शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

पाऊस आला मोठा, मोजला खोटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 3:38 AM

ढोबळ पद्धतीने नोंदविल्या जाणाऱ्या पावसाच्या नोंदी शेतकऱ्यांना पैसेवारी, पीकविमा, नुकसानभरपाईपासून वंचित ठेवतात़ कर्नाटकच्या स्वयंचलित पद्धतीची चर्चा झाली़

- धर्मराज हल्लाळेढोबळ पद्धतीने नोंदविल्या जाणाऱ्या पावसाच्या नोंदी शेतकऱ्यांना पैसेवारी, पीकविमा, नुकसानभरपाईपासून वंचित ठेवतात़ कर्नाटकच्या स्वयंचलित पद्धतीची चर्चा झाली़ मात्र महाराष्ट्रात आजही अशास्त्रीय पद्धतीने पाऊस मोजला जातो़ पर्जन्यमापक यंत्रे ज्या स्थितीत आहेत, ते पाहता ‘पाऊस आला मोठा़़़ मोजला खोटा़़़’ म्हणावे लागेल़राज्यातील ६५ टक्के कुटुंब ज्या शेतीवर अवलंबून आहेत अन् जी शेती पावसावर अवलंबून आहे, त्याचे मोजमाप अंदाजेच नव्हे तर अशास्त्रीय पद्धतीने केले जाते, ही मोठी शोकांतिका आहे़ पैसेवारी, पीकविमा, नुकसानभरपाई ज्या पर्जन्यमानावर आधारित आहे, ते पर्जन्यमान किती व कसे होते याची अचूक, शास्त्रीय नोंद आजही होत नाही़ एकीकडे शेजारच्या कर्नाटक राज्यात दहा वर्षांपासून स्वयंचलित पर्जन्यमापक अस्तित्वात आहेत़ प्रगत, शेतीप्रधान महाराष्ट्रात मात्र पावसाची आकडेवारी सुमारे, अंदाजे शब्दांमध्ये अडकली आहे़ लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्जन्यमापक व त्याच्या नोंदींचा आढावा घेतला़ जे वास्तव समोर आले ते एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादित नाही़ त्याला धोरणात्मक निर्णयच झाले पाहिजेत़पैसेवारी गावनिहाय मोजली जाते़ मात्र संबंध राज्यात पर्जन्यमापके मंडळस्तरावर बसविण्यात आली आहेत़ हे यंत्र दोन गुंठे खुल्या क्षेत्रात बसविले पाहिजे़ बाजूला झाडे -झुडपे वा कुरणे नसावीत़ यंत्राच्या वरच्या बाजूला असणारे नरसाळे हे २०० स्क्वेअर सेंटीमीटरचे असावे़ त्याच्या खालील भांडे ५ लिटरचे असावे़ त्या भांड्यात पडलेले २४ तासातील पावसाचे पाणी सकाळी ८ वाजता मोजावे, असे अपेक्षित आहे़ अनेक ठिकाणी ७ वाजता मोजले जाते़ काही ठिकाणी साडेआठ वाजता मोजले जाते़ आश्चर्य म्हणजे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सकाळी ८ वाजताच मागील चोवीस तासाच्या पावसाच्या नोंदी दिसतात़ मुळात ८ वाजता नोंदी घेतल्यावर त्या लगेचच ८ वाजताच संकेत स्थळावर कोठून येतात़ एका जिल्ह्यात साधारणपणे मंडळस्तरावर ५० ते ६० यंत्रे आहेत़ त्याच्यावरील नोंदी रोजच्या रोज घेतल्या जात नाही़ २४ तासात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर शासकीय यंत्रणा अतिवृष्टी झाली, असे म्हणते़ ज्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते़ परंतु, सलग तीन दिवस ३० ते ४० मिलीमीटर पाऊस पडला अन् पिकांचे नुकसान झाले तर सरकार दप्तरी ती अतिवृष्टी असत नाही़ या गणितीय पद्धतीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होते़ मुळात मातीची पाणीधारण क्षमता संपली की पिके वाहून जातात़ माती खरडून जाते़ मात्र सरकारी निकषांमुळे अतिवृष्टीची व्याख्या बदलत नाही़ यंदा मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली़ मराठवाड्यात वेळेवर पेरणी होईल, अशी आजची स्थिती आहे़ अनेकदा दोन पावसांमध्ये खंड पडतो. परंतु, सरासरी गाठली जाते़ एकीकडे पिकांचे नुकसान होते़ मात्र आकडेवारीच्या निकषात शेतकरी मदतीला पात्र ठरत नाही़ त्यामुळे पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीपेक्षा शासनाने तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांच्या पंचनाम्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे़ कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा, विदर्भासाठी अचूक पर्जन्य मोजले जाणे अधिक गरजेचे आहे़ सेंटीमीटर, मिलीमीटर नव्हे तर नॅनोमीटरच्या जमान्यात ढोबळ पद्धतीने मोजला जाणारा पाऊस शेतकऱ्यांना कसा न्याय देईल़ जे कर्नाटकला परवडते ते महाराष्ट्राला का परवडत नाही़ सरकार इतके का हतबल, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात़ हवामान बदलामुळे आपल्याकडील अवर्षण, अतिवृष्टी, उष्णतेची लाट, गारपीट हे विषय जागतिक आहेत़ लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला, तेव्हा जगातले प्रसारमाध्यमे धावली़ त्यामुळे हवामान बदलाचे विषय गाव नव्हे तर जागतिक पातळीवरचे आहेत़ परिणामी, नुकसानभरपाई विमा कंपनी, सरकार इतकी स्थानिक नसून ती जागतिक स्तरावर मिळू शकते़ त्यासाठी अचूक नोंदी घेणे व शास्त्रीय पद्धती अस्तित्वात आणणे गरजेचे आहे़ तसे घडले तर गाव, शिवारात पडलेला मोठा पाऊस खोटा ठरणार नाही़