शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत, हरयाणातील पराभवावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
3
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
4
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
5
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
6
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
7
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
8
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
9
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
10
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट
11
जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्तींच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात! गेल्या निवडणुकीपर्यंत होता सर्वात मोठा पक्ष, पण आता...
12
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
13
बाहेरुन स्पा सेंटर पण...! जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला; मुलांसह ५ मुली ताब्यात, Video Viral
14
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
15
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
16
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
17
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
18
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
19
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
20
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

रिअ‍ॅल्टीचे अच्छे दिन

By admin | Published: December 13, 2015 11:01 PM

भारतातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सर्वात बदनाम क्षेत्र ‘रिअ‍ॅल्टी’ किंवा स्थावर मालमत्तेचे क्षेत्र! गेल्या काही वर्षांत स्थावर मालमत्तांचे भाव वाढत गेले,

भारतातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सर्वात बदनाम क्षेत्र ‘रिअ‍ॅल्टी’ किंवा स्थावर मालमत्तेचे क्षेत्र! गेल्या काही वर्षांत स्थावर मालमत्तांचे भाव वाढत गेले, तसतसा या क्षेत्रात काळ्या पैशाचा शिरकाव होत गेला आणि किमान महानगरांमध्ये तरी हे क्षेत्र पूर्णपणे ‘अंडरवर्ल्ड’च्या ताब्यात गेले. परिणामी आज एखादा विकासक किंवा बिल्डर स्वच्छ आणि नियमानुसार काम करू शकतो, यावर कुणाचा विश्वासच बसत नाही. नियामक यंत्रणेचा अभाव, हे त्यामागील मोठे कारण आहे. नियामक यंत्रणेच्या अनुपस्थितीमुळे, ज्याच्या गुड्यात भ्रष्टाचार किंवा काळे धंदे करून कमावलेले चार पैसे आहेत, अशा कुणीही उठावे आणि विकासक किंवा बिल्डर बनावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु आता उशिरा का होईना, या क्षेत्रासाठीही नियामक यंत्रणा अस्तित्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने स्थावर मालमत्ता (नियमन आणि विकास) विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल, व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल व प्रकल्प अंतिम मुदतीच्या आत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थावर मालमत्ता प्रकल्पांचे नियमन करणाऱ्या नियामक प्राधिकरणाचे गठन केले जाईल. प्रवर्तक, जमिनीची स्थिती, मंजूर नकाशा, करारमदार आदि सर्व प्रकारची माहिती, तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व व्यक्तींची माहिती उघड करावी लागेल. एवढेच नव्हे, तर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची हमी म्हणून विकासकांना एक विशिष्ट रक्कम एका बॅँक खात्यात ठेव म्हणून जमा करावी लागणार आहे. शिवाय त्यांना ग्राहकांच्या परवानगीशिवाय मंजूर नकाशात बदल करता येणार नाहीत. एवढे करूनही ग्राहक व विकासकादरम्यान कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास, त्याच्या जलद निराकरणासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कायदा अस्तित्वात आल्यावर दिवाणी न्यायालयांना या क्षेत्राशी निगडित खटले दाखल करून घेता येणार नाहीत. ग्राहक पंचायतींना मात्र तो अधिकार असेल. थोडक्यात, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ जवळ आल्याचे दिसते; मात्र त्यासाठी आवश्यक असलेले संसदेचे कामकाज सुरळीत पार पडावयास हवे.