शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

एक पोस्ट चिमणराव कदम यांच्यासाठी...

By admin | Published: December 18, 2014 2:39 PM

चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षाला साजेसे अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्त्व संपले.

 दीपक बिडकर,माध्यम सल्लागार -चिमणराव कदम यांचे परवा निधन झाले आणि काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षाला साजेसे अभ्यासू आणि मुलुखमैदानी व्यक्तिमत्त्व संपले. अर्ध चंद्रकोर लावून, पांढरे धोप कपडे घालून सूर्याजीराव तथा चिमणराव कदम बाहेर पडले की, त्यांच्या तेज नजरेच्या आणि वाणीच्या पट्ट्यात शक्यतो आपण येऊ नये, अशी काळजी घ्यावी लागायची. फलटण मध्ये 'कार्यकर्ते कमी आणि विविध पक्षीय नेते जास्त' अशी अवस्था. त्या अवस्थेतून त्यांनी विधानसभेवर निवडून येत सभागृह गाजवले. १९८0 ते १९९५ पर्यंत हे वादळ राजकारणात घोंघावत होते. (एकदा सातारी राजकारण्यांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध लढण्यासाठी थेट इंदिराजींच्या समोर दिल्लीत उभे केले आणि कदम यांनी त्यांना विनम्र नकार दिला, तो यशवंतराव यांच्या आदरापोटी! )कृष्णा खोऱ्याचे पाणी पळवणारे नेते त्यांच्या शाब्दिक असुडांचे बळी ठरत. बारामतीचे शरद पवार आणि फलटणचे चिमणराव कदम यांचा लढा भिन्न व्यक्तिमत्त्व, भिन्न विचारसरणीचा होताच; पण बांधावरचादेखील होता. कृष्णा खोऱ्याचा आणि करारांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीत कसे संदर्भ मिळवले, हे चिमणराव रंगवून सांगत. टाटा इस्टेट गाडीत बसून-झोपून ते फलटण-मुंबई , फलटण-पुणे, फलटण -नागपूर असा प्रवास करायचे.अर्थात अशी अभ्यास करायची काँग्रेसला सवय नव्हतीच. त्यामुळेच ते मुलुखमैदानी आणि मुलुखावेगळे ठरत. २००४ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिरीष चिटणीस आणि श्रीकांत कात्रे या मित्रांनी माझी आणि चिमणरावांची मोट बांधली, मला त्यांचे निवडणूक प्रसिद्धिप्रमुख केले आणि मुलुखमैदानी तोफेच्या तोंडी दिले ! लॅपटॉप, मोबाईल, डिजिटल कॅमेरा यातील काहीच त्या परिसरात नव्हते त्या वेळी (म्हणजे दहा वर्षांपूर्वी) लिहिलेले वृत्तांत पेपरच्या कार्यालयात पोहोचवणे हे रोजचे दिव्य होते. आपला प्रसिद्धिप्रमुख, माध्यम सल्लागार म्हणजे काय हे सुरुवातीला चार दिवस त्यांच्या पचनी पडले नाही. 'तुम्ही माझी भाषणे लिहून पेपरला पाठवणार म्हणजे 'टपाल्या'सारखे काम करणार' असे ते खास शैलीत हिणवत! त्यांची जहरी टीका ऐकून माणसे आत्महत्या कशी करीत नाहीत याचे आश्चर्य मला वाटे. पण, नंतर एकाच गाडीत रोज आम्ही बरोबर राहून काम केल्यावर त्यांच्या ध्यानी 'माध्यम सल्लागार' हा प्रकार आला. आणि मुलुखमैदानी भाषणे झाल्यावर गाडीत बसल्यावर मृदू आवाजात ते मला भाषण कसे झाले ,याचा फिडबॅक घेत. एकाच डब्यातील भाजी-पोळी आम्ही दुपारी कोणत्यातरी झाडाच्या सावलीत खात असू. अतिशय आरोग्यकारक भाजी, पोळीचा डबा असे तो. दिवसभर वणवण फिरताना घसा खराब होऊ नये म्हणून पाण्याऐवजी कॉफी पीत असत ते. सर्व प्रचार यंत्रणा एक हाती सांभाळली त्यांनी! स्वत:च सकाळी ११ पर्यंत सर्वांना हाकून ते नियोजन करत आणि मग गाड्या प्रचाराला निघत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत होते, लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी होती. चिमणराव कदम यांची वाट नेहमीप्रमाणे कठीण होती. त्यात निवडणूक काळात उन्हाळा आणि दुष्काळ होता. चारा छावण्या ठिकठिकाणी पडल्या होत्या. आपली जनावरे पाणी असलेल्या पाहुण्यांकडे खुद्द चिमणरावांनी धाडून दिली होती. 'यशवंत परंपरा' चालवणे आणि लोकसभेत भांडून हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी सातारा दुष्काळी भागाला (दहिवडी-खटाव-माण-फलटण -खंडाळा ) मिळवून देणे हा त्यांचा नारा होता . बुडत्या काँग्रेसमधून तेव्हा उंदरासारखे नेते बाहेर पळत होते, अशा वेळी ह्यमी उंदीर नाही, वाघ आहे, वेळप्रसंगी काँग्रेसचे बुडणारे अख्खे जहाज खेचायची ताकद माझ्या अंगात आहेह्ण असे ते डोळे फिरवून म्हणत आणि रोमांच उभे करीत. अगदी जिगरबाज माणूस. काँग्रेसच्या पचनी न पडलेला आणि जिभेच्या पट्ट्याने सर्वांना घायाळ करीत स्वत:च घायाळ झालेला. चिमणरावांच्या पत्नी मात्र चिमणराव यांच्या भाषणाच्या बातम्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासारख्या लिहा, असे म्हणत! कदम यांचे उजवे हात असलेले सहकारी अच्युतराव खलाटे मात्र चिमणराव कदम यांच्या उलट स्वभावाचे. माणसे जोडणारे आणि मुलायम बोलणारे. त्यांनी मात्र २००४ निवडणूक संपली तरी संपर्क ठेवला. ही राजकारणातील जुनी पिढी, मागे पडली ती पडलीच . आता सातारा वेगवेगळ्या कारणाने आणि वेगवेगळ्या नेत्यांमुळे ओळखला जातो. मात्र, त्यातील एकही जण 'यशवंत परंपरा' चालविण्यासाठी मी निवडणूक लढवतोय, असे म्हणत नाही. सभ्यतेच्या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण एवढाच काय तो नियमाला अपवाद. काँग्रेसचे, साताऱ्याचे, यशवंतराव चव्हाण यांचे आणि चिमणराव कदम यांचे दुर्दैव हेच !