शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा

By admin | Published: June 06, 2017 4:26 AM

२ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळलेल्या घटनेला २ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती. महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वच ब्रिटिशकालीन पुलाचे आॅडिट करण्यास सरकारला भाग पडले होते. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत १८० दिवसात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे आव्हान केवळ १६५ दिवसात लीलया पेलले. ५ जूनला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर, कोणतेही काम कठीण नसते याचा जिवंत पुरावा केंद्र सरकारने दिला आहे. सावित्री पूल दुर्घटनेतील २ आॅगस्ट २०१६ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल. परंतु १८० या मर्यादित दिवसांच्या आधी तो पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला करणे हाही दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूल हा फक्त दोन गावांना जोडत नाही तर, दोन्ही तीरांच्या परिसरांचा शाश्वत विकासाचा तो प्रेरक असतो. त्यामुळे पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणाचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिणेतील राज्यांना जोडण्याचे काम करतो. या मार्गावरून १९ हजार वाहनांची वाहतूक होते. म्हणूनच एका भरभक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलाची निर्मिती आवश्यक होती. गडकरींचे आश्वासक पाऊल आणि सरकारच्या धडक कार्यक्र मामुळे पुलाच्या सर्वच तांत्रिक बाबींना गती मिळाली आणि पुलाची उभारणी द्रुतगतीने झाली. सरकारने ठरवले तर, काहीही करू शकते हे यातून दिसून आले. परंतु देशात आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने पूल आहेत, ते केवळ कागदावर, आजही गडकरींच्या धाडसी निर्णयाच्या तेही प्रतीक्षेत आहेत. त्यांचीही तातडीने उभारणी गरजेची आहे. मुंबई-गोवा या चार पदरी महामार्गाच्या कामाला बरीच वर्षे लागली आहेत. त्याकडेही सरकारने लक्ष दिल्यास अपघात रोखता येतील वेळेचीही बचत होणार आहे. गडकरी यांनी याकडेही लक्ष देऊन याचेही काम युद्धपातळीवर करावे, अशी तमाम कोकणवासीयांची इच्छा आहे.