदास खरे हे एक नाव. अर्थात ‘लोकमतच्या वाचकांना’ हे नाव अपरिचित नक्कीच नाही. कारण गेली दीड-दोन वर्षं लेखक आणि त्यांच्याशी झालेला पत्रसंवाद सांगणारं त्यांचं सदर ‘पत्रास कारण की’ वाचकांना चांगलंच आवडलेलं आहे.पण रामदास खरे हे भाग्यवान आहेत. त्यांचं सदर चालू असतानाच त्यांच्या या लेखनाचं पुस्तक ‘कॅलिडोस्कोप’ या नावाने व्यास क्रिएशनतर्फे प्रकाशित झालं आहे.अर्थात वृत्तपत्रातील सदर म्हटलं की, त्याला मर्यादित जागा असते. तसं खरं त्याच्याबाबतीतदेखील झालं असणार. पण हे लेखन ग्रंथबद्ध होत असताना मात्र रामदास खरे यांनी त्यात भर घातलेली आहे. त्यामुळे सदर पुस्तकात अनंत देशमुख यांची आस्वादक प्रस्तावना आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘खरे यांच्या ठिकाणी एका बाजूने त्या त्या लेखकाविषयीचा असलेला आदरभाव आणि दुसऱ्या बाजूला ज्या वाचकांसाठी आपण हा सारा लेखनाचा खटाटोप करत आहोत त्याला तो समजावा म्हणून आलेल्या साध्या सुलभ भाषेतील निवेदन दोन्ही दिसून येतात. म्हणूनच कॅलिडोस्कोपचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. क्षणार्धात वाचक त्यात गुंतून जातो ही खरी यांची कमाई आहे. मात्र यासंदर्भात काही गोष्टींकडे लक्ष वेधतो. रामदास खरे यांना पहिलं पत्र १९९४ मध्ये आलं. त्या अवस्थेचं ते वर्णन करतात, ...आणि मात्र स्वर्ग फक्त दोन बोटे उरला. गुलजार यांच्या आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे... या गाण्यातल्या ओळीप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. पुढे लेखक, कवी यांना पत्र पाठविण्याचा सिलसिला आणि धडाका सुरू झाला. तो अगदी २००२ पर्यंत. रामदास खरे यांच्या सदरात ते ज्या लेखकाबद्दल लिहायचे त्याचं उत्तम चित्र सोबत असायचं. किंबहुना त्या चित्रामुळेदेखील लक्ष वेधलं जायचं. मुळात आपल्याकडे लेखकाचा फोटो असणं आणि तो छापणं फार दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात तो सुंदर वगैरे असणं तर फारच दूरची गोष्ट आली. ही चित्रं लेखासोबत पुस्तकात आली असती तर किती बरं झालं असतं. त्याऐवजी लेखकाचे पोस्टाच्या तिकिटाएवढे फोटो लावले आहेत. कदाचित त्यामागे काही व्यावहारिक कारणही असू शकेल. पण यानिमित्ताने त्या चित्रकलेची नोंद आली असती तर बरं झालं असतं. यानिमित्ताने मी त्या चित्रकाराला जाहीर दाद देतो. रामदास खरे यांनी लिहिलेल्या पत्रांचा हा ठेवा मात्र कायमच स्मरणात राहील.