शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

कराचीतील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 11:40 PM

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची

स्वत:च्या पायाखाली काय जळतंय, हे न पाहता दुसऱ्याच्या घराला आग लावली की काय घडतं याचा जो लेखाजोखा पाकिस्तानातल्या कराची विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं नुकताच मांडला आहे, त्यानुसार कराचीतल्या ९० टक्के तरुणांच्या मते कराचीत रोजगाराच्या वा विकासवाढीच्या काहीही संधी नाहीत, तर किमान ४८ टक्के तरुण, संधी मिळाल्यास ‘पाक सरजमीं’ सोडून तातडीनं परदेशी जायला तयार आहेत! विद्यापीठानं अमेरिकन वकिलातीच्या अधिकाऱ्यांसमोरच एका जाहीर कार्यक्रमात जो शोधनिबंध प्रसिद्ध केला, त्यात या वास्तवाची मांडणी केली आहे. ‘डिटर्मिनेशन आॅफ यूथ इमिग्रेशन’ अर्थात ‘तरुणांची स्थलांतरामागची प्रबळ इच्छा’ हा या शोधनिबंधाचा विषय होता. हा शोधनिबंध म्हणतो की, ४१ टक्के तरुणांना राजकीय अस्थैर्य असल्यामुळे शहरातल्या कुठल्याही विकासकामात सहभागी व्हावं असं वाटत नाही. आजच्या घडीला कराचीतली ३० टक्के, म्हणजे सुमारे २.२ कोटी लोकसंख्या १५ ते २९ वर्षे या वयोगटातील आहे व त्यातील ९० टक्क्यांना असे वाटते की, या शहरात आपल्याला काही भवितव्यच नाही. रोजगाराचा अभाव, असुरक्षितता, आर्थिक चणचण आणि भवितव्यात काहीही भलं न घडण्याची ठाम खात्री या मुलांना देशत्याग करण्यास भाग पाडत असल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेले ‘गॉलअप’ हे दुसरे सर्वेक्षण सांगते की, शक्य झाल्यास पाकिस्तानातल्या दोन तृतियांश लोकसंख्येला हा देश सोडून जगात कुठं तरी सुरक्षित आणि विकसित, शांत देशात जायचं आहे. अमेरिकेतल्या एमआयटी, स्टॅनफर्ड आणि वॉल्टन स्कूल आॅफ बिझनेस इथं शिकलेल्या पाकिस्तानी बुद्धिजीवींनी एकत्र येऊन ऐंशीच्या दशकात ‘गॉलअप पाकिस्तान’ ही संशोधन संस्था स्थापन केली होती. आजही ही संस्था आणि इतर समाज विचारवंत पाकिस्तानातल्या ‘ब्र्रेनड्रेन’ची चिंता व्यक्त करत हतबल आहेत. देशात शिक्षण, आरोग्य या विषयात काम करायला माणसं तयार नाहीत, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे. कराची विद्यापीठाच्या अभ्यासानुसार गेल्या सहा वर्षात ३७ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून अन्य देशात, विशेषत: आखाती देशात आसरा घेतला आणि २०१५ या एकाच वर्षात १० लाख लोक देश सोडून निघून गेले. शिकणाऱ्या तरुण मुलांना कराचीत कुणी राहायला जागा देत नाही कारण ‘एकेकट्यां’वर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही इतकी दहशत आहे आणि हिंदू तसेच शिया मुस्लीम मुलांना घरच काय नोकरी मिळण्याचीही मारामार आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत कराची शहरात हे घडत असेल तर अन्य भागात काय खस्ता हालात असतील, याचा विचार न केलेलाच बरा. दरम्यान, ‘सिंध’ प्रांतात आता अशाच कारणास्तव अशांतता पसरू लागली असून, बलुचींच्या क्षोभापाठोेपाठ आता सिंधमधील असंतोष ही पाकी सरकारसमोरील अजून एक धोक्याची घंटा आहे.