शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आत्मप्रौढीचे राजकारण आणि ढोंगी विरोधक

By admin | Published: October 14, 2016 12:42 AM

पंतप्रधान राजीव गांधी यांनी जेव्हां आपल्या विरोधकांना धारेवर धरताना, ‘हम अपने विरोधीयोंको उनकी नानी याद दिला देंगे’ अशा शब्दात तंबी

पंतप्रधान राजीव गांधी यांनी जेव्हां आपल्या विरोधकांना धारेवर धरताना, ‘हम अपने विरोधीयोंको उनकी नानी याद दिला देंगे’ अशा शब्दात तंबी दिली होती, तेव्हां तिच्यातून विनोद निर्माण होतानाच नाराजीसुद्धा निर्माण झाली होती. हिन्दी भाषेविषयीची त्यांची अडचणही यातून दिसून आली होती. परवा राहुल गांधींनीही मोदी सरकारवर टीका करतांना ‘रक्ताची दलाली’ असा शब्दप्रयोग केला. पण त्याने विनोदापेक्षा प्रचंड नाराजीच निर्माण केली, कारण दलाली हा शब्द त्यांनी लष्कराने सीमेवर केलेल्या कारवाईच्या संदर्भात वापरला होता. कदाचित त्यांच्या वडिलांप्रमाणे (आणि माझ्याप्रमाणेही) ते इंग्रजीत विचार करून मग हिंदीत बोलत असण्याने हा दोष निर्माण झाला असावा. जर राहुल गांधींनी ‘केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करीत आहे’, अशा शब्दात टीका केली असती तर बाण नेमका लक्ष्यावर साधला गेला असता. या संदर्भात एका सूत्राने असा दावा केला होता की, पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना संयम राखण्यास सांगितले होते. पण तरीही वाराणसीतल्या एका फलकावर मोदींना राम, नवाज शरीफ यांना रावण तर अरविंद केजरीवाल यांना मेघनाद यांच्या वेशभूषेत दाखवले होते. चांगल्याचा वाईटावर विजय असे दर्शविण्याचा हेतू त्यामागे होता. परंतु हे फलक आम्ही नव्हे तर शिवसेनेने लावले असा खुलासा नंतर भाजपाने केला. परंतु त्यानंतर काही दिवसातच लखनौ येथील मोदींच्या जाहीर कार्यक्रमाआधी मोदी आणि राजनाथसिंह यांचे फलक उभारले गेले व त्यात दोहोंना सैनिकाच्या वेशात चितारले जाऊन उरीचा सूड घेणारे अशा शब्दात त्यांचा गौरव केला गेला होता. यावेळीही भाजपाने आपले हात झटकून स्थानिक कार्यकर्त्यांकडे बोट दाखवले. परंतु फार काळ अशी लपवाछपवी चालू शकणार नाही हे ओळखून अखेरीस भाजपाच्या प्रवक्त्याने अशी प्रतिक्रिया दिली की, हे जनभावनेचे प्रतिबिंब आहे व त्यातून सर्जिकल स्ट्राईकला देशभरातून मिळत असलेला पाठिंबा लक्षात येत आहे. रामलीलेसारख्या सांस्कृतिक उत्सवात दहशतवादाचे संकट आणि मोदी सरकारने त्याविरुद्ध सुरु केलेला लढा यांचा संबंध का जोडला जाऊ नये, असा युक्तिवादही या प्रवक्त्याने केला. सर्जिकल स्ट्राईकनंतर देश शक्तिशाली झाल्याचे दाखविण्याचा भाजपाचा प्रयत्न असला तरी हा पक्ष व त्याचे सरकार यांच्यासमोर रोजगार निर्मितीचे प्रचंड मोठे आव्हान उभे आहे. कदाचित त्यावरुन जनतेचे लक्ष विचलित व्हावे म्हणूनच भावनिक राष्ट्रवाद पुढे केला जात असावा आणि अशा कामात भाजपाचा हातखंडाच आहे. नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या कारवाई नंतर शहरी मध्यमवर्ग पाकिस्तानला धडा शिकवल्याच्या आनंदात आहे. मोदींची प्रतिमाही उजळून निघाली आहे व त्यांच्या ‘छप्पन इंची छाती’च्या उक्तीला पुष्टी मिळाली आहे. अशा स्थितीत कोणत्याही पक्षाने निवडणुकीत मते खेचण्यासाठी या मुद्द्याचा जरुर वापर केला असता. भाजपाध्यक्ष अमित शाह तर खुलेपणाने म्हणत आहेत की सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या निवडणुकांत निर्णायक असेल. सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात सरकार मिरवित असलेल्या आत्मप्रौढीवर विरोधक टीका करीत आहेत पण तेही चुकत आहेत. तीव्र राजकीय स्पर्धेत सत्ताधारी पक्षाने अशा कामगिरीचे श्रेय घेऊ नये, असे म्हणणेच ढोंगीपणाचे आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९७१च्या युद्धातील विजयाचा काँग्रेसने नंतरच्या निवडणुकीत वापर केलाच होता. अर्थात त्या युद्धाची आणि आताच्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना होऊ शकत नाही. पण शत्रूच्या छावणीत घुसून केलेल्या कारवाईचे श्रेय मोदी सरकार राजकीय लाभासाठी नक्कीच करू शकते. जर मोदींच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले फलक रक्ताच्या दलालीचे पुरावे ठरत असतील तर १९८४च्या शीख विरोधी दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने केलेली विश्वासघातकी प्रचार मोहीम कशी विसरता येईल? पण यातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मोदी सरकारचे समर्थक करीत असलेली वेडगळ आत्मप्रौढी. एका बाजूला काश्मीरातील तणाव शिगेला पोहोचला आहे व दुसऱ्या बाजूला सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय लाटण्यासाठी अथक प्रचार केला जात आहे. अडचणीत आणणारे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जात आहे. चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर सरकारने अशी काही जादू केली आहे की, तिथे विरोधी मत मांडणाऱ्यांना थेट पाकिस्तानी किंवा आयएसआय एजंट ठरवले जात आहे. सरकारने भले लष्करी कारवाईची माहिती गुप्तच ठेवायचा निर्णय घेतला असला तरी ती सार्वजनिक करा अशी मागणी करण्याचा अधिकार विरोधकांना नसतो का? जर यात सुरक्षेसंबंधी काही अडचणी असतील तर मग सरकार कारवाईचे स्वरूप सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना विशद करू शकत नाही का? यातील सत्य इतकेच की राजकीय व्यवस्था कोलमडली आहे आणि देशाच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील मुद्द्यावरदेखील राष्ट्रीय सहमती निर्माण करण्याबाबत लोकशाही कमकुवत ठरत चालली आहे. सरकार व विरोधक परस्परांना शत्रू मानू लागले आहेत. इतकेच काय, पण सैन्यदेखील राजकीय हालचालींपासून अलिप्त राहिलेले नाही. आधीच्या सरकारशी उघड संघर्ष केलेल्या लष्करप्रमुखाला मंत्री करणे हे त्याचेच द्योतक आहे. याचा अर्थ राजकीय प्रभावापासून दूर असलेल्या मोजक्या संस्थांपैकी एका संस्थेत राजकारणाने प्रवेश केला आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे बहुसंख्यवाद. राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्माद निर्माण केला जात आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याला रामलीला उत्सवातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले, कारण म्हणे मुस्लीम व्यक्ती हिंदू पुराणावर आधारित कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही. दुसरीकडे दादरी हत्याकांडातील आरोपीच्या मृतदेहावर केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत तिरंगा ठेवण्यात येतो. यातून समाजातील वाढती फूट व राजकीय शोषण ठळकपणे दिसते. ताजा कलम- बोलके संरक्षण मंत्री म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राईकपूर्वी भारतीय सैन्य हनुमानासारखे होते. हनुमानाला ज्याप्रमाणे समुद्र उल्लंघन करण्याआधीपर्यंत त्याच्या स्वत:तील सामर्थ्याची कल्पना नव्हती, तशीच भारतीय सेनेलाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडेपर्यंत तिच्यातील आत्मशक्तीची कल्पना नव्हती’! मनोहर पर्रिकर हे विधान करुन असे तर सुचवीत नाहीत ना की, भारतीय सैन्य २९ सप्टेंबर, २०१६ पूर्वीपर्यंत आत्मरक्षण करु शकत नव्हते व त्यानंतरच त्यांनी ही कला आत्मसात केली?

 

- राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)