शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

सुरक्षेचा पोरखेळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2016 9:03 PM

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला आहे, अशी गुप्त वार्ता जेव्हां भारतीय सुरक्षा यंत्रणेला समजली तेव्हां सारे संबंधित सतर्क होणे अगदी स्वाभाविक होते. यंत्रणेला जे संभाषण ऐकावयास मिळाले त्यात ‘गुजरात’चा उल्लेख होता. दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल नासीरखान जांझुआ यांनीदेखील काही अतिरेकी भारतात घुसण्याची शक्यता असल्याच्या गुप्तवार्तेला दुजोरा दिला. सोमवारी देशभर साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या धार्मिक उत्सवाच्या वेळीच घातपात होईल असे गृहीत धरले गेले. परिणामी संपूर्ण देशभर तर सतर्कतेचा इशारा दिला गेलाच पण विशेषत: गुजरात राज्यास अधिकच सतर्क केले गेले. त्या राज्यात येणाऱ्या वा राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात सोमवारी देशात कुठेही गडबड झाली नाही आणि महाशिवरात्रीचा सण नेहमीप्रमाणेच साजरा झाला. दक्षता घेणे केव्हांही चांगलेच. खरे पाहाता घातपाताचा इशारा मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची तपासणी केली जाते तशी एरवीदेखील करायला काही हरकत नाही. पण तसे सहसा होत नाही. परंतु आता संबंधित सुरक्षा यंत्रणांनीच जी शक्यता व्यक्त केली आहे ती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था म्हणजे पोरखेळ तर नव्हे अशी शंका कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहाणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी ऐकलेल्या संभाषणातील गुजरात म्हणजे प्रत्यक्षात गुजरात राज्य नव्हे तर त्याच नावाचे पंजाबातील एक खेडे असावे असा तर्क या यंत्रणांनी बोलून दाखविला आहे. पंजाब सीमेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या या गुजरात गावात एक प्राचीन शिवमंदीर आहे आणि तिथे शिवरात्रीला म्हणे मोठी गर्दी उसळत असते. गेल्या वर्षभरात ज्या गुरुदासपूर येथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली गेली त्या ठिकाणापासूनही हे गाव अगदी जवळच आहे. अर्थात तिथेही बंदोबस्त होताच आणि कुठलीही संशयास्पद बाब तिथे आढळली नाही. अर्थात अशी सुरक्षा व्यवस्था देशातील बहुतेक सर्वच शिवमंदिरांना पुरविली गेली होती. पण यातील खरा मुद्दा वेगळाच आहे. दक्षता घेतली म्हणूनच काही झाले नाही या समाधानात सुरक्षा यंत्रणेने राहायला काही हरकत नव्हती. परंतु तसे न करता गुजरात या नावावरुन गोंधळ झाला असे जाहीर करुन एकप्रकारे त्यांनी त्यांचाच वेंधळेपणा जगजाहीर केला असेही यातून म्हणता येऊ शकते. शिवाय पाकिस्तानबाबतचा आजवरचा अनुभव लक्षात घेता तिकडून प्राप्त माहितीवर किती विश्वास ठेवायचा हाही एक नेहमीचाच प्रश्न असतो.