शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सेनेचे पाप, भाजपचे माफ? अजित पवारांसोबत भाजपने गुपचूप शपथविधी उरकला, तो धोका नव्हता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:46 IST

अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का? 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी करून शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्राच्या जनतेचा काैल अवमानित केला आणि हिंदुत्ववादी विचारांना धाेका दिला, असा आरोप करीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बरीच टोलेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना हाताशी धरून महाराष्ट्र जागा हाेण्यापूर्वी भाजपने गुपचूप शपथविधी उरकून घेतला हाेता, ताे हिंदुत्ववादी विचारांना धाेका नव्हता का? अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत नाही म्हणून अखेर शिवसेनेवर आघात करण्यात आला. गाेवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल आदी राज्यांत ताेडफाेड करूनच भाजपने सत्ता स्थापन केल्याचा गेल्या आठ वर्षांतील इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांना शब्द दिला नसेल; पण म्हणून शिवसेनेने दुय्यम भूमिकाच घ्यावी, असे थाेडेच आहे? १९९० पूर्वी महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर निवडून येण्याची क्षमता पंचवीस आमदारांचीच हाेती. शिवसेनेबराेबर युती झाल्यावर महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात भाजपचा स्वीकार सहज झाला. तत्पूर्वी जनसंघ किंवा भाजपनेही तत्त्वहीन आघाड्या केल्याच आहेत. बिहारमध्ये भाजपचे ७५ आमदार असताना केवळ पंचेचाळीस आमदार असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलेच हाेते. बिहारमध्ये एका रात्रीत आघाडीतील घटक पक्ष बदलतात, तेव्हा काेण काेणाला धाेका देते हे जनतेला समजणेच कठीण हाेऊन जाते. महाराष्ट्र हे आर्थिक आघाडीवरचे राज्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या तुलनेत अहमदाबादचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. शिवसेनेने मराठी माणसांच्या अस्मितेसाठीची लढाई सदैव केली आहे. त्याच पक्षात फूट पाडून शिवसेनेला संपवून टाकण्याची खेळी भाजपने केली. मुंबई महापालिकेची सत्ता एखाद्या राज्याएवढी बलदंड आहे. ती मिळविण्यासाठी आता धडपड चालू आहे. 

राजकारणात सर्व काही माफ असले तरी शिवसेनेने केले ते पाप ठरते आणि भाजपने केले ते माफ कसे? तीन दिवसांसाठी का असेना, अजित पवार यांच्याबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपने केला, तो शरद पवारांच्या राजकीय, नैतिक  वजनामुळे आमदार माघारी फिरल्याने बारगळला.  अशा तत्त्वहीन राजकारणाचा मार्ग भाजपने अनेकदा पत्करला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती महमद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी पक्षाबराेबर आघाडी केली, तेव्हा भाजपवर बरीच टीका  झाली हाेती. जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारे सत्ता मिळवून काय साध्य करायचे हाेते? अमित शहा यांच्या दौऱ्यात मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे अखेरचा लढा समजून भिडा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्याहीवरून आता  वादंग उभे राहणार आहे. शिवसेनेतच फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांचे नैतिक बळ घसरले आहे. ते स्वत: मुख्यमंत्री असताना सत्ता जावी, हे माेठे धक्कातंत्र भाजपने वापरले. दुसरीकडे आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही सुडाची भाषा उचित नाही. केंद्रात सलग दाेनवेळा भाजपला बहुमत मिळाल्यानंतर प्रादेशिक किंवा घटक पक्षांची आता गरज उरलेली राहिली नाही, असे भाजपला वाटते आहे. 

नरेंद्र माेदी यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्राने कौल दिला हाेता, असे त्यांचे मत आहे. मात्र, ते पूर्ण सत्य नाही. नरेंद्र माेदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय हाेण्यापूर्वीच शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली हाेतीच. असे अनेक राज्यांत झाले आहे. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने एक निवडणूक भाजपशी आघाडी करून जिंकली हाेती. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने भाजपशी आघाडी केली हाेती. अकाली दलाने पंजाबमध्ये नेहमीच भाजपशी आघाडी करीत राजकारण केले आहे. राजकीय वातावरण बदलले तसे अनेक प्रादेशिक पक्ष दुरावले. त्या सर्व पक्षांनी भाजपला धाेका दिला, असे झालेले नाही. काही पक्षांना भाजपनेही धाेका दिला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविताना मराठी अस्मितेचा विषयही पुढे येऊ शकताे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने बंगाली अस्मितेमुळे भाजपवर मात केली हे विसरून कसे चालेल?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना