शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 02:56 IST

साई संस्थान हे राजकीय व्यासपीठ नाही. त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असे शेरे खुद्द न्यायालयाने अनेकदा नोंदविलेले आहेत.

- सुधीर लंकेसाई संस्थान हे राजकीय व्यासपीठ नाही. त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असे शेरे खुद्द न्यायालयाने अनेकदा नोंदविलेले आहेत. परंतु, यातूनही राजकारण्यांनी धडा घेतलेला नाही. काँग्रेस-राष्टÑवादीने या संस्थानचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला, असा आरोप झाला. मात्र, भाजपनेही तोच कित्ता गिरविला. तेही बेमालूमपणे व शहाजोगपणाचा आव आणत हे संस्थान राजकारणासाठी वापरताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यातही हेच घडले.साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जो शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला त्याची सांगता मोदी यांच्या हस्ते झाली. वास्तविकत: हा शताब्दी उत्सव नेमका काय साजरा झाला? इथपासून प्रश्न आहे. शताब्दी उत्सवाची सुरुवात राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करुन झाली होती. हे विमानतळ म्हणजे शताब्दी वर्षाची उपलब्धी आहे, असा दावा संस्थानचे विश्वस्त मंडळ मोदींच्या कार्यक्रमात करताना दिसले. वास्तविकत: या विमानतळाची मुहूर्तमेढ विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रोवली गेली. ते कार्यान्वित फडणवीस सरकारच्या काळात झाले. त्यामुळे याचे श्रेय केवळ या विश्वस्तांना व सरकारला देणे अयोग्य ठरेल. शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबवू असे सांगत फडणवीस सरकारने ३२०० कोटींच्या पॅकेजची घोषणा शिर्डीसाठी केली होती. प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. शताब्दीसाठी दोन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार, एक कार्यकारी अभियंता, एक पोलीस उपअधीक्षक असे मोठे मनुष्यबळ संस्थानकडे प्रतिनियुक्तीवर आले. पण, कुठलीही योजनाच न आल्याने या अधिकाºयांना वर्षभर कामच नव्हते अशी परिस्थिती आहे. मोदींच्या दौºयासाठी निमित्त हवे म्हणून मंदिरातील दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, सोलर प्रोजेक्ट, साईउद्यान अशा काही प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या दौºयावर संस्थानचा दोन कोटींच्या आसपास खर्च झाल्याचा अंदाज आहे. मोदी यांनी शिर्डीसाठी काहीही घोषणा केली नाही. याऊलट आपल्या सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा जोरदार प्रचार करुन घेतला. काँग्रेस आघाडी सरकार कसे फसवे होते व आपण कसे लायक आहोत, हे सांगण्यासाठी त्यांनी साईबाबांची चावडी वापरली. मोदी यांचे २०२२ चे स्वप्न साकार होण्यासाठी साईबाबा त्यांना शक्ती देवो, असे साकडेही फडणवीसांनी साईबाबांना घातले.भाजपने हा प्रचार फक्त याच कार्यक्रमात केला असे नव्हे. साईबाबांना सर्वधर्मीय लोक मानतात. एकाअर्थाने या मंदिरात धर्मनिरपेक्षता भेटते. साईबाबांंना विशिष्ट धर्मात अडकविण्यात आले नाही. मात्र, या विश्वस्त मंडळाने साईमंदिरात भगव्या पाट्या लावून मंदिराचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला. ही कृती त्यांनी अनावधानाने केली असे म्हणता येत नाही. मंदिरात ओम, त्रिशूल आणला. वर्षात साईसंस्थानमध्ये जमा होणारे रक्त राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या रक्तपेढ्यांना प्राधान्याने पुरविले गेले. संघ विचारावर उभ्या असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे शाही शिबिर संस्थानने शिर्डीत घेतले. शताब्दी उत्सवाचे जे काही मोजके उपक्रम झाले त्यात हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. एकीकडे असा वापर झाला. दुसरीकडे शिर्डीला निधी देताना सरकारने हात आखडता घेतला.कुंभमेळा आला की नाशिकचा कायापालट होतो. सरकार भरभरुन निधी देते. तोच न्याय मात्र शिर्डीला नव्हता. हा पक्षपात का? याबाबत शंका आहेत. शिर्डी शहराला व नगर जिल्ह्याला शताब्दी वर्षात घोषणांशिवाय काहीही मिळाले नाही. शताब्दी वर्षानिमित्त शिर्डीच्या वाहतुकीचा एक आराखडा बनविण्यात आला होता. तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी अवघे दोन कोटी रुपये लागणार होते. तो आराखडा मंजूर झाला नाही. मात्र, तेवढा खर्च मोदींच्या दौºयावर केला गेला. या दौºयात भाजप प्रदेशाध्यक्षांना आवर्जून बोलविण्यात आले होते. हा कार्यक्रम पक्षीय असल्याची ही एक मोठी पावती होती.शिर्डी हे महाराष्टÑातील सर्वात श्रीमंत तर तिरुपती नंतर देशातील दुसºया क्रमांकाचे देवस्थान मानले जाते. गोवा राज्यात वर्षाकाठी ४५ लाख पर्यटक भेट देतात, अशी आकडेवारी आहे. साई संस्थानच्या दाव्यानुसार शिर्डीत एकावर्षी साधारण दोन कोटी लोक भेट देतात. ४५ लाख पर्यटकांवर गोव्याचे अर्थकारण चालते. दोन कोटी लोकांना सामावून घेणारे शिर्डी शहर मात्र स्वत:चे अर्थकारणही नीट भागवू शकलेले नाही, हे वास्तव आहे. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आजवर शिर्डीचा राज्य सरकारने पर्यटनासाठी अपेक्षित वापरच केलेला नाही. नगर, नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे पर्यटनासाठी जोडले तरी या परिसराला चालना मिळेल. मात्र, तेवढ्या रस्त्यांची कामेही या शताब्दी वर्षात होऊ शकलेली नाहीत. पंतप्रधानांच्या दौºयात शिर्डी व महाराष्टÑ पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी घोषणांची अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणे मोदी २०२२ चे स्वप्न दाखवून निघून गेले. साईनगरीला त्यांनी हात दाखविला.(आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी