शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा !

By सुधीर महाजन | Updated: November 14, 2020 11:15 IST

नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत.

- सुधीर महाजन

पैठणला गावातल्या नाथांच्या मंदिराकडे जाताना गल्लीच्या तोंडाशी कोपऱ्यावर असलेला ओटा कुच्चर ओटा म्हणून ओळखला जातो. आता पडझड झाली असली तरी त्याला गेल्या काही शतकांचा इतिहास आहे. म्हणजे संत एकनाथांच्या काळात धर्ममार्तंड म्हणवून घेणाऱ्या मुखंडांचा हा अड्डा होता आणि गंगेवर म्हणजे गोदावरीवर स्नानासाठी जाणाऱ्या नाथांवर हे मुखंड चिखल फेकत, दगड आणि टोमणेही मारत. म्हणजे हे गावभरच्या निंदानालस्तीचे ठिकाण होते, तर नेमकी आज या कुच्चर ओट्याची ओळख १४ नोव्हेंबरच्या निमित्ताने झाली. पं. जवाहरलाल नेहरूंचा हा जन्मदिवस ‘बालदिन’, तर नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. या ओट्यांवर आवडीने चघळले जाणारे दोनच विषय प्रामुख्याने दिसतात. एक तर नेहरू आणि एडविना माऊंट बॅटन यांचे संबंध आणि दुसरा विषय १९६२ मध्ये चीनसोबत युद्धात झालेला भारताचा पराभव.

नेहरू आणि एडविना यांच्यात मैत्री होती, हे स्पष्टच आहे; पण त्याविषयाची चर्चा भारताबाहेरही होती. ख्यातनाम लेखक पत्रकार खुशवंतसिंग यांच्या आत्मचरित्रातही एक प्रसंग सांगितला आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयामध्ये खुशवंतसिंग प्रसिद्धी विभागाचे प्रमुख होते. नेहरू एकदा ब्रिटन दौऱ्यावर आले. त्यावेळी सगळ्या भेटीगाठी आवरून ते एडविनाच्या घरी मध्यरात्री पोहोचले, तर सकाळी सगळ्या प्रमुख वृत्रपत्रांच्या पहिल्या पानावर नेहरूंचे एडविनाच्या दारासमोरचे छायाचित्र झळकलेले होते. नेहरू आणि एडविना यांची मैत्री हा त्यांच्या खाजगी आयुष्याचा भाग होता, हे आपण विसरतो.

चीनचा प्रश्न हा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा. नेहरूंनी चीनवर अनाठाई विश्वास ठेवला आणि त्यांचा अंदाज चुकला; परंतु नेहरू ज्यादृष्टीने भारत- चीन संबंधांकडे पाहत होते, ते फलद्रूप झाले असते, तर आशिया हा जगातील महासत्ता बनला असता. चीनसह पूर्वेकडील देश आणि भारत यांच्या संबंधांकडे नेहरू हे शेकडो वर्षांच्या साहचर्यातून पाहत होते. १९६२ पूर्वी कधीही भारत- चीन यांच्यात संघर्ष झालेला नव्हता. शांततामय शेजारी असाच चीन होता. या दोन्ही देशांमध्ये शतकानुशतके व्यापारी संबंध होते. बौद्ध धर्म हा एक समान दुवा होता आणि या भावनिक नात्याने पूर्वेकडील चीनसह कंबोडिया, म्यानमार, कोरिया, जपान, व्हिएतनाम हे भारताशी जोडलेले होते. शिवाय या सगळ्याच देशांनी वसाहतवादाचा जुलूम सहन केलेला होता. हे सगळे देश एकापाठोपाठ स्वतंत्र झाले होते. इतिहासाचे संदर्भ लक्षात घेऊन या साधर्म्याच्या आधारावर पूर्व आशिया एक महासत्ता या नजरेने नेहरू परराष्ट्र संबंधांकडे पाहत होते. चीनमध्ये चॅग कै शेक सत्तेवर असेपर्यंत भारत- चीन संबंध एका सुदृढ वळणावर पोहोचलेले होते.

जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर ब्रिटन, रशिया यांच्या बाजूने अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. त्यावेळी भारताने आणि पर्यायाने काँग्रेसने दोस्त राष्ट्रांना पाठिंबा देऊन भारताने युद्धात मदत करावी, अशी अमेरिकेची इच्छा होती; परंतु युद्धानंतर भारतात लोकशाहीवादी सरकार स्थापन करण्याची ब्रिटनची हमी नेहरूंना अमेरिकेकडून पाहिजे होती. प्रारंभी, अमेरिकेने आशा दाखवली. किंबहुना भारतासह सर्व वसाहतवादी देशांना स्वातंत्र्य देण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे नेहरूंना वाटत होते; परंतु अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या जाहीरनाम्यात त्याचा साधा उल्लेखही नव्हता. भारत- अमेरिका संबंधातील दुरावा येथूनच स्पष्ट झाला म्हणून पूर्व आशियाचा महासंघ बनवून एक जागतिक शक्ती म्हणून भारतासह या सर्व देशांनी पुढे आले पाहिजे, हा सिद्धांत त्यांनी मांडला. चीनच्या आक्रमणानंतर नेहरूंचा भ्रमनिरास झाला. नेत्याचा एखादा निर्णय चुकतो; पण त्याचे विश्लेषण त्याच काळातील परिमाणांना समोर ठेवून केले पाहिजे; पण आजच्या परिमाणावर ते निर्णय तपासले जातात. स्वातंत्र्यानंतर विभाजनामुळे उद्भवलेल्या धार्मिक उन्मादाच्या काळातील लाटेवर स्वार होऊन हिंदुत्ववादी भारत निर्माण करणे नेहरूंना सोपे होते; पण त्यांनी प्रवाहाविरुद्ध जात धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यास प्राधान्य दिले आणि तशी सक्षम लोकशाही अस्तित्वात आणली. याचा आज दुर्दैवाने विसर पडला आहे. नेहरूंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला खुजे करण्यासाठी हे आभासी कुच्चर ओटे तयार झाले; पण नेहरू उत्तुंगच आहेत.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूchinaचीनEnglandइंग्लंड