शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Ram Sutar: माणसाने वर्तमानात जगावे! ना भूतकाळाचे ओझे, ना भविष्याची चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:09 IST

Ram Sutar: वयाच्या ९७व्या वर्षीही कार्यरत असणारे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

- राम सुतारख्यातनाम शिल्पकार

वयाच्या ९७व्या वर्षीही कार्यरत असणारे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

आपले बालपण गरिबीत गेले. आज तुमच्याकडे यश आणि पैसा दोन्ही आहे. या प्रवासाकडे कसे बघता? माझे वडील सुतार होते. कुटुंबात चालत आलेले काम मी पुढे नेले. पुढे त्या रोपट्याचे झाड झाले, त्याला फांद्या फुटल्या, फुले-फळे लागली. बस आणखी काय?

आपण चांगली चित्रे काढता, मग आपण शिल्पकार होणे का पसंत केले? प्रत्येक शिल्प तयार करण्याच्या आधी रेखाचित्र तर काढतोच. मी पुष्कळ चित्रे काढली आहेत. पण सर्वाधिक आनंद शिल्प तयार करण्यात मिळाला.

आपली शिल्पं देहबोलीतून तर संवाद साधतातच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपण कसे पकडता? जर समोरची व्यक्ती हसली तर तिच्या चेहऱ्याच्या मांसपेशी कशा काम करतील आणि रागावली तर या मांसपेशी कशा वळतील, याची कल्पना मी करतो. त्यातूनच हावभाव तयार होतात आणि बदलतात.

गांधीजींची तुमची बहुतेक शिल्पं ध्यानमुद्रेतच का? त्यांच्या जीवनाला इतर अनेक पैलू होते. गांधीजींचे माझे पहिले शिल्प हसरेच होते, परंतु संसदभवनात स्थापित करण्यासाठी सरकारला ध्यानमुद्राच पाहिजे होती. आज जगातील ५०हून अधिक देशात मी तयार केलेली गांधीजींची हीच मुद्रा बसवली आहे. शांती आणि अहिंसेचे ते प्रतीक आहे.

आपल्या जीवनातील सर्वात चांगला, सर्वात वाईट काळ कोणता? मी वर्तमानात जगतो. घडून गेलेल्या गोष्टींचे सुख-दुःख बाळगत नाही आणि भविष्याची चिंता करत नाही. जे झाले ते झाले. पुढचा विचार काही करायचा नाही. यामुळे मला जीवनातला सगळाच काळ चांगला वाटतो.

कोणते शिल्प तयार करताना अडचणी आल्या? मला शिल्प तयार करताना आनंद मिळतो. जे काम आपल्याला आवडते त्यात कधीच अडचण येत नाही.

आपल्या कल्पनेत असलेले, पण अजून प्रत्यक्षात न उतरलेले एखादे शिल्प आहे काय?मी गांधींच्या एका शिल्पाची कल्पना केली होती. जिच्यात ते दोन मुलांबरोबर आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाच्या हातात शांततेचे प्रतीक कबूतर आहे आणि मुलीच्या हातात समृद्धीचे प्रतीक फूल. हे शिल्प अजून बाकी आहे. शिवाय मुंबई आणि पुण्याच्यामध्ये एक डोंगर कापून शिवाजी महाराजांचे चरित्र कोरण्याचा विचार आहे. एक - दोनदा बोलणी झाली आहेत. महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला कधी मंजुरी देते ते बघायचे. 

अफगाणिस्तानातील बामियान, अमेरिकेतील माऊंट रुश्मोर स्मारक किंवा अजिंठा-वेरूळसारखे काही करण्याचा विचार आहे काय? मी सुरुवातीला अजिंठा - वेरूळमध्येच काम केले. काही गुंफा अपुऱ्या होत्या. त्यातील एकात गांधीजींचे शिल्प तयार करण्याचा विचार केला होता. गुजरातमधील केवडियात उभारलेल्या सरदार पटेलांच्या शिल्पाचे डोके माऊंट रुश्मोरमधील राष्ट्रपतींच्या डोक्यापेक्षा दहा फूट मोठे आहे. आणखी काय पाहिजे? शिवाय भारतात त्याप्रकारच्या खडकासारखे पहाडही नाहीत.

आपण तयार केलेल्या हजारो शिल्पांमधील आपल्याला सगळ्यात जास्त कोणते आवडते? मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर तयार होत असलेल्या गांधीसागर धरणावर उभी असलेले चंबळची शिल्प. त्याचे एक कारण आहे. केवळ ३५ वर्षांचा असताना मी हे काम केले. ते फक्त दहा हजार रुपयात चंबळचे सात फूट उंच शिल्प मागत होते. तिथे पोहोचल्यावर मला वाटले, इतके छोटे शिल्प दूरवरुन दिसणार नाही. ते जास्त पैसे द्यायला तयार नव्हते. मी तेवढ्याच पैशात एकट्याने एक वर्षात हे ४५ फूट उंचीचे चंबळ देवीचे शिल्प तयार केले. त्यांनी फक्त काँक्रीट दिले. त्याचा पहाड तयार करुन छिन्नी हातोड्याने हे शिल्प मी कोरुन काढले. धरणाच्या ठेकेदाराने छिन्नीला धार काढण्यासाठी फक्त एक माणूस दिला होता. मी दररोज त्या काँक्रीटच्या पहाडावर चढून संध्याकाळपर्यंत काम करत राहायचो. दोन राज्यांमधल्या सहयोगाचेही हे शिल्प प्रतीक असल्याने त्याचे ‘भाईचारा’ ठेवले. माझ्यासाठी कामाला महत्त्व होते, पैशाला नाही.आपण अडीचशे-तीनशे मीटर उंचीचे जगातील सर्वांत मोठे शिल्प तयार करता आहात. इतकी मोठी शिल्पं सटीक कशा तयार करता? पहिल्यांदा स्टुडिओमध्ये मातीचे मॉडेल तयार करतो. स्टायरोफोमचे मोठे मॉडेल करतो. नंतर संगणकावर त्याचे माप मोठे करत जातो. नंतर शिल्पाचे वेगवेगळे भाग फाउंड्रीत टाकले जातात. ते जोडून शेवटी मोठे शिल्प तयार केले जाते.

टॅग्स :Indiaभारतartकला