शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

पंजाब ऑपरेशन : ...म्हणून काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेली शस्त्रक्रिया गरजेचीच होती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:41 IST

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही.

भारतीय जनता पक्षाने आपले मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये बदलले. मात्र  ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यांनी बंडखोरीची भाषा केली नाही. पंजाबमध्ये आता काँग्रेसला कॅप्टन बदलावा लागला. अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला, पण सिंग यांनी मुकाट्याने पद सोडले नाही. त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अजून ते थेट काँग्रेसविरुद्ध काही बोललेले नाहीत. पण आपण फार अवमानीत झालोय असे अमरिंदरसिंग यांनी नमूद केले आहे. शिवाय आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत, योग्यवेळी योग्य पर्याय वापरायचा असतो, पण तूर्त आपण काँग्रेससोबत आहोत, अशा अर्थाचीही विधाने सिंग यांनी केली. देशात अगोदरच गलितगात्र झालेल्या काँग्रेससाठी एवढा इशारा पुरेसा आहे. देशातील काँग्रेसविरोधी शक्तींचे बळ वाढविणारा हा इशारा आहे. अमरिंदरसिंग योग्यवेळ साधून काँग्रेसला पंजाबमध्ये अडचणीत आणू शकतात. यापुढे गोव्यासोबतच पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. अशावेळी मुख्यमंत्री बदलणे हे काँग्रेसचे पंजाबमधील मोठे ॲापरेशन आहे. काँग्रेसला ही शस्त्रक्रिया करताना देखील भाजपसारखी शांतता पाळता आली नाही किंवा भाजपसारखे कौशल्य दाखविता आले नाही. अर्थात भाजपकडे केंद्रात सत्ता असल्याने त्या पक्षाचे कोणतेच मावळते मुख्यमंत्री भाजपला आव्हान देण्याची भाषा करू शकत नाहीत.

काँग्रेस हा अजूनही देशातील प्रमुख विरोधी पक्ष असला तरी, तो पक्ष असाहाय्य स्थितीत आहे. त्यामुळेच अमरिंदरसिंग हे काँग्रेसला योग्यवेळी योग्य तो धक्का देऊ शकतात. आपल्या अवमानाचा बदला ते घेतील असेच संकेत मिळतात. अमरिंदरसिंग यांना पद सोडावे लागेल याचे संकेत गेले काही महिने मिळतच होते. कारण तेथील काँग्रेसमध्ये प्रचंड वाद सुरू होता. प्रदेश काँग्रेस समिती त्यांच्यासोबत नव्हती, शिवाय आमदारांमध्येही गट निर्माण झाले होते. काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी शेवटी आमदारांचे व प्रदेश काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आदींचे मत मान्य करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. अमली पदार्थ व्यवहारांपासून पंजाबला मुक्ती देण्याचे आश्वासन देत काँग्रेस पक्ष तिथे सत्तेवर आला होता. २०१७ साली विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतानाच तेथील काँग्रेसने पंजाबमधील ड्रग्सच्या व्यवहारांना पूर्णपणे मूठमाती दिली जाईल असे जाहीर केले होते. स्वत: अमरिंदरसिंग यांनी तशी शपथही घेतली होती. मात्र गेल्या चार वर्षांत पंजाबमध्ये ड्रग्सचा राक्षस ते पूर्णपणे नियंत्रणात आणू शकले नाहीत. अमली पदार्थ व्यवहारांमधील अनेक गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करून खटले भरले गेले. पण बडी धेंडे मोकळीच राहिली अशा प्रकारची जनभावना पंजाबमध्ये निर्माण झाली. जनतेमधील हा समज अमरिंदरसिंग दूर करू शकले नाहीत. अमरिंदरसिंग हे हुशार आहेत. ते थेट बोलणारेही आहेत. काँग्रेसची संस्कृती त्यांच्या अंगात भिनलेली आहे. पण त्यांची कार्यपद्धत अनेक आमदारांना मान्य नव्हती. अमरिंदसिंग यांना भेटणे म्हणजे मोठे अग्निदिव्य आहे अशी तक्रार अनेक आमदार करत असत. अमरिंदरसिंग चंदिगढमध्ये सचिवालयात देखील जात नसत. त्यांच्याभोवती त्यांचाच एक कंपू असायचा व त्यामुळे ते आमदारांपासून व जनतेपासून तुटले असल्याची भावना निर्माण झाली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेण्यापूर्वी ह्या जनभावनेचाही विचार केला असेल.

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही यापूर्वी असे घडलेले आहे. काँग्रेसचे प्रतापसिंग राणे, विल्फ्रेड डिसोझा किंवा भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर हे जेव्हा मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा त्यांना जनभावना कळत नव्हती. त्यामुळेच या नेत्यांच्या काळात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. काँग्रेसने पंजाबमध्ये जी शस्त्रक्रिया केली आहे, त्याचे फळ काय मिळेल हे तूर्त सांगता येत नाही पण ही शस्त्रक्रिया गरजेची होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अमरिंदरसिंग यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. काँग्रेसची हानी होईल अशा प्रकारचे पाऊल अमरिंदरसिंग यांनी उचलू नये, त्यांनी पक्षहित हेच कायम नजरेसमोर ठेवावे असा उपदेश गेहलोत यांनी केला आहे. अशा प्रकारचे उपदेश करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत, पण जेव्हा स्वत: त्याग करण्याची वेळ येते तेव्हा असे अनेक नेते वेगळा विचार करत असतात हे देखील तेवढेच खरे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री