शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

तिरंग्याचा सन्मान राखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:27 IST

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिन किंवा गणतंत्र दिन आला की देशभरात देशभक्तीचे वारे वाहू लागतात. विविध संघटनांकडून हे राष्ट्रीय सण धूमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू होते. नागपुरातील तरुणाईचा समावेश असलेल्या एका संघटनेकडून मात्र स्वातंत्र्यदिनाच्या सप्ताहात ‘तिरंगा सन्मान’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. चौकाचौकांमध्ये, रस्त्यांवर पडलेले, अनवधानाने फाटलेले किंवा चुरगळल्या गेलेले कागदी झेंडे गोळा करण्याचे काम या संघटनेकडून करण्यात येईल. वरकरणी हे वृत्त फार मोठे वाटत नसले तरी व्यापक पातळीवर याचे महत्त्व फार मोठे आहे. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी एखाद्या संघटनेला समोर यावे लागते हे समाजातील कृतिहीनता व असंवेदनशील वाढली असल्याचेच द्योतक आहे. ज्या तिरंग्याला घडविण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी अगणित स्वातंत्र्यसैनिक, सैन्याचे जवानांनी स्वत:च्या जीवाचे बलिदान केले, त्याचे मोलच उरले नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. स्वातंत्र्यदिनी जागोजागी तिरंग्याचा सार्वजनिकपणे अपमान होताना दिसतो. गाड्यांवर लावण्यासाठी, मोटारसायकल रॅलीवर मिरविण्यासाठी तिरंगे उत्साहाने घेतले जातात. मात्र अतिउत्साहात तिरंग्याचा अपमान होत असल्याची जाणदेखील राहत नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल दामटत असताना तिरंगा कधी रस्त्यावर पडतो हे कळतदेखील नाही. रस्त्यावर तिरंगा पडलेला दिसला तरी त्याला उचलण्याची तसदी फारच कमी नागरिक घेतात. रस्त्यांवर पडलेल्या कागदी झेंड्यावरून चालताना किंवा वाहन चालविताना थोडीदेखील लाज वाटत नाही. मुळात आपण चुकतो आहे, अशी भावनादेखील अनेकांच्या मनात येत नाही. मागील काही वर्षांपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. भरीस भर म्हणजे प्रशासनाकडूनदेखील यासंदर्भात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आपला देश राष्ट्रीय अस्मितेला जागविणाऱ्या महान देशभक्तांच्या संस्कारांनी घडलेला आहे. मात्र आज त्याच संस्कारांवर असंवेदनशीलतेची माती लोकांकडून टाकण्यात येत आहे. ही स्थिती केवळ नागपुरातच नव्हे तर देशातील प्रत्येक भागात दिसून येते. तिरंग्याला जर जिव्हा असती तरी त्याने त्याच्यासाठी झटलेल्या देशभक्तांच्या वेदना नक्की बोलून दाखविल्या असत्या. आपल्या देशाची संस्कृती, शौर्य, धैर्य व त्याग यांचे राष्ट्रध्वज तिरंगा प्रतीक आहे. तिरंग्याचा सन्मान राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाने स्वत: यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. पुढील पिढ्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी व सन्मानाची भावना जागविण्यासाठी आज यासाठी पाऊल उचलले गेलेच पाहिजे.

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या