शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

समुद्र-मंथन

By admin | Published: January 31, 2017 5:01 AM

भारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर सर्व देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी देवांना राक्षसांच्या साहाय्याने समुद्रमंथन करून अमृत प्राशन करण्याचा सल्ला दिला. अमृत प्राशन केल्यानंतर अमरत्व प्राप्त करून देव असुरांवर विजय प्राप्त करतील, असे भगवान विष्णूंनी देवांना सांगितले. त्यासाठी मंदराचल पवर्ताचा रवि आणि नागराज वासुकीचा दोरीच्या रूपात उपयोग केला गेला. भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण करून मंदराचल पवर्ताला आधार दिला. समुद्रमंथनातून चौदा रत्नं बाहेर आली. सर्वात प्रथम हलाहल हे विष निघाले. ज्याला प्राशन करून भगवान शंकरांनी ब्रह्मांड वाचविले. त्यानंतर कामधेनु, कल्पवृक्ष, कौस्तुभमणी, ऐरावत हत्ती, उच्चै:श्रवा घोडा, अप्सरा व वारुणी (मद्याची देवता) इ.रत्ने बाहेर पडली. सर्वात शेवटी अमृतकलश हातात घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृतासाठी देवता व राक्षसांमध्ये युद्ध झाले. भगवान विष्णू यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांना भ्रमीत करून अमृत प्राशन केले. त्यामुळे सर्व देव पुन्हा शक्तिशाली झाले. समुद्रमंथनाची व्याख्या विद्वानांनी अनेक प्रकारे केली आहे. त्या सर्व व्याख्या व समुद्रमंथनाचा उद्देश लक्षात घेता असे म्हणता येईल की समुद्र मानवी मनाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे समुद्र अनंत व अगाध आहे, त्याचप्रमाणे मानवी मनालाही समजणे कठीण आहे. जसे समुद्रात सतत असंख्य लाटा उठत असतात, तसेच मनातसुद्धा क्षणाक्षणाला असंख्य विचार उत्पन्न होत असतात. ‘देव’ चांगल्या विचारांचे प्रतीक असून, ‘राक्षस’ वाईट विचारांचे. दोन्ही प्रकारचे विचार माणसाच्या मनात सतत घोळत असतात. या मंथनाचा उद्देश अमरत्व किंवा शाश्वत आनंद प्राप्त करणे हा आहे. समुद्रमंथनात दाखविलेला मंदराचल पर्वत हा गंभीरता व एकाग्रतेचे प्रतीक असून, एकाग्रतेशिवाय मानवी मनात खोलवर आपण पोहचू शकत नाही. कासव हा संयमाचे प्रतीक आहे. तसे पाहिले तर संयमाशिवाय मनाचे मंथनही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे नागराज वासुकीला बांधून मंदराचल पवर्ताला हलवले गेले, त्याचप्रमाणे साधक जीवन ऊर्जेच्या साहाय्याने एकाग्रतेला धरून ठेवतो. जर ऊर्जेची कमतरता असेल तर एकाग्रता राहणार नाही. अशाप्रकारे मनाच्या मंथनामध्ये साधकाला खूप वेदना होतात. हलाहल विष हे याच त्रासाचे प्रतीक आहे. हा त्रास सोसूनच साधक भगवान शंकराप्रमाणे होतो. जसजशी मन मंथनाची साधना पुढे जाते, तसतशा अनेक सिद्धी रत्नांच्या रूपात प्राप्त होतात आणि शेवटी त्याला अमृत प्राप्त होते. अर्थातच साधक आपल्या शाश्वत रूपाला प्राप्त करतो.