शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दिलासा आणि उसासा! नाेटाबंदीची निर्णयप्रक्रिया योग्य होती की नाही, हा सुनावणीचा केंद्रबिंदू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 10:07 IST

घटनापीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती बी. व्ही. नागारत्ना यांनी मात्र नोटाबंदीचा निर्णय विकृत व बेकायदा असल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता जाहीर केलेला पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय लहरी व बेकायदा होता, असा दावा करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाली काढल्या आहेत. प्रत्यक्षात केंद्र सरकार त्याआधी सहा महिने रिझर्व बँकेशी या विषयावर चर्चा करीत होते. त्यामुळे नोटाबंदीची निर्णयप्रक्रिया वैध ठरते, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ४-१ अशा बहुमताने दिला आहे. न्या. भूषण गवई, न्या. अब्दुल नझीर, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रम्हण्यम या चौघांनी नोटाबंदीच्या वैधतेच्या बाजूने कौल दिला, तर घटनापीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती बी. व्ही. नागारत्ना यांनी मात्र नोटाबंदीचा निर्णय विकृत व बेकायदा असल्याचे म्हटले आहे.

आधी घोषणा झाली व पुढच्या २४ तासांत सोपस्कार आटोपले गेले. रिझर्व बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने केंद्र सरकारच्या इच्छेनुसार हो ला हो लावले, असे न्या. नागारत्ना यांनी म्हटले असले तरी, अल्पमतातील भाष्य यापलीकडे त्यांनी नोंदविलेल्या निकालाला फारसे महत्त्व उरत नाही. चार न्यायमूर्तींनी नोटाबंदीच्या निर्णयावर केलेले वैधतेचे शिक्कामोर्तब हा केंद्र सरकारला मोठा दिलासा आहे. सोबतच चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजारांच्या नोटा बदलण्यासाठी सरकारने दिलेली ५२ दिवसांची मुदत पुरेशी व योग्य होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी १९७८ सालच्या नोटाबंदीवेळी सुरवातीचे तीन व नंतरचे पाच अशा एकूण आठ दिवसांच्या मुदतीशी तुलना करण्यात आली आहे. नोटाबंदी वैध आहे हे खरे. परंतु, तिचे उद्देश साध्य झाले का हे ठरविणे आता संयुक्तिक नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. बनावट चलनी नोटांचा सुळसुळाट, दहशतवादाला अर्थपुरवठा, काळा पैसा व करचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आणि तसा निर्णय घेणे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे.

मुळात सारे काही घडून गेल्यानंतर सहा वर्षांनंतर हा निकाल आला. म्हणूनच कालचक्र उलटे फिरविणे किंवा न्यायमूर्तींच्या भाषेत फुटलेले अंडे पुन्हा जोडणे शक्य नव्हतेच. नोटाबंदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाला मर्यादा होत्या. त्या मर्यादांचा उल्लेख न्या. गवई यांनी निकालाचे वाचन करताना केलाच आहे. नाेटाबंदीची निर्णयप्रक्रिया योग्य होती की नाही, हा त्या सुनावणीचा केंद्रबिंदू होता. नोटाबंदी यशस्वी झाली की नाही, या प्रश्नाच्या उत्तराला सर्वोच्च न्यायालयाने स्पर्श केलेला नाही. ते उत्तर व्यक्ती व कालसापेक्ष असणार हे स्पष्ट आहे. एकतर हा निकाल प्रत्यक्ष घोषणेनंतर ६ वर्षे व ५४ दिवसांनी आला आहे. सामान्य माणसांना नोटाबंदीमुळे अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. शंभरावर नागरिकांचे बळी गेले. काहींनी बंद नोटा बदलण्याचा गोरखधंदा मांडला व स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले.

पाचशे व हजारच्या जुन्या नोटा गेल्या आणि दोन हजारांची नवी नोट आली. मोठ्या नोटांमुळे काळा पैसा वाढतो हा युक्तिवाद त्यामुळे निष्प्रभ झाला. डिजिटल इकॉनॉमीला प्रोत्साहन, नोटांमधील व्यवहार कमी करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात नोटाबंदीच्या आधी, ४ नोव्हेंबर २०१६ रोजी १७.७४ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या, तर सहा वर्षांनंतर, २३ डिसेंबर २०२२ ला ती रक्कम ३२ लाख ४२ हजार कोटींवर पोचली. आधीच्या तुलनेत तब्बल ८३ टक्के अधिक नोटा चलनात आहेत. नकली नोटा, काळा पैसा, टेरर फंडिंग किंवा करचोरी या इतर उद्देशांबद्दलही सरकार व विरोधकांची मते वेगळी आहेत.

या पार्श्वभूमीवर, आर्थिक धोरणांशी संबंधित कार्यकारी व्यवस्थेचा अधिकार मान्य करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता राजकीय अंगाने पुढे नेला जाईल. नोटाबंदी वैध आहे म्हणजेच यशस्वीदेखील आहे, असा प्रचार सरकार व सत्ताधारी पक्ष करीत राहील तर तो निर्णयप्रक्रियेच्या पातळीवर वैध ठरवला गेला तरी त्याने दिलेल्या यातना व अर्थव्यवस्थेला बसलेला फटका हे सरकारच्या तुघलकी निर्णयाचे दुष्परिणाम आहेत, असे आरोप विरोधक करीत राहतील. थोडक्यात, सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बऱ्यापैकी तांत्रिक आहे. त्यामुळे सरकारला दिलासा मिळाला असला तरी ती नोटाबंदीवेळी तसेच नंतरही सोसाव्या लागलेल्या सामान्यांच्या वेदनांवर फुंकर नाही. तशी फुंकर मारणे सर्वोच्च न्यायालयाला शक्यही नव्हते.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय